शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

राज्यातील सर्व नगरपालिकांचे कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 03:00 IST

विविध मागण्यांवर शासनाने तोडगा काढला नसल्याचा आरोप करत, कर्मचा-यांच्या नगरपालिका व नगर पंचायत कर्मचारी संघटना संघर्ष समितीने या बेमुदत संपाची हाक दिली आहे.

मुंबई : राज्यातील ३५९ नगरपालिका, तसेच नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांनी नव्या वर्षाची सुरुवातच बेमुदत संपापासून केली आहे. रोजंदारी कर्मचा-यांसह ग्रामपंचायत कर्मचा-यांचे समावेशन आणि सातव्या वेतन आयोगासारख्या विविध मागण्यांवर शासनाने तोडगा काढला नसल्याचा आरोप करत, कर्मचा-यांच्या नगरपालिका व नगर पंचायत कर्मचारी संघटना संघर्ष समितीने या बेमुदत संपाची हाक दिली आहे. या संपात अत्यावश्यक सेवांचाही समावेश केल्याची माहिती संघर्ष समितीचे नेते विश्वनाथ घुगे यांनी दिली.घुगे यांनी सांगितले की, नगर परिषद, तसेच नगरपंचायतीमधील सर्व कर्मचाºयांना १ जानेवारी, २०१६ पासून विनाअट सातवा वेतन आयोग लागू करण्याची संघटनेची प्रमुख मागणी आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी २५ आॅगस्ट, २०१७च्या बैठकीत दिलेल्या आश्वासनानुसार नगर परिषदेमधील १० मार्च, १९९३ पूर्वीचे, तसेच २००० पूर्वीच्या सर्व रोजंदारी कर्मचाºयांना ३१ डिसेंबर, २०१८ पूर्वी कायम करावे, अशा विविध मागण्यांवर सरकारने तोंडी व लेखी आश्वासने दिली होती. मात्र, त्यानंतरही शासन त्याची अंमलबजावणी करत नसल्याने, संघर्ष समितीने टप्प्याटप्प्याने आंदोलन पुकारले होते. त्यात १५ डिसेंबरला राज्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतीबाहेर कामगारांनी राज्यव्यापी निदर्शने करत शासनाचे लक्ष वेधले होते.याकडे शासनाने दुर्लक्ष केल्यानंतर पुन्हा संघर्ष समितीने२९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत काळ्या फिती लावून काम करत शासनाला मागण्यांची आठवण करून दिली. या आंदोलनाची दखल न घेतल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही दिला होता, तरीही शासनाने मान्य मागण्यांची अंमलबजावणी न केल्यास १ जानेवारीपासून बेमुदत संप करणार असल्याचे घुगे यांनी स्पष्ट केले.आश्वासनांच्या अंमलबजावणीची मागणीसंपामुळे पाणीपुरवठा, साफसफाई तसेच अन्य सेवांवर परिणाम होणार असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागेल. मात्र, कोणत्याही नव्या मागणीसाठी हा संप कर्मचारी करत नसून, शासनानेच दिलेल्या लेखी आश्वासनांची अंमलबजावणी करण्याची संघर्ष समितीची मागणी आहे. वारंवार इशारा दिल्यानंतरही शासनाने मान्य मागण्यांची अंमलबजावणी केली नसल्याने संघर्ष समितीने नाइलाजास्तव अत्यावश्यक सेवांसह सर्व सेवा-सुविधा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे संघर्ष समितीने स्पष्ट केले.

टॅग्स :Strikeसंप