शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
2
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
3
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
4
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
5
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
6
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
7
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
8
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
9
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
10
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
11
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
12
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
13
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
14
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
15
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
16
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
17
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
18
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
19
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
20
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी भाषेने पोट भरेल, पण मन नाही

By admin | Updated: March 13, 2016 02:05 IST

राज्यस्तरीय बालकुमार युवासाहित्य संमेलनाचे उद्घाटनप्रसंगी दासू वैद्य यांचे प्रतिपादन.

हर्षनंदन वाघ/बुलडाणा मराठी भाषेचे व्यावसायिक महत्त्व सिद्ध न करता आल्यामुळे इंग्रजीचं स्तोम माजले आहे. चांगल्या दज्रेदार मराठी शाळा आपल्याला चालवता आल्या नाहीत. अशा परिस्थितीत इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या मुलांना मराठी साहित्याकडे जाणीवपूर्वक वळवावे लागेल. इंग्रजी भाषेने पोट भरेल; पण मन भरणार नाही, असे मत राज्यस्तरीय बालकुमार युवासाहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी दासू वैद्य यांनी व्यक्त केले.स्थानिक गर्दे वाचनालयाच्या संत चोखामेळा साहित्य परिसरात राज्यस्तरीय बालकुमार युवासाहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संमेलनाचे उद्घाटक कवी, गीतकार प्रसाद कुलकर्णी, स्वागताध्यक्ष अरुणा कुल्ली, निमंत्रक आमदार हर्षवर्धन सपकाळ व अन्य मान्यवर उपस्थित होते. आजचे बालकुमार, युवकांची पिढी गतिमान असून, त्यांच्यासमोर असलेली आधुनिक प्रसार माध्यमे गोंधळ निर्माण करीत आहेत. माध्यमाद्वारे काही चुकीच्या बाबी समोर येतात, असे नाही; पण अधिक विचारपूर्वक ही माध्यमे वापरण्याची वेळ आली आहे. केवळ माध्यमेच नव्हे तर समाज व कुटुंबानेही जबाबदारी घेऊन बाल कुमारांशी संवाद वाढवण्याचे काम झाले पाहिजे, त्यासाठीच अशी साहित्य संमेलने आवश्यक असल्याचे मत वैद्य यांनी मांडले. आयुष्याचे पुस्तक वाचता आले तर तो जीवनात यशस्वी होतो. आयुष्यात मोठे व्हायचे असेल, तर विचार, संस्कृतीचे अभिसरण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रसाद कुलकर्णी यांनी केले.