शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

'पलायन व प्रश्नांचा ढेकूण झटकणे हा मार्ग नाही'; ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 09:54 IST

काँग्रेसचे विदेश विभागाचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी केलेल्या एका विधानावरून भाजपने काँग्रेस पक्षाला घेरले. त्यानंतर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेने टीका केली. 

"सॅम पित्रोदा यांची अनेक विधाने ही वाद ओढवून घेणारी ठरली व काँग्रेसची त्यामुळे कुचंबणा झाली. आता त्यात चीनवरील विधानाची भर पडली. नेहमीप्रमाणे काँग्रेसने सॅम यांच्या विधानापासून स्वतःला दूर केले", असे म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवरून खडेबोल सुनावले आहेत.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

"चीनला शत्रू मानणे अयोग्य आहे. चीनपासून भारताला कोणता धोका आहे हेच मला समजत नाही. चीनसंदर्भातील समस्यांना कायम फुगवून सांगितले जाते. भारताने चीनबाबतचा दृष्टिकोन बदलून त्या देशाला शत्रू मानणे बंद केले पाहिजे", असे विधान काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी केले होते. त्यावर बोट ठेवत भाजपने काँग्रेसला घेरले. 

भाजपच्या टीकेनंतर काँग्रेस सॅम पित्रोदांच्या विधानापासून दूर केले. काँग्रेसच्या या भूमिकेबद्दल नाराजीचा सूर लावत ठाकरेंच्या शिवसेनेने सुनावले आहे. सामना अग्रलेखातून ठाकरेंच्या शिवसेनेने याबद्दल भाष्य करताना काँग्रेसला डोस दिला आहे. 

शिवसेनेने (यूबीटी) काँग्रेसला काय म्हटलं आहे?

ठाकरेंच्या शिवसेनेने चीनसोबतच्या वादावर भाष्य करताना म्हटले आहे की, "चीनने वैर पुकारले आहे, पण मोदी सरकारने कितीही छाती फुगवून दाखवली तरी चीनशी सरळ टक्कर घेण्याची हिंमत त्यांच्यात दिसत नाही. चीनबरोबरचे युद्ध नेहरूंमुळे हरलो व 1962 साली चीनने भारताच्या 37 हजार वर्ग किलोमीटर जमिनीवर कब्जा मिळवला हेच त्यांचे दळण सुरू आहे."

"मोदी हे हिंमतबाज वगैरे पंतप्रधान खरोखरच असतील तर त्यांनी नेहरूंमुळे चीनच्या ताब्यात गेलेली जमीन मुक्त करायला हवी. ते राहिले बाजूला, उलट मोदी काळात चीन लडाखमध्ये घुसला व मोठ्या जमिनीवर कब्जा मिळवला. पंतप्रधान मोदी यांनी हे आक्रमण सहन केले व आता तर त्यांनी गंगेत जाऊन स्नान केल्याने त्यांच्या मनातील वैराग्नी विझून गेला. त्याच गंगास्नानाचे काही थेंब सॅम पित्रोदांच्या अंगावर पडले व त्यांनाही चीन आपला कडवट शत्रू नसल्याचे वाटू लागले", अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेने मोदींवरही केली आहे. 

ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला डोस

"या सगळ्यात काँग्रेस पक्ष उगाच घामाघूम झाला व पित्रोदांना दूर ढकलून दिले. खरे तर मोदींना काँग्रेसने विचारायला हवे की, चीन भारताचा शत्रू आहे की नाही त्याबाबतचे परराष्ट्र व्यवहार धोरण लगेच जाहीर करा. म्हणजे आम्ही भूमिका घ्यायला मोकळे. पलायन व प्रश्नांचा ढेकूण झटकणे हा मार्ग नाही", असे ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला सुनावले आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसchinaचीन