शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

अधिवेशनाच्या शेवटी सरकारला डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 04:39 IST

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारसाठी विधिमंडळाच्या चालू अधिवेशनाचे शेवटचे चार दिवस अत्यंत डोकेदुखीचे ठरतील, अशी चिन्हं आहेत.

मुंबई : भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारसाठी विधिमंडळाच्या चालू अधिवेशनाचे शेवटचे चार दिवस अत्यंत डोकेदुखीचे ठरतील, अशी चिन्हं आहेत. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी अधिवेशन पुन्हा सुरू होताना सरकारची कसोटी लागणार आहे.गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी मंगळवारपासून पुन्हा आक्रमक होईल. त्यातच एमआयडीसीने शेतकºयांच्या हजारो एकर जमिनी मोकळ्या केल्याच्या मुद्यावरून उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. एमआयडीसीसाठी संपादनाची नोटीस देण्यात आलेल्या जमिनी मूळ मालकांना कालांतराने परत करण्याचे हे प्रकरण आहे. नियमानुसार अशा जमिनी परत करता येतात पण तसे करताना आतबट्टयाचे व्यवहार झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. अर्थात अधिवेशनाच्या उर्वरित चार दिवसांत विरोधक ते कसे सिद्ध करतात हे महत्त्वाचे असेल.सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्यातील लोकमंगल कारखान्याने शेतकºयांच्या नावावर परस्पर कर्ज उचलल्याप्रकरणी आता शेतकरीच रस्त्यावर आले आहेत. या मुद्यावरून विरोधक त्यांची अधिवेशनात कोंडी करतील, अशी शक्यता आहे.मराठा मोर्चाचे आव्हानआरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाचा अभूतपूर्व मोर्चा ९ आॅगस्टला मुंबईत धडकणार आहे. या मोर्चाची हाताळणी, मोर्चेकºयांच्या मागण्यांबाबत घ्यावयाची भूमिका यावरूनही फडणवीस सरकारची परीक्षाच असेल.मराठा समाजाच्या मोर्चाची योग्य रीतीने हाताळणी हा मुख्यमंत्री देवेंद्र यांचा आगामी दोन दिवसांसाठीचा अजेंडा असेल. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की मेहता यांच्या राजीनाम्याबाबत वा त्यांना मंत्रिमंडळातून काढण्याबाबत कोणतीही चर्चा अद्याप भाजपात वरिष्ठ पातळीवर झालेली नाही. मुख्यमंत्री विधिमंडळात मेहतांची पाठराखण करतील, अशी शक्यता अधिक आहे.प्रकाश मेहतांच्या राजीनाम्यावर आम्ही ठाम आहोत. या शिवाय, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसीच्या जमिनी मोकळ्या केल्याचे प्रकरण भयंकर आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल’ने फसवणूक केल्याचा आरोप करीत शेतकरीच रस्त्यावर उतरले आहेत. पारदर्शकतेवरील या प्रश्नांची उत्तरे सरकारला द्यावीच लागतील.- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा.