शहरं
Join us  
Trending Stories
1
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
2
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
3
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
4
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
5
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
6
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
7
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
8
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
9
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
10
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
11
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली
12
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
14
"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
15
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
16
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
17
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
18
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
19
IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?
20
कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांनी दिला हिशेब, म्हणाले, "जरा सबुरीने घ्या..."

"ब्रम्हदेव आलातरी २०२४ पर्यंत मंत्रिपद नको; प्रहार आमदारांची संख्या १०-११ करणार"

By नितीन काळेल | Updated: August 23, 2023 20:48 IST

बच्चू कडू यांची घोषणा : आम्ही बसू तेथेच सरकार बसणार; मला दाबण्याची कोणात ताकद नाही

सातारा : मला दाबण्याची कोणाची ताकद नाही. मंत्रिपदही सर्वोच्च नाही. दिव्यांग मंत्रालय दिले त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा खूप आभारी आहे. त्यामुळे ब्रम्हदेव आलातरी २०२४ पर्यंत मंत्रिपद घेणार नाही. उलट प्रहारची ताकद वाढवून आमदारांची संख्या १० ते ११ वर नेणार आहे. आम्ही बसू तेथे सरकार बसेल,’ अशी घोषणाच माजी मंत्री बच्चू कडू यांनी केली. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी रात्री बच्चू कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. दिव्यांग मंत्रालय दिव्यांगांच्या दारी अभियानासाठी सांगलीला जात असताना कडू साताऱ्यात थांबले होते.

बच्चू कडू म्हणाले, ‘कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क वाढीमुळे शेतकऱ्यांना काहीच मिळणार नाही. शासनालाच पैसे जमा होणार आहेत. हे पैसे शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे. पूर्वी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीने शेतकऱ्यांबाबत केले. तेच आता भाजपही करत आहे. हे सरकार कांदा खाणाऱ्यांचा विचार करते. पण, पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचा नाही. कांद्याचा दर वाढल्याने सरकार पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याने कांद्याचा दर कमी झाल्याने सरकार पडायला हवे. सातवा वेतन आयोग घेणारे, आयकर भरणारे कांदा महाग झाला म्हणतात. शेतकऱ्यांच्या मालावरच का ओरड होते. यावरुन लक्षात येते की कृषी क्षेत्रावर कोणाचे नियंत्रण नाही.

राज्यात नोकर भरती होत असून एक हजार रुपये शुल्क घेतले जात आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्याचे सांगून कडू पुढे म्हणाले, ‘ केरळ राज्याच्या धर्तीवर वर्षाला परीक्षाऱ्थींकडून सर्वच परीक्षांसाठी एक हजार रुपये भरुन घ्यावेत. कारण, ही सेवा आहे. कमाईचे साधन नाही. त्याचबरोबर गुणवत्तेवर पेपर व्हावेत. कंपन्यांकडून परीक्षा न घेता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून त्या घेण्याची गरज आहे.

आपण स्पष्टपणे बोलता त्याचा तोटा होतो का ? पत्रकारांच्या या प्रश्नावर कडू यांनी माझे आडनाव कडू आहे. त्यामुळेच मी भाेगतो आहे, असे स्पष्टपणे सांगितले. तसेच प्रहारची ताकद वाढविण्यासाठी काय करणार ? यावर त्यांनी विधानसभेला महायुतीकडे १५ जागा मागणार आहे. नाही मिळाल्यातर स्वतंत्र लढू. पण, १० ते ११ आमदार निवडूण आणणार, असा दावाही केला.

दादा मुख्यमंत्री होण्याबाबत भविष्यवेत्त्याला विचारतो...

राष्ट्रवादीचे अजित पवार हे महायुतीत आले आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपद केव्हा मिळेल. यावर त्यांनी दादा पाचवेळा उपमुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री कधी होणार यासाठी भविष्यवेत्त्याला विचारतो, असे त्यांनी मिश्कीलपणे सांगितले. तर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच राहतील असेही स्पष्ट केले.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू