शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबरअखेर बँक सुरू होणार

By admin | Updated: November 7, 2014 00:46 IST

केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी निर्णय आणि नाबार्डच्या अहवालानंतर नागपूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेला आर्थिक परवाना मिळून व्यवहार यावर्षीच्या डिसेंबरअखेर सुरू होण्याचे संकेत आहेत.

नागपूर जिल्हा बँक : शेतकऱ्यांना कर्जपुरवठा शक्यनागपूर : केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी निर्णय आणि नाबार्डच्या अहवालानंतर नागपूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेला आर्थिक परवाना मिळून व्यवहार यावर्षीच्या डिसेंबरअखेर सुरू होण्याचे संकेत आहेत. कर्जवसुलीनंतरच शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज पुरवठा करणे शक्य असल्याची माहिती आहे.बँकेकडे पुरेसा फंडकेंद्र व राज्य सरकार आणि नाबार्डच्या मदतीने बँक कशी सुरू होणार, यावर चर्चा सुरू आहे. बँकिंग तज्ज्ञांनी सांगितले की, बँकेकडे पुरेसा फंड आहे. नियमानुसार बँकेचा एसएलआर (ठेवीच्या बदल्यात गुंतवणूक) २२ टक्के असायला हवा, पण तो २५ टक्के अर्थात १६५ कोटी आहे. शिक्षकांचे पगार अन्य बँकेतून व्हायला लागले, त्यावेळी जिल्हा बँकेचे शिक्षकांवर २३५ कोटींचे कर्ज होते. त्यातून ६० कोटी रुपये वसूल झाले आहेत आणि १०० कोटी रुपये वसूल होतील, अशी अपेक्षा आहे. याआधी बँकेला व्यवहार सुरू करण्यासाठी ३१ मार्च २०१४ पर्यंत ९३ कोटी अर्थात ४ टक्के सीआरएआर (कॅपिटल रिस्क वेट अ‍ॅसेट रेशो)ची गरज होती. त्यानुसार पूर्वीच्या राज्य शासनाने १९ जून २०१४ च्या कॅबिनेट बैठकीत ९२.९४ कोटी रुपये मंजूर केले होते. पण रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ३१ मार्च २०१५ पर्यंत बँकेला ७ टक्के सीआरएआर कायम ठेवावा लागेल. ही रक्कम १३१ कोटी एवढी आहे. तसे पाहता एवढीही रक्कम बँकेला लागणार नाही. पण नाबार्डच्या धोरणानुसार ती आवश्यक आहे. सध्या बँकेकडे एसएलआरचे १६५ कोटी आणि शिक्षकांकडून वसूल झालेले ६० कोटी असे एकूण २२५ कोटी आहेत. केंद्राच्या धोरणानुसार बँकेला १३१ कोटी रुपये मिळाल्यास बँकेकडे ३५५ कोटी रुपये होतील; शिवाय शिक्षकांकडून १०० कोटींची वसुली झाल्यास ही रक्कम ४५५ कोटींच्या घरात जाईल. या सकारात्मक दृष्टिकोनातून बँक पुन्हा उभी राहील.शेतकऱ्यांना नव्याने कर्जपुरवठागेल्यावर्षी बँकेने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला नाही. त्याआधीच्या वर्षात शासनाच्या हमीवर महाराष्ट्र स्टेट को-आॅप. बँकेकडून जिल्हा बँकेला मिळालेले ७५ कोटी शेतकऱ्यांना वाटप केले. त्यावेळी वसुली ८१ कोटी रुपयांची झाली होती. मार्चपर्यंत जे शेतकरी थकीत कर्जाचे देय करेल, त्यांनाच कर्जपुरवठा करण्यात येईल, असे बँकेचे धोरण आहे. ठेवीदारांचा तगादाबँकेकडे ८६९ कोटींच्या ठेवी आहेत. पण रिझर्व्ह बँक आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ठेवीदारांना ठेवी परत करणे शक्य नाही. अनेक ठेवीदारांना माहिती आहे की, ठेवी सुरक्षित आहेत. पण शहरी भागातील ठेवीदार ठेवी परतीसाठी तगादा लावतात. त्यांनाही काही वेळ थांबावे लागेल. दोन महिन्यात बँकेची परिस्थिती सुधारल्यानंतर ठेवीदारांचा विचार होऊ शकतो. (प्रतिनिधी)बँकेचा कारभार सुधारला तरच चमत्कार शक्यकेंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाकांक्षी निर्णय घेत विशेष पॅकेजच्या माध्यमातून नागपूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे. हे पॅकेज मंजूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फार मोठे प्रयत्न करावे लागले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यास मदत होईल. पण बँकेला आणि या बँकेवर प्रभुत्व असलेल्या नेत्यांना आपली मानसिकता बदलावी लागेल. शेतकऱ्यांच्या हितापेक्षा व्यक्तिगत स्वार्थ आणि राजकारणाचे साधन म्हणून या बँकेचा वापर होत असेल तर शेकडोवेळा असे पॅकेज दिले तरी काहीच उपयोग होणार नाही. शेतकऱ्यांचे हित आणि स्वच्छ कारभार असेल तरच डबघाईस आलेली ही बँक पुन्हा नव्या दमाने उभी राहील, अशी अपेक्षा सहकारी क्षेत्रातील प्रामाणिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.