शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

राज्यात प्राणी रक्षण मंडळाची स्थापना करणार

By admin | Updated: June 5, 2015 01:16 IST

गोवंश हत्याबंदी कायदा लागू केल्यामुळे भाकड जनावरांचा प्रश्न निर्माण होईल. या निर्णयामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविल्याची ओरड काहींनी सुरू केली होती.

अकोला : गोवंश हत्याबंदी कायदा लागू केल्यामुळे भाकड जनावरांचा प्रश्न निर्माण होईल. या निर्णयामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविल्याची ओरड काहींनी सुरू केली होती. यावर उपाय म्हणून गोवंशाच्या सेवेसाठी प्राणी रक्षण मंडळांची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात आदर्श गोसेवा एवं अनुसंधान प्रकल्पाच्यावतीने आयोजित अभिनंदन सोहळ्यात ते बोलत होते. सरकारने मतांचे राजकारण न करता राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला. गोवंश वाचेल तरच शेतकरी आणि समाज वाचणार असल्याने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी गोशाळा आणि गोसेवकांचे जाळे तयार करण्याचे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले. राज्य सरकारच्या निर्णयाला काहींनी त्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा प्रयत्न केला; मात्र उच्च न्यायालयानेदेखील शासन निर्णयाला स्थगिती न देता कायद्याचे समर्थन केले. डॉ. आंबेडकरांनी संविधानात गोवंशाचे रक्षण करण्याची जबाबदारी संबंधित राज्य सरकारांवर निश्चित केली आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, या कायद्याचा धर्माशीदेखील संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला. ही खेदाची बाब आहे.राज्य सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केल्यानंतर इंग्रजी मीडियातून सरकारने मांसविक्रीवर निर्बंध घातल्याचे वृत्त झळकत होते. आमचा उद्देश गोवंशाची हत्या रोखण्याचा असताना संबंधित मीडियाची भूमिका असंवेदनशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.