शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

जातीय समीकरणे प्रभावी, सर्वत्र गोंधळाचे वातावरण

By admin | Updated: September 12, 2014 02:31 IST

जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वच पक्ष जातीय समीकरणे सोडविण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे.

मनोज भिवगडे, अकोलाजिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वच पक्ष जातीय समीकरणे सोडविण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. कोणता पक्ष कोणत्या जातीचा उमेदवार देतो, याकडे पक्षांचे लक्ष असून, अशा स्थितीत आतापर्यंत एकाही पक्षाला उमेदवाराच्या नावावर अद्याप अंतिम निर्णय घेता आलेला नाही. सर्वच पक्षांमध्ये असलेल्या या गोंधळाच्या स्थितीत, काही विद्यमान आमदारांवरही टांगती तलवार आहे.आकोट मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय गावंडे यांच्याविरोधात भाजपा व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे आ. गावंडे यांना उमेदवारी द्यावी अथवा नाही, याबाबत शिवसेनेत गांभिर्याने विचार सुरू आहे. काँग्रेसचे माजी मंत्री सुधाकरराव गणगणे यांनी त्यांचे पुत्र महेश यांच्यासाठी उमेदवारी मागितली असली तरी, दुसरीकडे काँग्रेसमधील अल्पसंख्याक गट आकोट मतसंघावर दावा करीत आहे.अकोला पश्चिम हा मतदारसंघ यावेळी दोन कारणांसाठी चर्चेत आला आहे. भाजपाचे विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा यांनी निवडणूक न लढविण्याचा त्यांचा निर्णय पक्षश्रेष्ठींना कळविला असला तरी, दुसरीकडे निवडणूक लढविण्याची तयारीही चालविली आहे. त्यामुळे भाजपाचे इतर इच्छूक उमेदवार संभ्रमात आहेत. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे; पण या पक्षालाही उमेदवारीचा पेच सोडविता आलेला नाही. बाळापूरमध्ये विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांना रिंगणात उतरविण्याची तयारी भारिप-बहुजन महासंघाने केली असली तरी, येथे मराठा कार्ड वापरण्याचा पर्यायही खुला ठेवला आहे. त्यामुळे भाजपा आणि काँग्रेस यांना सक्षम उमेदवाराचा पेच सोडविता आलेला नाही. अकोला पूर्वसाठी भाजपाने केलेल्या दाव्याने शिवसेनेचे उमेदवार संभ्रमात आहे. काँग्रेसने आजवर या मतदारसंघात मराठा कार्डच वापरले. यावेळीही तशीच परिस्थिती राहण्याची शक्यता असल्याचे, काँग्रेसच्या इच्छुकांच्या यादीवरून स्पष्ट होते. भारिप-बहुजन महासंघाचे विद्यमान आमदार हरिदास भदे यांच्याविरोधात पक्षाचे पाठबळ असलेला मोठा वर्ग असल्याने त्यांच्या उमेदवारीबाबतही संभ्रमाची स्थिती आहे.मूर्तिजापूरमध्ये एका उमेदवारास पुन्हा संधी न देण्याची परंपरा यावेळीही सर्वच पक्षांकडून जोपासली जाण्याची शक्यता आहे. याला राष्ट्रवादी अपवाद ठरू शकते. भाजपामध्ये आमदार हरिश पिंपळे यांच्याऐवजी पर्यायी सक्षम उमेदवाराच्या नावावर चर्चा सुरू आहे. काँग्रेसनेही येथे दावा केला असल्याने आघाडीच्या जागा वाटपाकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.