शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

मराठी साहित्यिकांचाही एल्गार

By admin | Updated: October 14, 2015 04:24 IST

देशातील वाढती असहिष्णुता, जातीय तणाव व हिंसक घटनांमुळे अस्वस्थ झालेल्या देशभरातील साहित्यविश्वातून निषेधाचे सूर उमटत असतानाच आता मराठी साहित्यविश्वातूनही एल्गार पुकारला गेला आहे

मुंबई : देशातील वाढती असहिष्णुता, जातीय तणाव व हिंसक घटनांमुळे अस्वस्थ झालेल्या देशभरातील साहित्यविश्वातून निषेधाचे सूर उमटत असतानाच आता मराठी साहित्यविश्वातूनही एल्गार पुकारला गेला आहे. प्रसिद्ध लेखिका प्रज्ञा दया पवार यांच्यासह हरिश्चंद्र थोरात यांनी देशातील अघोषित आणीबाणीच्या निषेधार्थ राज्य सरकारचे सर्व पुरस्कार, पुरस्काराच्या रकमेसह परत केले असून, तसे त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळविले आहे. अनुवादक गणेश विसपुते आणि संजय भास्कर जोशी हेही पुरस्कार परत करणारांच्या रांगेत उभे आहेत.डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यापाठोपाठ कर्नाटकातील विवेकवादी लेखक कलबुर्गी यांची झालेली हत्या आणि दादरी हत्याकांडाचा निषेध म्हणून आजवर २३ ज्येष्ठ साहित्यिकांनी आपले साहित्य अकादमीचे मानाचे पुरस्कार परत केले आहेत. (प्रतिनिधी)आणीबाणीपेक्षाही सद्य:कालीन आणीबाणीची भीषणता अधिक तीव्र आहे. याचे कारण तेव्हा जनसामान्यांवर फक्त शासनाचीच करडी नजर होती. आता मात्र शासनरहित अगदी आपण जिथे राहतो, वावरतो, नोकरी-व्यवसाय करतो तिथपर्यंत आपल्यावर लक्ष ठेवणारे सत्ताधाऱ्यांचे पक्षसेवक दिसतात. शिक्षण, इतिहास, विज्ञान, कला-साहित्य आणि एकूणच सांस्कृतिक क्षेत्रात अपरिमित दंडेलशाही सुरू आहे. - प्रज्ञा पवार, लेखिका>>पद्मश्री किताब परत करणारमंगळवारी कर्नाटकचे सुप्रसिद्ध साहित्यिक रहमत तरीकेरी यांनीही आपला साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याचा निर्णय जाहीर केला. पाठोपाठ पंजाबच्या नामवंत लेखिका दलीप कौर टिवाणा यांनीही आपला पद्मश्री किताब परत करण्याची घोषणा केली.प्रज्ञा पवार यांनी सर्व सरकारी पुरस्कारांसह १ लाख १३ हजार रुपयांची पुरस्कारांची रक्कमही मुख्यमंत्र्यांना धनादेशाद्वारे पाठविली. हरिश्चंद्र थोरात यांनीही उत्कृष्ठ साहित्यनिर्मितीसाठी २००६ आणि २०११ साली मिळालेल्या पुरस्कारांचे ५२ हजार रुपये, मानचिन्हासह परत केले आहेत.