शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

मुंबईतून दर आठ तासाला होतेय वाहनचोरी...

By admin | Updated: May 11, 2017 02:27 IST

दर आठ तासाला मुंबईतून एक वाहन चोरीला जात असल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दर आठ तासाला मुंबईतून एक वाहन चोरीला जात असल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर येत आहे. गेल्या चार महिन्यांत मुंबईतून तब्बल ८८७ वाहने चोरीला गेली असून, त्यापैकी अवघ्या २१० वाहनांची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहेत. त्यामुळे या गुन्ह्यांची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.देशाची आर्थिक राजधानीतील चोर-पोलिसांचा खेळ पोलिसांसाठीच डोकेदुखी ठरत आहे. सोन्याच्या वाढत्या किमतीसोबतच धूमस्टाईलने सोनसाखळीच्या चोऱ्या करण्याचे प्रमाण काही वर्षापूर्वी मुंबईत प्रचंड वाढले होते. निव्वळ सोनसाखळी चोरीच्या दिवसाला सरासरी पाच ते सहा, तर वर्षाकाठी सुमारे दीड हजार गुन्ह्यांची नोंद होत होती. मात्र, तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी रस्त्यावरील ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी विशेष उपाययोजना आखल्या. त्यानंतर, सोनसाखळीसारखे गुन्हे करणाऱ्यांना जरब बसली. सोनसाखळी चोरांना पोलिसांनी वेसण घातली असली, तरी मोटारवाहन चोरी, जबरी चोऱ्या, दिवसा-रात्रीच्या घरफोड्या अशा गुन्ह्यांना आळा घालण्यात पोलिसांना यश आलेले नाही. गेल्या वर्षभरात मोटारवाहन चोरीचे ३ हजार ११८ गुन्हे दाखल झाले आहेत. यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे, वाहनचोरीच्या गुन्ह्यांच्या उकलींचे प्रमाण अवघे २५ ते २८ टक्के आहे. त्यात या वर्षी १ जानेवारी ते २३ एप्रिल २०१७ पर्यंत वाहनचोरीचे तब्बल ८८७ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे मुंबईत दर आठ तासाला वाहनचोरी होत असल्याचे विदारक वास्तव यातून समोर येत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या वाहनांची काळजी घेणे गरजेचे आहे. वाहनचोरीच्या नानाविध प्रयत्नांमुळे चालकांप्रमाणे पोलिसांची डोकेदुखी वाढते आहे. त्यामुळे या चोरांना आवर घालण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत.