शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रोज हजारांवर क्रेट डाळिंब कचऱ्यात

By admin | Updated: January 5, 2015 00:57 IST

संकट कोसळले : डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

अविनाश बाड -आटपाडी -ज्या डाळिंबाने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना लखपती बनण्याचे स्वप्न दाखविले, त्या डाळिंबाने आता शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. निर्यातीत घट, थंडीच्या कडाक्याने मागणी कमी असल्याचे दाखवून व्यापारी निम्म्या दराने डाळिंबाची खरेदी करीत आहेत. हे कमी म्हणून की काय ‘अनारदाना’ करणाऱ्या उद्योगांवर अन्न आणि औषध प्रशासनाने छापे मारून ते उद्योग बंद पाडले. त्यामुळे नुसत्या आटपाडीत दरदिवशी हजाराहून अधिक क्रेट डाळिंबे शेतकऱ्यांना अक्षरश: फेकून द्यावी लागत आहेत. आटपाडी तालुक्यात सुमारे १० हजार एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड आहे. गणेश आणि भगवा वाणाची दर्जेदार डाळिंबे निर्माण करण्यासाठी तालुक्याची खास ओळख आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर रविवारी, मंगळवारी आणि गुरुवारी उघड लिलाव पद्धतीने डाळिंबाचे सौदे होतात. त्यासाठी १८ अडत व्यापारी आहेत. (पान ८ वर)कोट्यवधींचे नुकसान; शासनाचे दुर्लक्ष!फळे आणि भाजीपाला यासाठी शासनाने आधारभूत किंमत ठरवली नसल्याने, व्यापाऱ्यांनी कमी दराने डाळिंबे खरेदी केली तर, त्यावर काही कारवाई करता येत नाही. अनारदाना बनविण्यासाठी डाळिंबाची खरेदी बंद झाल्याने बाजार समितीच्या आवारातील टाकून दिलेली डाळिंबे मजूर लावून ट्रॅक्टरने भरून नेऊन वाळल्यावर पेटवून देऊन नष्ट करणे हे मोठे खर्चिक आणि न परवडणारे काम झाले आहे.- एस. यू. जाधव, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, आटपाडीडाळिंबाला आधारभूत किंमत नाही. त्यामुळे रक्ताचं पाणी करून शेतकऱ्यांनी निर्माण केलेली गुणवत्तापूर्ण डाळिंबे सध्या मातीमोल किमतीने व्यापारी खरेदी करीत आहेत. नडलेला शेतकरी मिळेल त्या दराने डाळिंब विकत आहे. दरात वाढ झाली नाही, तर महागडी कीडनाशके, बुरशीनाशके, रासायनिक खते यावर झालेला खर्चही निघणे कठीण आहे. याकडे शासनाचे आणि एरवी शेतकऱ्यांच्या नावाने गळा काढून शेतकऱ्यांचे कै वारी असल्याचा आव आणणाऱ्या पुढाऱ्यांचेही दुर्लक्ष आहे.