शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
2
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
3
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
4
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
5
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
6
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
7
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
8
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
9
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
10
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
11
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
12
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
13
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
14
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
15
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
16
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
17
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
18
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
19
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
20
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनाच्या शेवटी सरकारला डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 04:39 IST

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारसाठी विधिमंडळाच्या चालू अधिवेशनाचे शेवटचे चार दिवस अत्यंत डोकेदुखीचे ठरतील, अशी चिन्हं आहेत.

मुंबई : भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारसाठी विधिमंडळाच्या चालू अधिवेशनाचे शेवटचे चार दिवस अत्यंत डोकेदुखीचे ठरतील, अशी चिन्हं आहेत. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी अधिवेशन पुन्हा सुरू होताना सरकारची कसोटी लागणार आहे.गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी मंगळवारपासून पुन्हा आक्रमक होईल. त्यातच एमआयडीसीने शेतकºयांच्या हजारो एकर जमिनी मोकळ्या केल्याच्या मुद्यावरून उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. एमआयडीसीसाठी संपादनाची नोटीस देण्यात आलेल्या जमिनी मूळ मालकांना कालांतराने परत करण्याचे हे प्रकरण आहे. नियमानुसार अशा जमिनी परत करता येतात पण तसे करताना आतबट्टयाचे व्यवहार झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. अर्थात अधिवेशनाच्या उर्वरित चार दिवसांत विरोधक ते कसे सिद्ध करतात हे महत्त्वाचे असेल.सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्यातील लोकमंगल कारखान्याने शेतकºयांच्या नावावर परस्पर कर्ज उचलल्याप्रकरणी आता शेतकरीच रस्त्यावर आले आहेत. या मुद्यावरून विरोधक त्यांची अधिवेशनात कोंडी करतील, अशी शक्यता आहे.मराठा मोर्चाचे आव्हानआरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाचा अभूतपूर्व मोर्चा ९ आॅगस्टला मुंबईत धडकणार आहे. या मोर्चाची हाताळणी, मोर्चेकºयांच्या मागण्यांबाबत घ्यावयाची भूमिका यावरूनही फडणवीस सरकारची परीक्षाच असेल.मराठा समाजाच्या मोर्चाची योग्य रीतीने हाताळणी हा मुख्यमंत्री देवेंद्र यांचा आगामी दोन दिवसांसाठीचा अजेंडा असेल. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की मेहता यांच्या राजीनाम्याबाबत वा त्यांना मंत्रिमंडळातून काढण्याबाबत कोणतीही चर्चा अद्याप भाजपात वरिष्ठ पातळीवर झालेली नाही. मुख्यमंत्री विधिमंडळात मेहतांची पाठराखण करतील, अशी शक्यता अधिक आहे.प्रकाश मेहतांच्या राजीनाम्यावर आम्ही ठाम आहोत. या शिवाय, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसीच्या जमिनी मोकळ्या केल्याचे प्रकरण भयंकर आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल’ने फसवणूक केल्याचा आरोप करीत शेतकरीच रस्त्यावर उतरले आहेत. पारदर्शकतेवरील या प्रश्नांची उत्तरे सरकारला द्यावीच लागतील.- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा.