शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

चर्चेचा फार्स पुरे करा, तात्काळ सरसकट शेतकरी कर्जमाफी द्या- विखे-पाटील

By admin | Updated: June 20, 2017 17:43 IST

पंजाब सरकारने अवघ्या अडीच महिन्यात अभ्यास करून 2 लाख रुपयांची सरसकट शेतकरी कर्जमाफी केली.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 20 - पंजाब सरकारने अवघ्या अडीच महिन्यात अभ्यास करून 2 लाख रुपयांची सरसकट शेतकरी कर्जमाफी केली. परंतु महाराष्ट्र सरकारचा अभ्यास अजूनही अपूर्णच आहे. पंजाबची कर्जमाफी उत्तर प्रदेशपेक्षाही उत्तम आणि महाराष्ट्र सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.कर्जमाफीच्या निकषांसंदर्भात सुकाणू समितीने सरकारविरुद्ध रोष व्यक्त केल्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. याप्रसंगी ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने आता चर्चेचा फार्स बंद करावा. मुळात सरकारला शेतकरी कर्जमाफी करायची आहे की नाही, हाच मोठा प्रश्न आहे. सरकारने सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. त्याऐवजी आता फक्त एक लाख रुपये माफ करण्याची भाषा केली जाते आहे. त्यातही कर्जमाफीसाठी पात्र ठरण्यासाठीच्या तारखेचा प्रश्न मोठा आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये कर्जाचे पुनर्गठन झाले होते. त्यामुळे 30 जून 2016 पर्यंतची थकबाकी माफ होणार असेल तर ती बहुसंख्य शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या निकषाबाहेर काढणारी ठरेल. त्यामुळेच थकबाकीची तारीख 31 मार्च 2017 असावी, अशी मागणी आम्ही यापूर्वीच केली आहे.10 हजार रुपये देण्यासंदर्भातील अटींमधून सरकारची बौद्धिक दिवाळखोरी उघडखरिपाच्या पेरणीकरिता शेतकऱ्यांना 10 हजार रुपये अग्रिम कर्ज देण्यासंदर्भात घातलेल्या अटींमधून सरकारची बौद्धिक दिवाळखोरी दिसून आली. शेतकऱ्यांना मदत करण्याची प्रामाणिक इच्छा होती तर सरकारने कोणतीही अट न घालता सरसकट 10 हजार रुपये द्यायला हवे होते. परंतु त्याऐवजी 100 अटी घालून सरकार आगीत तेल ओतले आहे, असेही विखे पाटील यांनी सांगितले.वर्षभरात सुमारे 17 हजार बालमृत्यूकुपोषण व बालमृत्युच्या प्रश्नाकडे सरकारने शेतकरी आत्महत्येइतक्याच गांभीर्याने पहावे, या उच्च न्यायालयाच्या ताशेऱ्याबद्दल बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, या समस्येची तीव्रता आणि त्यासंदर्भात संबंधित विभागांचा कोडगेपणा, या विषयावर आम्ही मागील दोन वर्षांपासून सरकारचे लक्ष वेधतो आहे. पण् वर्षभरात सुमारे 17 हजार बालमृत्यू झाल्यानंतरही सरकारला या विषयाचे गांभीर्य कळालेले नाही.बालमृत्युबाबत आरोग्य मंत्र्यांनी खोटी माहिती दिलीआरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी नुकतेच जाहीरपणे सांगितले की, मे महिन्यात पालघर जिल्ह्यात एकही बालमृत्यू झाला नाही. मात्र त्यांच्याच आरोग्य विभागाने मे महिन्यात पालघर जिल्ह्यात 37 बालमृत्यू झाल्याचे मान्य केले आहे. मंत्री एक सांगतात आणि त्यांचे मंत्रालय दुसरेच सांगते. यावरून शिवसेनेचे एकूणच ताळतंत्र गेले असून, मंत्र्यांनीच खोटी माहिती दिली आहे. अर्थात त्यात त्यांचा दोष नाही. कारण आरोग्य मंत्र्यांच्या पक्षाच्या नेत्यांचाच ताळतंत्र सुटलेला आहे, असे टीकास्त्र विरोधी पक्षनेत्यांनी सोडले. राज्यपालांच्या निर्देशानंतर सरकारने कुपोषणासंदर्भात टास्क फोर्स स्थापन केला. त्या टास्क फोर्सने तयार केलेल्या 44 पानांच्या अहवालातील 43 पाने कुपोषणग्रस्त जिल्ह्यांची भौगोलिक माहिती, ऐतिहासिक स्थळांची माहिती, पर्यटन स्थळांची माहिती अशा असंबद्ध माहितीने भरलेली आहेत. संपूर्ण अहवालात फक्त एका पानावर कुपोषणाची चर्चा आहे. यातून राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत या जिल्ह्यांमध्ये कुपोषणाची पाहणी करायला गेले होते की पर्यटनाला,अशी विचारणा विखे पाटील यांनी केली.भाजपने सुरू केली गुन्हेगारांच्या शुद्धीकरणाची मोहीमसहा वर्षांसाठी अपात्र ठरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय पक्षांच्या सदस्यांबाबत अंतिम निर्णयाचे अधिकार राज्य शासनाकडे असण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या निर्णयावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने सध्या गुन्हेगारांच्या शुद्धीकरणाची मोहिम हाती घेतली आहे. राज्यातील अनेक गुंड या मोहिमेत पावन झाले आहेत. मंत्रिमंडळाचा हा निर्णय म्हणजे याच शुद्धीकरण मोहिमेचा एक भाग असल्याचा टोला त्यांनी लगावला.