शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

मराठा क्रांती मोर्चानंतरही "सारथी"ची निर्मिती कागदोपत्रीच

By admin | Updated: May 15, 2017 19:17 IST

राज्यभरात मराठा क्रांती मोर्चे निघाल्यामुळे राज्य सरकारने मराठा, कुणबी, शेतीव्यावसायातील नागरिकांच्या मुलांना तात्काळ दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजनांची घोषणा केली होती.

राम शिनगारे / ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 15 - राज्यभरात मराठा क्रांती मोर्चे निघाल्यामुळे राज्य सरकारने मराठा, कुणबी, शेतीव्यावसायातील नागरिकांच्या मुलांना तात्काळ दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजनांची घोषणा केली होती. यामध्ये बार्टी संस्थेच्या धर्तीवर मराठा समाजातील तरुणांच्या विकासासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (सारथी) स्थापना करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी ९ डिसेंबर रोजी केली होती. यास सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी ही संस्था कागदोपत्रीच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संस्थेला अद्याप कार्यालय, कर्मचारी आणि निधी उपलब्ध झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरात मराठा समाजाने लाखोचे मोर्चे काढत आरक्षणसह इतर मागण्या केल्या होत्या. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये उत्सफुर्तपणे मोर्चे निघत होते. समाजातील असंतोष कमी करण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाची मर्यादा सहा लाख, शहरात अभियांत्रिकीसह औषधनिर्माणशास्त्रात शिक्षण घेत असलेल्या मुलांना निवासाची व्यवस्था करण्याची घोषणा केली. यासह तरुणांच्या सर्वांगिण विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थाच्या (बार्टी) धर्तीवर छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्थेची निर्मिती करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात ९ डिसेंबर २०१६ रोजी विधानसभेत केली होती. यानंतर ३ जानेवारी रोजी राज्य सरकारने या संस्थेची रचना, कार्य, उद्देश ठरविण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक व अभ्यासक डॉ. सदानंद मोरे आणि बार्टीचे माजी महासंचालक डी. आर. परिहार या द्विसदस्यीय समितीची स्थापना केली. यासही पाच महिन्यांचा कालवधी उलटला आहे. तरी समितीची एकही बैठक अद्याप झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. समितीला बैठका घेण्यासाठी अद्याप कार्यालय उपलब्घ करुन देण्यात आलेले नाही. तसेच समितीचे प्रशासकीय कार्य पार पाडण्यासाठी कर्मचारी, निधीची तरतुदही करण्यात आलेली नाही. यामुळे सारथीची घोषणा कागदोपत्रीच असल्याचे स्पष्ट झाले. याविषयी समितीचे सदस्य डी. आर. परिहार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयी बोलण्याचे टाळले. समाजकल्याण विभागाच्या सचिवांशी यासंदर्भात संपर्क होऊ शकला नाही.

....बार्टीत मिळणार होते कार्यालय-पुण्यातील बार्टीच्या कार्यालयातील १० बाय १२ ची एक खोली सारथी संस्थेचे कार्यालय म्हणून देण्याचा प्रस्ताव होता. मात्र डी. आर. परिहार यांनी बार्टीतील कार्यालयाला नकार दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचेळी परिहार यांना पुण्यातील ह्यसर्किट हाऊसमध्ये कार्यालय हवे असल्याचे समजते. संस्थेच्या कार्यालयासंबंधी अद्याप कोणाताही निर्णय झालेला नाही. यामुळे समितीची एकही बैठक झालेली नसल्याचे समोर आले आहे.