शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

हिंदुस्थानी रोहिंग्यांची ब्याद आताच संपवा! नगरमधील मुस्लिमांनी निषेध करावा हे भयंकरच - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 10:45 IST

म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्नावर नगरमध्ये एका मुस्लिम गटाने आंदोलन केले. त्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून अत्यंत कडवट भाषेत टीका केली आहे.

ठळक मुद्देरोहिंग्यांसाठी नगरमधील मुसलमानांच्या एका गटाने निषेध करावा हे भयंकरच आहे. ज्यांना जगाच्या नकाशावर म्यानमार कुठे आहे ते माहीत नाही असे लोक रोहिंग्यांसाठी छाती पिटतात.

मुंबई, दि. 11 - म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्नावर नगरमध्ये एका मुस्लिम गटाने आंदोलन केले. त्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून अत्यंत कडवट भाषेत टीका केली आहे. रोहिंग्यांसाठी नगरमधील मुसलमानांच्या एका गटाने निषेध करावा हे भयंकरच आहे. ज्यांना जगाच्या नकाशावर म्यानमार कुठे आहे ते माहीत नाही असे लोक रोहिंग्यांसाठी छाती पिटतात. महाराष्ट्रात ही कीड वळवळू लागली असेल तर या हिंदुस्थानी रोहिंग्यांची ब्याद आताच संपवायला हवी असे अग्रलेखात म्हटले आहे. 

जगभरात मुसलमानांवर कुठेही अन्याय वगैरे झाला की हिंदुस्थानातील मुसलमानांच्या अंगास खाज सुटते व ते ‘इस्लाम खतरे में’च्या नावाने उगाच खाजवू लागतात. म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांवर अन्याय-अत्याचार होत असल्याचे सांगत नगरमधील मुसलमानांनी रस्त्यावर येऊन शुक्रवारी आंदोलन केले व म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षांचा पुतळा जाळून निषेध केला. नगरमधील ज्या मुसलमानांनी हे उद्योग केले त्यांना म्यानमार म्हणजे मालेगाव किंवा मुंबईतील मालवणी वाटले काय?  असा सवाल अग्रलेखात विचारला आहे. 

एरवी सामनाच्या अग्रलेखातून सातत्याने मोदींवर टीका सुरु असते. पण रोहिंग्या मुस्लिमांना आश्रय न देण्याच्या मोदींच्या भूमिकेबद्दल त्यांचे कैतुक केले आहे. रोहिंग्या मुसलमानांना निर्वासित म्हणून हिंदुस्थानात आश्रय द्यावा अशा राजकीय खटपटी-लटपटी येथील काही बेगडी निधर्मीवाद्यांनी केल्या. ‘मानवता’ वगैरे शब्दांचे बुडबुडे त्यांनी फोडले तरी पंतप्रधान मोदी अजिबात बधले नाहीत. त्याबद्दल आम्ही त्यांचे खास अभिनंदन करीत आहोत. 

काय म्हटले आहे अग्रलेखात - रोहिंग्यांसाठी नगरमधील मुसलमानांच्या एका गटाने निषेध करावा हे भयंकरच आहे. ज्यांना जगाच्या नकाशावर म्यानमार कुठे आहे ते माहीत नाही असे लोक रोहिंग्यांसाठी छाती पिटतात. महाराष्ट्रात ही कीड वळवळू लागली असेल तर या हिंदुस्थानी रोहिंग्यांची ब्याद आताच संपवायला हवी. नगरच्या ‘रोहिंग्यां’ना राजकीय पाठबळ मिळू नये. कोणी देण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांच्या रोहिंग्याप्रेमाचाही बंदोबस्त करावाच लागेल!

