शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पावणेसात लाख कोटींच्या प्रकल्पांना पर्यावरणीय मंजुरी - जावडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 04:37 IST

केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याकडून प्रकल्पांना मिळणाऱ्या मंजुरीचा कालावधी मोदी सरकारची पारदर्शी कार्यपद्धती व गतिमान निर्णयप्रक्रियेमुळे ६०० दिवसांवरून कमी होऊन १९० दिवस झाला आहे.

मुंबई : केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याकडून प्रकल्पांना मिळणाऱ्या मंजुरीचा कालावधी मोदी सरकारची पारदर्शी कार्यपद्धती व गतिमान निर्णयप्रक्रियेमुळे ६०० दिवसांवरून कमी होऊन १९० दिवस झाला आहे. आगामी काळात हा कालावधी १०० दिवसांवर आणण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी दिली. भाजपाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी सांगितले की, पर्यावरण मंजुरीचा कालावधी कमी झाल्यामुळे २१ महिन्यांत ९४३ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली व ६ लाख ७२ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे अडकलेले प्रकल्प मार्गी लागले. जावडेकर म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्यात अनेक प्रकल्प अडकून पडले. त्यामुळे विकासकामे खोळंबली, बँकांची थकबाकी वाढली आणि रोजगारनिर्मिती मंदावली. आता प्रकल्पांचे पर्यावरण आघात अहवाल बनविण्यासाठीच्या टर्म्स आॅफ रेफरन्स एक महिन्यात मिळतात; कारण ३९ औद्योगिक क्षेत्रांचे टर्म्स आॅफ रेफरन्स प्रमाणित करण्यात आले आहेत. याखेरीज राज्यांचे अधिकार वाढविणे, प्रादेशिक केंद्रे सक्षम करणे असे उपाय केल्यामुळे पर्यावरण मंजुरीचा कालावधी कमी झाला, अशी माहितीही जावडेकर यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)