शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
4
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
5
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
6
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
7
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
8
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
9
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
10
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
11
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
12
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
13
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
14
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
15
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
16
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
18
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
19
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
20
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या

इंग्रजी भाषेने पोट भरेल, पण मन नाही

By admin | Updated: March 13, 2016 02:05 IST

राज्यस्तरीय बालकुमार युवासाहित्य संमेलनाचे उद्घाटनप्रसंगी दासू वैद्य यांचे प्रतिपादन.

हर्षनंदन वाघ/बुलडाणा मराठी भाषेचे व्यावसायिक महत्त्व सिद्ध न करता आल्यामुळे इंग्रजीचं स्तोम माजले आहे. चांगल्या दज्रेदार मराठी शाळा आपल्याला चालवता आल्या नाहीत. अशा परिस्थितीत इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या मुलांना मराठी साहित्याकडे जाणीवपूर्वक वळवावे लागेल. इंग्रजी भाषेने पोट भरेल; पण मन भरणार नाही, असे मत राज्यस्तरीय बालकुमार युवासाहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी दासू वैद्य यांनी व्यक्त केले.स्थानिक गर्दे वाचनालयाच्या संत चोखामेळा साहित्य परिसरात राज्यस्तरीय बालकुमार युवासाहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संमेलनाचे उद्घाटक कवी, गीतकार प्रसाद कुलकर्णी, स्वागताध्यक्ष अरुणा कुल्ली, निमंत्रक आमदार हर्षवर्धन सपकाळ व अन्य मान्यवर उपस्थित होते. आजचे बालकुमार, युवकांची पिढी गतिमान असून, त्यांच्यासमोर असलेली आधुनिक प्रसार माध्यमे गोंधळ निर्माण करीत आहेत. माध्यमाद्वारे काही चुकीच्या बाबी समोर येतात, असे नाही; पण अधिक विचारपूर्वक ही माध्यमे वापरण्याची वेळ आली आहे. केवळ माध्यमेच नव्हे तर समाज व कुटुंबानेही जबाबदारी घेऊन बाल कुमारांशी संवाद वाढवण्याचे काम झाले पाहिजे, त्यासाठीच अशी साहित्य संमेलने आवश्यक असल्याचे मत वैद्य यांनी मांडले. आयुष्याचे पुस्तक वाचता आले तर तो जीवनात यशस्वी होतो. आयुष्यात मोठे व्हायचे असेल, तर विचार, संस्कृतीचे अभिसरण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रसाद कुलकर्णी यांनी केले.