- जगभरात मुसलमानांवर कुठेही अन्याय वगैरे झाला की हिंदुस्थानातील मुसलमानांच्या अंगास खाज सुटते व ते ‘इस्लाम खतरे में’च्या नावाने उगाच खाजवू लागतात. म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांवर अन्याय-अत्याचार होत असल्याचे सांगत नगरमधील मुसलमानांनी रस्त्यावर येऊन शुक्रवारी आंदोलन केले व म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षांचा पुतळा जाळून निषेध केला. नगरमधील ज्या मुसलमानांनी हे उद्योग केले त्यांना म्यानमार म्हणजे मालेगाव किंवा मुंबईतील मालवणी वाटले काय? ज्यांनी रस्त्यावर उतरून हा निषेध वगैरे केला त्यांना म्यानमार कुठे आहे व तिथे काय चालले आहे, मुळात रोहिंग्या मुसलमानांची समस्या आहे तरी काय याबाबत काही माहिती आहे काय? रोहिंग्या मुसलमानांचा प्रश्न हा म्यानमार देशाचा अंतर्गत प्रश्न असून रोहिंग्यांमुळे त्या देशाच्या अखंडतेस व सुरक्षेस धोका निर्माण झाल्याने त्यांच्यावर तिथे कठोर कारवाई सुरू आहे. रोहिंगे मुसलमान हे पाकिस्तानच्या अझहर मसूद वगैरे दहशतवादी मंडळींचे फतवे मानतात व धार्मिक तेढ निर्माण करून फुटीरतेची बीजे रोवतात. त्यांना म्यानमारचा तुकडा पाडायचा आहे. अशा फुटीरतावाद्यांना दयामाया दाखवणे कोणत्याही देशाला परवडणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचे बुलडोझर फिरताच पळापळ झाली व इतर देशांत त्यांची घुसखोरी झाली. या रोहिंग्यांच्या नावाने पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचे म्होरके गळा काढीत आहेत हे कसले लक्षण समजायचे व अशा रोहिंग्यांसाठी नगरमधील मुसलमानांच्या एका गटाने निषेध करावा हेसुद्धा भयंकरच आहे. 

- रोहिंग्या मुसलमानांना निर्वासित म्हणून हिंदुस्थानात आश्रय द्यावा अशा राजकीय खटपटी-लटपटी येथील काही बेगडी निधर्मीवाद्यांनी केल्या. ‘मानवता’ वगैरे शब्दांचे बुडबुडे त्यांनी फोडले तरी पंतप्रधान मोदी अजिबात बधले नाहीत. त्याबद्दल आम्ही त्यांचे खास अभिनंदन करीत आहोत. प. बंगाल व आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांनी आधीच हैदोस घातला आहे. त्यात आता या म्यानमारी रोहिंग्यांची भर नको. मागे एकदा म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांवरील कारवाईची छायाचित्रे ‘व्हायरल’ करून येथील मुसलमानांच्या खोपड्या भडकवून दंगा पेटविण्याचा प्रयत्न झाला होता. मुंबईच्या आझाद मैदानातदेखील काही वर्षांपूर्वी धर्मांध मुस्लिमांनी दुसऱ्या देशातील वादावरूनच धुडगूस घातला होता. तेथील शहीद जवानांच्या अमर जवान ज्योतीची तोडफोड करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. तेव्हा इतर देशांतील मुस्लिमांबाबतच्या वादग्रस्त घटनांवरून आमच्याकडे अशा ठिणग्या पडतच असताना सरकारने रोहिंग्यांच्या प्रश्नाबाबत अति सावधान राहणे गरजेचे आहे. ज्यांना जगाच्या नकाशावर म्यानमार कुठे आहे ते माहीत नाही असे लोक रोहिंग्यांसाठी छाती पिटतात. महाराष्ट्रात ही कीड वळवळू लागली असेल तर या हिंदुस्थानी रोहिंग्यांची ब्याद आताच संपवायला हवी. नगरच्या ‘रोहिंग्यां’ना राजकीय पाठबळ मिळू नये. कोणी देण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांच्या रोहिंग्याप्रेमाचाही बंदोबस्त करावाच लागेल!

टॅग्स :Shiv Senaशिवसेना