शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी संपावर; जंगल वाऱ्यावर

By admin | Updated: August 26, 2014 00:59 IST

राज्यभरातील हजारो वन कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. वन कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे वन विभाग चांगलाच अडचणीत सापडला आहे. विशेष म्हणजे, उद्या (मंगळवारी) पोळ््याचा

आंदोलन : पोळ््याच्या पर्वावर शिकाऱ्यांची ‘दिवाळी’ नागपूर : राज्यभरातील हजारो वन कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. वन कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे वन विभाग चांगलाच अडचणीत सापडला आहे. विशेष म्हणजे, उद्या (मंगळवारी) पोळ््याचा पाडवा आहे. आजपर्यंतचा अनुभव पाहता, या दिवशी जंगलातील वन्यप्राण्यांच्या शिकारींची सर्वांधिक भीती असते. त्यामुळे पाडव्याच्या पूर्वसंध्येला रात्रभर जंगलात गस्त घातल्या जाते. मात्र यंदा वन कर्मचाऱ्यांनी ऐन पोळ््याच्या दिवशी पुकारलेल्या या संपामुळे शिकाऱ्यांना रान मोकळे मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे अध्यक्ष अजय पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. यात सोमवारी संविधान चौकात शेकडो वन कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन, आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष्य वेधले. याशिवाय राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. वन विभागातील हजारो वनमजूर, वनरक्षक व वनपाल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना आणि महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटना गत अनेक वर्षांपासून लढा देत आहे. यासाठी अनेकदा आंदोलने झाली. निदर्शने केली. संप झाले. पण तरीही शासनाने आश्वासनापलीकडे काहीच दिले नाही. त्यामुळे आता या दोन्ही संघटना पूर्ण शक्तीनिशी रस्त्यावर उतरल्या आहेत. यासंबंधी अजय पाटील यांनी अलीकडेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन, या आंदोलनाचा निर्णय घेतला होता. शिवाय त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री व प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) यांना एका नोटिसीच्या माध्यमातून यापूर्वीच या आंदोलनाची माहिती दिली होती. मात्र असे असताना, शासनाने आंदोलनावर कोणताही तोडगा काढलेला नाही. वन कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये वनपाल व वनरक्षकाच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यात यावी, निश्चित प्रवास भत्ता देण्यात यावा, राज्य सीमा तपासणी नाक्यावर वनपालाची नियुक्ती करण्यात यावी, पोलीस दलातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोयी-सुविधा व सवलती लागू करण्यात याव्या, वनपाल व वनरक्षकांना २४ तासाऐवजी आठ तासाचे काम देण्यात यावे, दहावी नापास वनपाल व वनरक्षकांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात यावा, रोजंदारी वन कामगारांना वनसेवेत स्थायी करण्यात यावे, १६ आॅक्टोबर २०१२ च्या शासन निर्णयानुसार स्थायी करण्यात आलेल्या वन कामगारांची सेवा गत ३० जून २००४ पासून ग्राह्य धरण्यात यावी, स्थायी वन कामगारांना वनमजुराऐवजी ‘वनसेवक’ म्हणून संबोधण्यात यावे, वनमजूर म्हणून स्थायी झालेल्या वनमजुरांना वर्ग ‘क’ मध्ये पदोन्नती देतांना वर्ग ‘क’ मधील सर्व पदावर देण्यात यावी, वनमजुरांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी व पाच लाख रुपयांचा विमा काढण्यात यावा, अशा विविध मागण्यांचा समावेश आहे. आंदोलनात आर. बी. धोटे, के. जे. बन्सोड, एस. एस. सरकार, पी. पी. कोरे, एम. एस. मोघे, डी. जी. कुशवाह, रमेश गिरी, एकनाथ भोयर, पी. डी. बैस, अनिल खडोतकर, एम. आर. फुकट, आय. ए. जळीत, केशव अहिरकर व रमेश आदमने यांच्यासह महाराष्ट्र वनरक्षक - वनपाल संघटनेचे नरेंद्र पुरी, यू. पी. बावणे, पी. डी. वाघमारे, सतीश जांभूळकर व सुनील फुलझेले यांनी भाग घेतला होता. (प्रतिनिधी)