शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
2
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
3
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
4
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
5
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
6
'नमस्कार फ्रॉम स्पेस; तुम्हीही या प्रवासाचा आनंद घ्या', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video
7
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
8
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
9
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
10
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
11
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
12
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
13
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!
14
"कॉम्प्रोमाइज कर तुला रोल देतो", टीव्ही अभिनेत्याला दिग्दर्शकाने दिलेली ऑफर, केला धक्कादायक खुलासा
15
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
16
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
17
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
18
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
19
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
20
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा

कारवाईनंतरही नियम पायदळीच

By admin | Updated: September 4, 2014 00:53 IST

आॅटो मीटरनेच चालावेत, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) सोमवारपासून कारवाई करीत असली तरी बहुसंख्य रिक्षाचालक नियम पायदळी तुडवून व्यवसाय करीत आहेत. विशेष म्हणजे

आॅटोचालकांकडून प्रवाशांची लूट : दीडपट भाड्याची आकारणीनागपूर : आॅटो मीटरनेच चालावेत, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) सोमवारपासून कारवाई करीत असली तरी बहुसंख्य रिक्षाचालक नियम पायदळी तुडवून व्यवसाय करीत आहेत. विशेष म्हणजे ९,६०० आॅटोरिक्षांमधून ९० टक्के रिक्षांना ई-मीटर लागले आहेत. परंतु यातील १० टक्केच रिक्षाचालक मीटरने चालत असल्याचे ‘लोकमत’च्या चमूला मंगळवारी आढळून आले. शहराची लोकसंख्या पाहता त्यातुलनेत सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची संख्या तोकडी आहे. यातच अनेक भागात स्टार बस जात नाही. प्रवाशांना आॅटोरिक्षाची मदत घ्यावी लागते. प्रवाशांच्या तक्रारीवरूनच राज्यात सर्व जुन्या नोंदणीकृत आॅटोरिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसविणे सक्तीचे केले आहे. यातच आॅटोचे भाडेदरही वाढवून दिले आहे. आॅटोचालकांसोबतच प्रवाशांचाही फायदा व्हावा, वाजवी दरात उत्तम दर्जाची सेवा मिळावी, हा उद्देश ठेवून आरटीओने १ सप्टेंबरपासून कारवाईची मोहीम हाती घेतली. परंतु कारवाईची धास्ती दिसत असली तरी समोर आरटीओचे पथक आणि पोलीस नसल्याचे पाहत बहुसंख्य चालक मीटरने चालण्यास तयार नसल्याचे दिसून आले. यातील अनेकांनी आॅटो मीटरमध्ये सुधारित बदल व्हायचे असल्याचे कारण सांगितले, तर काहींनी मीटरने परवडत नसल्याचे सांगितले. असे केले इन्व्हेस्टीगेशनदुपारी १ वाजता : व्हेरायटी चौक ते बोले पेट्रोल पंपापर्यंत जाण्यासाठी आॅटोचालकाने ४० रुपये भाडे सांगितले. आॅटोमध्ये इलेक्ट्रॉनिक मीटर बसविले होते. मात्र त्यात सुधारित बदल व्हायचे असल्याचे कारण पुढे केले. साधारण दोन किलोमीटरच्या या अंतराला मीटरप्रमाणे २८ रुपये भाडे पडणार होते. दुपारी २ वाजता : मध्यवर्ती रेल्वे स्थानकावरून सीताबर्डी जाण्यासाठी रिक्षाचालकाने ६० रुपये भाडे सांगितले. बसस्थानकावरून हे अंतर तीन किलोमीटर आहे. भाडे कमी करण्यासाठी विनंती केली असता त्याने उद्धट उत्तर देत ७० रुपये सांगितले. दुसऱ्या एका आॅटोचालकाला विचारले असता, त्याने आणखी एक प्रवासी सोबत घेईन, अशी अट टाकून ४० रुपये भाडे सांगितले. दुपारी ३ वाजता : गणेशपेठ बसस्थानक ते बर्डीपर्यंत इलेक्ट्रॉनिक मीटरने चालण्यास अनेकांनी नकार दिला. एक तयार झाला, परंतु त्याचे मीटर जुन्या भाडेदरानुसार चालणारे होते.त्यानुसार पहिल्या किलोमीटरला १२ तर दुसऱ्या किलोमीटरला १० रुपये होते. मात्र, चालक नव्या भाड्यानुसार चालण्याच्या अटीवर येण्यास तयार होता. एकाने कशाला फंद्यात पडता म्हणून सल्ला दिला. (प्रतिनिधी)रिक्षाचालकांसाठी असे आहेत नियमरिक्षाथांब्यावर रांगेत थांबूनच व्यवसाय केला पाहिजे. प्रवाशांना ओरडून बोलविण्यावर बंदी आहे. प्रवाशांसोबत सौजन्याने वागणे आवश्यक आहे.अंगात खाकी गणवेश अनिवार्य. रिक्षात ई-मीटर, टेरिफ कार्ड, लायसन्स, बॅचबिल्ला, परमीट असणे आवश्यक.१ सप्टेंबरपासून प्रति किलोमीटरसाठी १४ रुपये भाड्याची आकारणी केली पाहिजे.फक्त रात्री १२ ते पहाटे ५ वाजताच्या दरम्यान दीडपट भाडे आकारणी केली पाहिजे. इतर वेळी सिंगल भाडेच घेणे अनिवार्य आहे.प्रत्येक थांब्यावर रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या सोयीसाठी दोन ते तीन रिक्षा असायल्या पाहिजेत.रिक्षात रात्रीच्या वेळी दिव्यांची-उजेडाची सोय करणे बंधनकारक आहे. मीटर प्रवेशांना दिसेल असे असणे आवश्यक आहे.हे नियम धुडकावून लावले जातातशहरात फार कमी रिक्षावाले गणवेशात असतात. अनेकांकडे बॅचबिल्लेही नसल्याचे आढळून आले.मीटरप्रमाणे आॅटोचालक चालायला तयार नसतात. प्रवाशांनाही मीटरविषयी माहिती नाही. विशिष्ट आॅटो विशिष्ट ठिकाणीच जातो. इतरत्र जाण्यासाठी तो अव्वाच्या सव्वा रक्कम सांगतो. मोरभवनच्यासमोर, झाशी राणी लक्ष्मीबाई चौक, व्हेरायटी चौक, बर्डीतील महाराष्ट्र बँकेच्या समोर आणि यशवंत स्टेडियमच्या समोर रस्ता अडवून आॅटोरिक्षा उभे असतात. हे सर्व वाहतूक पोलिसांच्या नजरेसमोर सुरू असते.आसनक्षमता तीन असताना पाचच्यावरच प्रवाशांना घेऊन आॅटो धावत असतात.महत्त्वाच्या थांब्यावर अवैध प्रवासी वाहतूक सर्रास सुरू आहे.