शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

कर्मचारी संपावर; जंगल वाऱ्यावर

By admin | Updated: August 26, 2014 00:59 IST

राज्यभरातील हजारो वन कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. वन कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे वन विभाग चांगलाच अडचणीत सापडला आहे. विशेष म्हणजे, उद्या (मंगळवारी) पोळ््याचा

आंदोलन : पोळ््याच्या पर्वावर शिकाऱ्यांची ‘दिवाळी’ नागपूर : राज्यभरातील हजारो वन कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. वन कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे वन विभाग चांगलाच अडचणीत सापडला आहे. विशेष म्हणजे, उद्या (मंगळवारी) पोळ््याचा पाडवा आहे. आजपर्यंतचा अनुभव पाहता, या दिवशी जंगलातील वन्यप्राण्यांच्या शिकारींची सर्वांधिक भीती असते. त्यामुळे पाडव्याच्या पूर्वसंध्येला रात्रभर जंगलात गस्त घातल्या जाते. मात्र यंदा वन कर्मचाऱ्यांनी ऐन पोळ््याच्या दिवशी पुकारलेल्या या संपामुळे शिकाऱ्यांना रान मोकळे मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे अध्यक्ष अजय पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. यात सोमवारी संविधान चौकात शेकडो वन कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन, आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष्य वेधले. याशिवाय राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. वन विभागातील हजारो वनमजूर, वनरक्षक व वनपाल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना आणि महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटना गत अनेक वर्षांपासून लढा देत आहे. यासाठी अनेकदा आंदोलने झाली. निदर्शने केली. संप झाले. पण तरीही शासनाने आश्वासनापलीकडे काहीच दिले नाही. त्यामुळे आता या दोन्ही संघटना पूर्ण शक्तीनिशी रस्त्यावर उतरल्या आहेत. यासंबंधी अजय पाटील यांनी अलीकडेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन, या आंदोलनाचा निर्णय घेतला होता. शिवाय त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री व प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) यांना एका नोटिसीच्या माध्यमातून यापूर्वीच या आंदोलनाची माहिती दिली होती. मात्र असे असताना, शासनाने आंदोलनावर कोणताही तोडगा काढलेला नाही. वन कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये वनपाल व वनरक्षकाच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यात यावी, निश्चित प्रवास भत्ता देण्यात यावा, राज्य सीमा तपासणी नाक्यावर वनपालाची नियुक्ती करण्यात यावी, पोलीस दलातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोयी-सुविधा व सवलती लागू करण्यात याव्या, वनपाल व वनरक्षकांना २४ तासाऐवजी आठ तासाचे काम देण्यात यावे, दहावी नापास वनपाल व वनरक्षकांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात यावा, रोजंदारी वन कामगारांना वनसेवेत स्थायी करण्यात यावे, १६ आॅक्टोबर २०१२ च्या शासन निर्णयानुसार स्थायी करण्यात आलेल्या वन कामगारांची सेवा गत ३० जून २००४ पासून ग्राह्य धरण्यात यावी, स्थायी वन कामगारांना वनमजुराऐवजी ‘वनसेवक’ म्हणून संबोधण्यात यावे, वनमजूर म्हणून स्थायी झालेल्या वनमजुरांना वर्ग ‘क’ मध्ये पदोन्नती देतांना वर्ग ‘क’ मधील सर्व पदावर देण्यात यावी, वनमजुरांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी व पाच लाख रुपयांचा विमा काढण्यात यावा, अशा विविध मागण्यांचा समावेश आहे. आंदोलनात आर. बी. धोटे, के. जे. बन्सोड, एस. एस. सरकार, पी. पी. कोरे, एम. एस. मोघे, डी. जी. कुशवाह, रमेश गिरी, एकनाथ भोयर, पी. डी. बैस, अनिल खडोतकर, एम. आर. फुकट, आय. ए. जळीत, केशव अहिरकर व रमेश आदमने यांच्यासह महाराष्ट्र वनरक्षक - वनपाल संघटनेचे नरेंद्र पुरी, यू. पी. बावणे, पी. डी. वाघमारे, सतीश जांभूळकर व सुनील फुलझेले यांनी भाग घेतला होता. (प्रतिनिधी)