शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

मुंबईतून दर आठ तासाला होतेय वाहनचोरी...

By admin | Updated: May 11, 2017 02:27 IST

दर आठ तासाला मुंबईतून एक वाहन चोरीला जात असल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दर आठ तासाला मुंबईतून एक वाहन चोरीला जात असल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर येत आहे. गेल्या चार महिन्यांत मुंबईतून तब्बल ८८७ वाहने चोरीला गेली असून, त्यापैकी अवघ्या २१० वाहनांची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहेत. त्यामुळे या गुन्ह्यांची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.देशाची आर्थिक राजधानीतील चोर-पोलिसांचा खेळ पोलिसांसाठीच डोकेदुखी ठरत आहे. सोन्याच्या वाढत्या किमतीसोबतच धूमस्टाईलने सोनसाखळीच्या चोऱ्या करण्याचे प्रमाण काही वर्षापूर्वी मुंबईत प्रचंड वाढले होते. निव्वळ सोनसाखळी चोरीच्या दिवसाला सरासरी पाच ते सहा, तर वर्षाकाठी सुमारे दीड हजार गुन्ह्यांची नोंद होत होती. मात्र, तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी रस्त्यावरील ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी विशेष उपाययोजना आखल्या. त्यानंतर, सोनसाखळीसारखे गुन्हे करणाऱ्यांना जरब बसली. सोनसाखळी चोरांना पोलिसांनी वेसण घातली असली, तरी मोटारवाहन चोरी, जबरी चोऱ्या, दिवसा-रात्रीच्या घरफोड्या अशा गुन्ह्यांना आळा घालण्यात पोलिसांना यश आलेले नाही. गेल्या वर्षभरात मोटारवाहन चोरीचे ३ हजार ११८ गुन्हे दाखल झाले आहेत. यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे, वाहनचोरीच्या गुन्ह्यांच्या उकलींचे प्रमाण अवघे २५ ते २८ टक्के आहे. त्यात या वर्षी १ जानेवारी ते २३ एप्रिल २०१७ पर्यंत वाहनचोरीचे तब्बल ८८७ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे मुंबईत दर आठ तासाला वाहनचोरी होत असल्याचे विदारक वास्तव यातून समोर येत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या वाहनांची काळजी घेणे गरजेचे आहे. वाहनचोरीच्या नानाविध प्रयत्नांमुळे चालकांप्रमाणे पोलिसांची डोकेदुखी वाढते आहे. त्यामुळे या चोरांना आवर घालण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत.