शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

'पलायन व प्रश्नांचा ढेकूण झटकणे हा मार्ग नाही'; ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 09:54 IST

काँग्रेसचे विदेश विभागाचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी केलेल्या एका विधानावरून भाजपने काँग्रेस पक्षाला घेरले. त्यानंतर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेने टीका केली. 

"सॅम पित्रोदा यांची अनेक विधाने ही वाद ओढवून घेणारी ठरली व काँग्रेसची त्यामुळे कुचंबणा झाली. आता त्यात चीनवरील विधानाची भर पडली. नेहमीप्रमाणे काँग्रेसने सॅम यांच्या विधानापासून स्वतःला दूर केले", असे म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवरून खडेबोल सुनावले आहेत.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

"चीनला शत्रू मानणे अयोग्य आहे. चीनपासून भारताला कोणता धोका आहे हेच मला समजत नाही. चीनसंदर्भातील समस्यांना कायम फुगवून सांगितले जाते. भारताने चीनबाबतचा दृष्टिकोन बदलून त्या देशाला शत्रू मानणे बंद केले पाहिजे", असे विधान काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी केले होते. त्यावर बोट ठेवत भाजपने काँग्रेसला घेरले. 

भाजपच्या टीकेनंतर काँग्रेस सॅम पित्रोदांच्या विधानापासून दूर केले. काँग्रेसच्या या भूमिकेबद्दल नाराजीचा सूर लावत ठाकरेंच्या शिवसेनेने सुनावले आहे. सामना अग्रलेखातून ठाकरेंच्या शिवसेनेने याबद्दल भाष्य करताना काँग्रेसला डोस दिला आहे. 

शिवसेनेने (यूबीटी) काँग्रेसला काय म्हटलं आहे?

ठाकरेंच्या शिवसेनेने चीनसोबतच्या वादावर भाष्य करताना म्हटले आहे की, "चीनने वैर पुकारले आहे, पण मोदी सरकारने कितीही छाती फुगवून दाखवली तरी चीनशी सरळ टक्कर घेण्याची हिंमत त्यांच्यात दिसत नाही. चीनबरोबरचे युद्ध नेहरूंमुळे हरलो व 1962 साली चीनने भारताच्या 37 हजार वर्ग किलोमीटर जमिनीवर कब्जा मिळवला हेच त्यांचे दळण सुरू आहे."

"मोदी हे हिंमतबाज वगैरे पंतप्रधान खरोखरच असतील तर त्यांनी नेहरूंमुळे चीनच्या ताब्यात गेलेली जमीन मुक्त करायला हवी. ते राहिले बाजूला, उलट मोदी काळात चीन लडाखमध्ये घुसला व मोठ्या जमिनीवर कब्जा मिळवला. पंतप्रधान मोदी यांनी हे आक्रमण सहन केले व आता तर त्यांनी गंगेत जाऊन स्नान केल्याने त्यांच्या मनातील वैराग्नी विझून गेला. त्याच गंगास्नानाचे काही थेंब सॅम पित्रोदांच्या अंगावर पडले व त्यांनाही चीन आपला कडवट शत्रू नसल्याचे वाटू लागले", अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेने मोदींवरही केली आहे. 

ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला डोस

"या सगळ्यात काँग्रेस पक्ष उगाच घामाघूम झाला व पित्रोदांना दूर ढकलून दिले. खरे तर मोदींना काँग्रेसने विचारायला हवे की, चीन भारताचा शत्रू आहे की नाही त्याबाबतचे परराष्ट्र व्यवहार धोरण लगेच जाहीर करा. म्हणजे आम्ही भूमिका घ्यायला मोकळे. पलायन व प्रश्नांचा ढेकूण झटकणे हा मार्ग नाही", असे ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला सुनावले आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसchinaचीन