शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
3
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
4
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
5
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
6
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
7
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
9
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
10
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
11
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
12
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
13
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
14
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
15
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
16
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
17
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
18
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
19
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
20
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."

रंगला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’चा एंटरटेनमेंट क्लास...

By admin | Updated: October 17, 2016 00:59 IST

‘बम बम बोले मस्ती मैं डोले’ म्हणत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणाऱ्या ‘निकुंभ’ सरांचे तारे पुनश्च जमीनपर अवतरले

पुणे : ‘बम बम बोले मस्ती मैं डोले’ म्हणत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणाऱ्या ‘निकुंभ’ सरांचे तारे पुनश्च जमीनपर अवतरले... आणि ‘चित्र’ नव्हे तर अभिनय, नृत्य, गायन अशा विविध कलांच्या सादरीकरणातून ‘एंटरटेनमेंट’चा हा क्लास उत्स्फूर्तपणे रंगला... सशक्त अभिनेता, मिस्टर परफेक्शनिस्ट’ असे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे सगळे अभिनिवेश गळून पडले ...प्रत्येक चित्रपटात ‘हटके’ देणारा तो मुलांच्या एकसे बढकर एक ‘बाललीलांनी’ पूर्णत: भारावून गेला... प्रत्येक सादरीकरणाला त्याने दिलेली दिलखुलास दाद मुलांना प्रोत्साहन देणारी ठरली... ‘सब तारे हैं’ या त्याच्या उद्गाराने जादू केली... अन् मुलांच्या ओठावर चटकन हसू तरळले... हा अविस्मरणीय क्षण त्याने ‘सेल्फी’मध्ये बंदिस्त केला.रविवारचा दिवस आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासह आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात काहीसा खासच होता... भारतीय जैन संघटनेच्या वतीने वाघोली येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील या मुलांशी आमिर खानच्या संवादाचा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. ‘तो येणार’ याचा आनंद प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता... अखेर तो आला आणि येताच ‘नमस्कार’ या त्याच्या मराठमोळ््या शब्दाने दुष्काळाच्या तळपत्या ढगाखाली होरपळून गेलेल्या त्या कोवळ्या मनांवर वर्षासरींचा शिडकावा केला... आज तो नव्हे तर मुलेच ‘एंटरटेनर’ची भूमिका बजावत होती... कुणी त्याला नृत्य करून दाखवत होता... कुणी गाणं तर कुणी नाटकातला छोटा संवाद सादर करीत होता... या प्रत्येक सादरीकरणाने तो खूपच भारावून गेला...‘गेली माझी सख्खी बायको गेली’ या भारुडाच्या सादरीकरणाला त्याने मनमोकळेपणाने दाद दिली...कोणतीही भाषणबाजी न करता मुलांच्या निरागस प्रश्नांना तो दिलखुलासपणे उत्तरे देत होता... तुम्हाला मुलं का आवडतात? असा प्रश्न एका मुलाने विचारला, त्यावर तो म्हणाला, की मुलांमध्ये निरागसता असते़ प्रत्येक गोष्टी जाणून घेण्याची त्यांची इच्छा असते. त्यांचा नटखटपणा जास्त भावतो. एक प्रश्न संपतो ना संपतो तोवर त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरूच होती. समाजसेवेकडे कसे वळलात? ‘सत्यमेव जयते’चा उद्देश काय? ‘पानी फाऊंडेशन’ स्थापनेमागचा हेतू काय? पीके आणि दंगल चित्रपट कशावर भाष्य करतो? असे अनेक प्रश्न मुलांनी विचारले आणि त्याची त्याने मनमोकळेपणे उत्तरे दिली. ‘सत्यमेव जयते’मध्ये विविध विषयांवर भाष्य केले मात्र एक मुद्दा घेऊन काम केले पाहिजे, या हेतूने ‘पाणी’ या विषयावर काम करायचे ठरवले. समाजाप्रती आपलेही काही उत्तरदायित्व आहे, कलाकार म्हणून रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचू शकतो आणि समाजात एकता निर्माण करू शकतो, असे सांगत ‘आपकी जिंदगी खुशी से भरी हो, आप कामयाब हो’ अशी प्रार्थना त्याने केली आणि ‘आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके’ हे गाणे सादर करून त्याने मुलांची मने जिंकली. याप्रसंगी भारतीय जैन संघाचे संस्थापक शांतिलाल मुथा, शांतिलाल बोरा, विठ्ठल मणियार, अभय मुनोत, किंजल गोयल, बाबासाहेब सांगळे आणि समीर मुथा उपस्थित होते. (प्रतिनिधी)>छोरीयाँ छोरोंसे कम नहीं हैं‘दंगल’ या आगामी चित्रपटाबद्दल सांगताना आमिर खान म्हणाला, की दंगलमध्ये कोणत्याहीबाबतीत मुली मुलांपेक्षा कमी नाहीत, असा संदेश देण्यात आला आहे. दंगलची कथा कुस्तीला केंद्रस्थानी ठेवून गुंफण्यात आली आहे. मुलींना कुस्ती शिकवताना म्हारी छोरीयाँ छोरोंसे कम नहीं हैं... असे तो सांगतो. आमिरने महाराष्ट्र दुष्काळग्रस्त करण्याचा निर्णय पुण्यात जाहीर केला आहे़ ही मुले या चळवळीच्या पाठीमागे उभी राहतील. या प्रकल्पाअंतर्गत मुलांना देण्यात येणारे शिक्षण ही एक प्रयोगशाळा आहे. हीच मुले समाजात परिवर्तन घडवतील. येत्या एप्रिलमध्ये प्रत्येक मुलाच्या जिल्ह्यात जाऊन श्रमदान करण्यात येईल.- शांतिलाल मुथा