शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

रोज हजारांवर क्रेट डाळिंब कचऱ्यात

By admin | Updated: January 5, 2015 00:57 IST

संकट कोसळले : डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

अविनाश बाड -आटपाडी -ज्या डाळिंबाने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना लखपती बनण्याचे स्वप्न दाखविले, त्या डाळिंबाने आता शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. निर्यातीत घट, थंडीच्या कडाक्याने मागणी कमी असल्याचे दाखवून व्यापारी निम्म्या दराने डाळिंबाची खरेदी करीत आहेत. हे कमी म्हणून की काय ‘अनारदाना’ करणाऱ्या उद्योगांवर अन्न आणि औषध प्रशासनाने छापे मारून ते उद्योग बंद पाडले. त्यामुळे नुसत्या आटपाडीत दरदिवशी हजाराहून अधिक क्रेट डाळिंबे शेतकऱ्यांना अक्षरश: फेकून द्यावी लागत आहेत. आटपाडी तालुक्यात सुमारे १० हजार एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड आहे. गणेश आणि भगवा वाणाची दर्जेदार डाळिंबे निर्माण करण्यासाठी तालुक्याची खास ओळख आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर रविवारी, मंगळवारी आणि गुरुवारी उघड लिलाव पद्धतीने डाळिंबाचे सौदे होतात. त्यासाठी १८ अडत व्यापारी आहेत. (पान ८ वर)कोट्यवधींचे नुकसान; शासनाचे दुर्लक्ष!फळे आणि भाजीपाला यासाठी शासनाने आधारभूत किंमत ठरवली नसल्याने, व्यापाऱ्यांनी कमी दराने डाळिंबे खरेदी केली तर, त्यावर काही कारवाई करता येत नाही. अनारदाना बनविण्यासाठी डाळिंबाची खरेदी बंद झाल्याने बाजार समितीच्या आवारातील टाकून दिलेली डाळिंबे मजूर लावून ट्रॅक्टरने भरून नेऊन वाळल्यावर पेटवून देऊन नष्ट करणे हे मोठे खर्चिक आणि न परवडणारे काम झाले आहे.- एस. यू. जाधव, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, आटपाडीडाळिंबाला आधारभूत किंमत नाही. त्यामुळे रक्ताचं पाणी करून शेतकऱ्यांनी निर्माण केलेली गुणवत्तापूर्ण डाळिंबे सध्या मातीमोल किमतीने व्यापारी खरेदी करीत आहेत. नडलेला शेतकरी मिळेल त्या दराने डाळिंब विकत आहे. दरात वाढ झाली नाही, तर महागडी कीडनाशके, बुरशीनाशके, रासायनिक खते यावर झालेला खर्चही निघणे कठीण आहे. याकडे शासनाचे आणि एरवी शेतकऱ्यांच्या नावाने गळा काढून शेतकऱ्यांचे कै वारी असल्याचा आव आणणाऱ्या पुढाऱ्यांचेही दुर्लक्ष आहे.