शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्रिपद गेले तरी ‘भारतमाता’ म्हणणारच

By admin | Updated: April 5, 2016 02:34 IST

‘भारतमाता की जय’ हा कोणत्याही धर्माचा नारा नाही, तर ती देशप्रेमाची घोषणा आहे. त्यामुळे माझे पद गेले तरी मी ‘भारतमाता की जय’ म्हणणारच, असे ठणकावून सांगत विरोधकांनी केलेली

मुंबई : ‘भारतमाता की जय’ हा कोणत्याही धर्माचा नारा नाही, तर ती देशप्रेमाची घोषणा आहे. त्यामुळे माझे पद गेले तरी मी ‘भारतमाता की जय’ म्हणणारच, असे ठणकावून सांगत विरोधकांनी केलेली माफी मागण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावली.शनिवारी नाशिक येथे भाजपाच्या बैठकीत बोलताना ‘भारतमाता की जय म्हणणार नाहीत, त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही,’ असे वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद सोमवारी विधानसभा व विधान परिषदेत उमटले. या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत, मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शून्य तासात हा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्रिपद हे घटनात्मक आहे तेव्हा घटनेची चौकट झुगारून मुख्यमंत्र्यांनी विधाने करणे हे त्यांच्या पदाला शोभणारे नाही. हा अजेंडा कोणाचा आहे, असे विचारत अल्पसंख्याकांना देशभक्ती सिद्ध करण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांच्या दालनातून देशभक्तीची एनओसी घ्यावी लागेल का? असा हल्लाबोल विखे पाटील यांनी केला. त्या वेळी मुख्यमंत्री सभागृहात नव्हते. तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी पुढील कामकाज पुकारताच संतप्त झालेले काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्यवेलमध्ये उतरून घोषणा देऊ लागले. अध्यक्षांनी परवानगी नाकारल्यानंतरही राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड संतप्त होऊन बोलले. त्यावर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आव्हाड यांच्यावर नेम साधत,‘तुमच्या देशभक्तीविषयी आणि इशरतच्या प्रेमाविषयी आमच्या मनात शंका नाही, असा चिमटा काढल्यानंतर वातावरण अधिकच तापले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी तिरंगी झेंडे फडकावले. दोन्ही बाजूने शिवराळ घोषणाबाजीही झाली. गोंधळामध्ये कामकाज आधी पंधरा मिनिटांसाठी आणि नंतर अर्धा तासासाठी तहकूब करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले. ते म्हणाले, मी नाशिकमध्ये जे बोललो तेच मी खुलाशात सांगितले आहे. मी कोणत्याही धर्माचे नाव घेतले नाही. कुणावर आक्षेप घेतला नाही. पण ‘भारत माता की जय’ म्हणणार नाहीत त्यांच्या मनात या देशाबद्दल प्रेम नाही त्यांना या देशात राहता येणार नाही, यात मी काय चूक केली? मुख्यमंत्री पद राहते की जाते याची पर्वा नाही; पण मी काल भारत माता की जय म्हणालो, आजही म्हणतो व उद्याही म्हणेन! देशातली हिंदू, मुस्लिम, शिख, ख्रिश्चन सारेच भारत माता की जय म्हणतात. वाघा सीमेवर जमलेले सर्वधर्मीय भारतीय आणि तिथे तैनात जवान ‘वंदे मातरम‘ आणि ‘भारत माता की जय’ अशा दोनच घोषणा देतात, असे फडणवीस यांनी सांगितले. विधानसभेत जेंव्हा एमआयएमच्या एका आमदाराने घोषणा देण्यास नकार दिला तेंव्हा तुमच्यासह सर्व सदस्यांनी त्यांच्या हकालपट्टीचा ठराव केला याची आठवण करून देत या विषयावर हकनाक विवाद करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीही विरोधकांना सुनावले.झेंडा उलटा फडकविलागदारोळ सुरू असतानाच राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी तिरंगा झेंडा फडकविला. अन्य विरोधी सदस्यांनाही त्यांनी झेंडे दिले. राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी तो उलटा फडकविल्याची बाब तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी लक्षात आणून दिली पण ध्वज उलटा फडकविण्याचा त्यांचा कुठलाही उद्देश नव्हता आणि त्यांनी झेंडा लगेच सरळही केला, असेही स्पष्ट केले. तथापि, महसूल मंत्री खडसे यांनी हाच धागा पकडून त्यांना सदस्यांना निलंबित करण्याची मागणी केली. तेव्हा, व्हिडीओ रेकॉर्डिंग तपासून आपण निर्णय देऊ, असे सागर यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)