शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

जव्हारमध्ये उकाड्याने लाहीलाही

By admin | Updated: March 3, 2017 03:14 IST

यंदा त्याआधीच वाढलेल्या उष्म्याने जव्हारकरांना कधी न होणारी वणव्याची अनुभूती येत आहे.

हुसेन मेमन,जव्हार- होळी सणानंतर उष्म सुरू होतो, मात्र यंदा त्याआधीच वाढलेल्या उष्म्याने जव्हारकरांना कधी न होणारी वणव्याची अनुभूती येत आहे. गेल्या तीन दिवसांत पारा ३९ अशांवर पोहोचला आहे. किमान तापमानातही दिवसगणिक वाढ होत असल्याने आता उन्हाचे चटके आणि झळा यांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे जव्हारकरांच्या अंगाची लाही लाही झाली आहे. यामुळे शीतपेयांची तसेच बाटलीबंद थंड पाण्याची मागणी सतत वाढते आहे. त्यात भारनियमनाची भर पडल्याने पंख्याचा वारा घेणेही शहरवासियांना अवघड झाले आहे. तळमळत बसण्याशिवाय त्यांच्यापुढे कोणताही पर्याय उरलेला नाही.मिनी महाबळेश्वर अशी ख्याती असलेले जव्हार शहर गेल्या काही वर्षांपासून जंगल तोड होत असल्यामुळे आणि वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे प्रचंड तापते आहे. मागील काही दिवसांत अचानक पडणाऱ्या अवकाळी पावसाने नागरीकांची चांगलीच झोप उडवली होती, त्यानंतर अचानक उन्हाच्या तडाख्याचा जोर इतका वाढला की, जमिनीतील वाफ आणि वरून सूर्यप्रकाशाचा मारा अशा स्थितीत पारा वाढतच चालला आहे. गेल्या दोन दिवसांत तापमानात दिवसगणिक दोन अंशाची वाढ झाली आहे. किमान तापमान १६ वरून १८ आणि कमाल तापमान ३६ वरून ३९ वर पोहोचले आहे. तापमानवाढीचा वेग कायम राहिल्यास थंड हवेचे ठिकाण व मिनी महाबळेश्वरची ख्याती असलेल्या जव्हारचे तापमान ४२ च्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.