शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

पालघरच्या सीमेवर गुजरातकडून अतिक्रमण; जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीत नागरिकांनी सांगितली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 12:04 IST

गुजरात प्रशासनाने कोरोना काळात मुख्य रस्त्यावर पत्रे लावून रस्ते बंद केले हाेते. एवढेच नव्हे आजूबाजूच्या गावात येण्या - जाण्यास बंदी केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कतलासरी : गुजरात राज्यातील यंत्रणा जाणीवपूर्वक पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी व झाई गावांमध्ये अतिक्रमण करीत आहे. महाराष्ट्राच्या हद्दीत विद्युत खांब टाकत आहे. दोन राज्यांच्या सीमेवर महाराष्ट्राच्या नागरिकांची अडवणूक करत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केलेल्या या गावांच्या पाहणीवेळी नागरिकांनी केली.

गुजरात प्रशासनाने कोरोना काळात मुख्य रस्त्यावर पत्रे लावून रस्ते बंद केले हाेते. एवढेच नव्हे आजूबाजूच्या गावात येण्या - जाण्यास बंदी केली होती. त्यामुळे वेवजी व झाई येथे भूमापन करून सीमा निश्चित करण्याची मागणी वेवजी गावचे नागरिक अनेक वर्षांपासून करीत आहेत. गुजरात राज्याची यंत्रणा त्याला विरोध करीत असून, महाराष्ट्रातील अधिकारीही डोळ्यावर झापड ओढून बसले आहेत, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. पालघरचे  जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी बुधवारी दुपारी तलासरी तालुक्यातील वेवजी व झाई  या सीमावर्ती गावांना भेट देऊन तेथील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. 

महाराष्ट्र - गुजरात राज्यात विभाजन   अगोदर उंबरगाव तालुका होता. विभाजनानंतर तलासरी तालुका निर्माण करून उंबरगाव गुजरातमध्ये गेले. ज्येष्ठ नागरिकांच्या मतानुसार रेल्वे लाइनच्या पलीकडे गुजरात व अलीकडे महाराष्ट्र होते. तसे सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्तंभही होते. बांधकाम खाते रेल्वे लाइनपर्यंत रस्तेही बनवत होते. पण, कालांतराने गुजरातने एक किमीपर्यंत आपली हद्द दाखवून तेथे वसाहती निर्माण केल्या.

दादागिरी थांबवावेवजीचे उपसरपंच अनंता खुलात तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते बबला धोडी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सीमा निश्चितीची मागणी केली.

टॅग्स :palgharपालघरGujaratगुजरात