शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

राज्यात अवचित भारनियमनाचे संकट

By admin | Updated: October 2, 2014 00:15 IST

कोळसा, गॅसचा तुटवडा : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे बचावले

कोळसा, गॅसचा तुटवडा : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे बचावलेरत्नागिरी : कोळसा व गॅसच्या पुरवठ्यातील तुटीमुळे महावितरणला रोज सुमारे दोन हजार मेगावॅट वीज कमी मिळत आहे. महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पातून किमान ५५०० मेगावॅट वीज अपेक्षित असताना तेथून केवळ ४००० ते ४५०० मेगावॅट वीज मिळत आहे. त्यामुळे राज्यात भारनियमन सुरू करण्यात आले आहे. महानिर्मितीला दररोज किमान ३२ कोळशांचे रेक्स लागतात. परंतु प्रत्यक्षात फक्त १५ ते १६ रेक्स उपलब्ध होतात. सध्या खापरखेडा, पारस, भुसावळ या केंद्रात केवळ एक ते अर्ध्या दिवसांचा कोळसा शिल्लक राहिला आहे. चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रात अडीच दिवसांचा कोळसा शिल्लक राहिला आहे. महानिर्मितीच्या सर्वच विद्युत केंद्रातील कोळशाची स्थिती बिकट असल्याने वीजनिर्मितीवर परिणाम झाला आहे. याशिवाय इंडिया बुल्सकडून कोळशा अभावी २७० मेगावॅट वीज कमी उपलब्ध होत आहे. कोळशाबरोबर गॅस उपलब्धतेच्या अडचणी भासत आहे. गॅस अभावी १९५० मेगावॅटचा रत्नागिरी गॅस प्रकल्प बंद आहे. उरण गॅस केंद्रात १५० मेगावॅट वीजनिर्मीती कमी झाली आहे. याशिवाय अदानी प्रकल्पातून २५०० मेगावॅट वीज अपेक्षित असताना गेल्या काही दिवसात तेथून वेगवेगळ्या कारणामुळे केवळ १५०० ते १७०० मेगावॅट वीज मिळत आहे. गेल्या १५ दिवसांपासून विजेच्या मागणी व पुरवठ्यात मेळ घालण्यात अडचणी निर्माण झाल्याने राज्यात भारनियमन सुरू करण्यात आले आहे. फिडर्सनिहाय भारनियमन करण्यात येत आहे. ड वर्गापासून पुढे भारनियमन करण्यात येत असल्यामुळे कोकण परिमंडलास मात्र दिलासा मिळाला आहे.राज्यात १५ दिवसापूर्वी विजेची मागणी १४,५०० ते १५,५०० मेगावॅट इतकी होती मात्र आता मागणीत वाढ झाली आहे. १६,५०० ते १६,८०० मेगावॅट इतकी वीजेची मागणी होत आहे. गतवर्षी याच दिवसात १२,२०० मेगावॅट इतकी मागणी होती, मात्र त्या तुलनेत सध्याची मागणी तब्बल ४,६०० मेगावॅअ इतकी वाढली आहे. विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणला केंद्रीय विद्युत एक्सचेंजमधून दररोज १,००० ते १,४०० मेगावॅट वीज घेतली जाते. याशिवाय पारदर्शक निविदा प्रक्रियेतून रोज ३०० मेगावॅट विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. उरण गॅस केंद्राला बाजारातून गॅस उपलब्ध करून देण्यासाठीही महावितरण प्रयत्न करीत आहे, जेणेकरून १०० ते १५० मेगावॅट जादा वीज उपलब्ध होई शकते. (प्रतिनिधी)