शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
4
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
5
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
6
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
7
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
8
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
9
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
10
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
11
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
12
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
13
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
14
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
15
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
16
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
17
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
18
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
19
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
20
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...

सुरक्षेतील उणीवा दूर, यंत्रणाही सक्षम - देवेंद्र फडणवीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 06:28 IST

२६/११ च्या हल्ल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने सुरक्षेसंदर्भातील उणीवा दूर केल्या आहेत. विविध यंत्रणाही आता सुसज्ज आहेत. परंतु, अशांतता माजविण्यासाठी दहशतवादीदेखील आता नवनवीन हातखंडे वापरू लागले आहेत.

मुंबई : २६/११ च्या हल्ल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने सुरक्षेसंदर्भातील उणीवा दूर केल्या आहेत. विविध यंत्रणाही आता सुसज्ज आहेत. परंतु, अशांतता माजविण्यासाठी दहशतवादीदेखील आता नवनवीन हातखंडे वापरू लागले आहेत. गोळीबारापासून गर्दीच्या ठिकाणी भरधाव गाडी घुसविण्याचेही तंत्र आता वापरले जात आहे. त्यामुळे दहशतवादाविरोधातील लढ्यात आता जनसामान्यांचा सहभाग आवश्यक बनल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.२६/११ च्या हल्ल्यातील हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंच आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंद्रेश कुमार, लेफटनंट जनरल विश्वंभर सिंह, राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचच्या रेश्मा जैन व इतर मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री पुढे म्हणाले, २६/११चा दहशतवादी हल्ला हा देशाच्या आर्थिक केंद्रस्थानावर केलेला हल्ला होता. या हल्ल्यानंतर राज्यात ‘एनएसजी’च्या धर्तीवर फोर्सवनची स्थापना करण्यात आली. समुद्री सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांकडे आता सर्वात आधुनिक कंट्रोल रूम आहे. अशी व्यवस्था २६/११ लाअसती तर जवान आणि अधिकाºयांना आपला जीव गमवावा लागला नसता, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.तर, देशांतर्गत व सीमेवरील सुरक्षासंदर्भात उल्लेखनीय कार्य होतअसून नक्षली कारवाईचे प्रमाण वीस टक्क्यांनी कमी झाल्याचे गृहराज्यमंत्री अहीर यांनी सांगितले. सर्वोत्कृष्ट नवीन बनावटीची उपकरणं, आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक निधी दिला जाईल. त्यात कमतरता पडू देणार नसल्याचे अहिर यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस