शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

रेल्वे करणार ४० हजार कोटींच्या ऊर्जेची बचत

By admin | Updated: May 10, 2017 02:25 IST

देशाच्या विकासात रेल्वेचे मौलिक योगदान असूनदेखील आतापर्यंत पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आला नव्हता.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या विकासात रेल्वेचे मौलिक योगदान असूनदेखील आतापर्यंत पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आला नव्हता. मात्र, आता रेल्वेच्या विकासावर आम्ही भर देत आहोत. रेल्वेला ‘इकोफ्रेंडली‘ बनविण्याचे प्रयत्न सुरू असून पाणी, ऊर्जा यांची बचत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुढील १० वर्षांत सौरऊर्जेचा वापर वाढवून सुमारे ४० हजार कोटी रुपयांच्या ऊर्जेची बचत करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. विदर्भातून नव्याने सुरू झालेल्या रेल्वेगाड्यांना मंगळवारी हिरवा झेंडा दाखविण्यात आला. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या २० योजनांचा शुभारंभदेखील करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.नागपूर रेल्वे स्थानकावर झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास आणि वन राज्यमंत्री राजे अंबरीश आत्राम उपस्थित होते. रेल्वेचे काम प्रचंड प्रमाणात वाढले, मात्र त्या तुलनेत विकास झाला नाही. प्रवाशांची क्षमता १,७४० पटींनी वाढली, तर पायाभूत सुविधा केवळ ३४ पटींनी वाढल्या. हीच बाब लक्षात घेऊन गेल्या अडीच वर्षांत आम्ही रेल्वेच्या विकासावर साडेतीन लाख कोटींची गुंतवणूक केली. रेल्वेची क्षमता वाढविण्यावर आमचा भर आहे. प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन योजना राबविण्यात येत आहेत. ठिकठिकाणी पाणी शुद्धीकरण प्रकल्प, स्वच्छ ‘बेडरोल’ पुरविण्यासाठी ‘मेकॅनाईज्ड लॉन्ड्री’, दोन रुपयांत शुद्ध पिण्याचे पाणी इत्यादी प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती प्रभू यांनी दिली. नागपुरातील अजनी व गोधनी ही भविष्यात मोठी रेल्वे स्थानके होतील. गडचिरोली-वडसा या रेल्वेमार्गामुळे आदिवासींचे जीवनमान उंचाविण्यास मदत होईल. अजनी व खापरी स्थानकांचा विकास ‘मल्टिमॉडेल हब’ म्हणून करण्यात येईल. त्यासाठी सुमारे ८०० कोटी रुपये खर्च करण्याची आमच्या मंत्रालयाची तयारी आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. नागपूर-नागभीड ‘ब्रॉडगेज’ला लवकरच ‘नीती’ आयोगाची मंजुरी मिळेल व याचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल, असेदेखील त्यांनी सांगितले.