शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सुरक्षेतील उणीवा दूर, यंत्रणाही सक्षम - देवेंद्र फडणवीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 06:28 IST

२६/११ च्या हल्ल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने सुरक्षेसंदर्भातील उणीवा दूर केल्या आहेत. विविध यंत्रणाही आता सुसज्ज आहेत. परंतु, अशांतता माजविण्यासाठी दहशतवादीदेखील आता नवनवीन हातखंडे वापरू लागले आहेत.

मुंबई : २६/११ च्या हल्ल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने सुरक्षेसंदर्भातील उणीवा दूर केल्या आहेत. विविध यंत्रणाही आता सुसज्ज आहेत. परंतु, अशांतता माजविण्यासाठी दहशतवादीदेखील आता नवनवीन हातखंडे वापरू लागले आहेत. गोळीबारापासून गर्दीच्या ठिकाणी भरधाव गाडी घुसविण्याचेही तंत्र आता वापरले जात आहे. त्यामुळे दहशतवादाविरोधातील लढ्यात आता जनसामान्यांचा सहभाग आवश्यक बनल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.२६/११ च्या हल्ल्यातील हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंच आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंद्रेश कुमार, लेफटनंट जनरल विश्वंभर सिंह, राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचच्या रेश्मा जैन व इतर मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री पुढे म्हणाले, २६/११चा दहशतवादी हल्ला हा देशाच्या आर्थिक केंद्रस्थानावर केलेला हल्ला होता. या हल्ल्यानंतर राज्यात ‘एनएसजी’च्या धर्तीवर फोर्सवनची स्थापना करण्यात आली. समुद्री सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांकडे आता सर्वात आधुनिक कंट्रोल रूम आहे. अशी व्यवस्था २६/११ लाअसती तर जवान आणि अधिकाºयांना आपला जीव गमवावा लागला नसता, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.तर, देशांतर्गत व सीमेवरील सुरक्षासंदर्भात उल्लेखनीय कार्य होतअसून नक्षली कारवाईचे प्रमाण वीस टक्क्यांनी कमी झाल्याचे गृहराज्यमंत्री अहीर यांनी सांगितले. सर्वोत्कृष्ट नवीन बनावटीची उपकरणं, आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक निधी दिला जाईल. त्यात कमतरता पडू देणार नसल्याचे अहिर यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस