शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
4
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
5
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
7
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
8
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
9
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे
10
VIRAL : भावाच्या लग्नासाठी कंपनीने सुट्टी नाकारली, त्यानं काय केलं बघाच! आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं 
11
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
12
भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू
13
"याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं"; अंजली कृष्णा यांना अडवणाऱ्याचा सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ
14
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
15
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
16
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार का? कर तज्ज्ञ आणि सीए संघटनांनी काय केली मागणी?
17
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
18
रशियाच्या निशाण्यावर नक्की कोण? रहिवासी भागात डागले ड्रोन, पण झेलेन्स्कींशी आहे थेट कनेक्शन!
19
मंदिरात फुलांच्या रांगोळीतून ऑपरेशन सिंदूर आणि भगवा ध्वज काढल्याने केरळमध्ये वाद, संघाच्या २७ स्वयंसेवकांवर गुन्हा दाखल
20
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?

अकरावी आॅनलाइन प्रवेशाचा गोंधळ सुरूच

By admin | Updated: July 31, 2016 04:45 IST

अकरावीचे वर्ग १ आॅगस्ट पासून सुरू होणार आहेत. मात्र, अजूनही अकरावी प्रवेशाचा गोंधळ मिटलेला नाही.

मुंबई : अकरावीचे वर्ग १ आॅगस्ट पासून सुरू होणार आहेत. मात्र, अजूनही अकरावी प्रवेशाचा गोंधळ मिटलेला नाही. महत्त्वाचे म्हणजे आॅफलाइन प्रवेश मिळतील, या आशेवर काही पालकांनी विद्यार्थ्यांची प्रवेश पूर्व आॅनलाइन नोंदणी केलेली नाही, परंतु आॅनलाइन प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना आता अखेरची संधी देण्यात आली असून, याबाबतची माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांची शनिवारी दादर येथील छबिलदास शाळेत झुंबड उडाली होती.आॅनलाइन प्रवेश अनिवार्य करण्यात आले असले, तरीदेखील आॅफलाइन पद्धतीने प्रवेश मिळवता येतील, या आशेवर असलेल्या अनेक पालकांनी विद्यार्थ्यांची आॅनलाइन नोंदणी केलेली नाही. मात्र, आॅफलाइन पद्धतीने प्रवेश मिळणारच नाही, म्हटल्यावर पालकांनी आता मार्गदर्शन केंद्राबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. १ आॅगस्टपासून कॉलेज सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून ३० आणि ३१ जुलै रोजी आॅनलाइन प्रवेशाची नोंदणी होणार होती. मात्र, तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे करत, शासनातर्फे १ आणि २ आॅगस्टला पुन्हा एकदा आॅनलाइन नोंदणीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ४ आॅगस्ट रोजी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची यादी लावण्यात येणार आहे. दरम्यान, शहर आणि उपनगरातील अनेक महाविद्यालयांमध्ये जागा शिल्लक असून, त्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, असे मार्गदर्शन केंद्राकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)>दीड हजारहून अधिक विद्यार्थ्यांना टोकन मुंबई, ठाणे विभागात मार्गदर्शक केंद्र आहेत. मात्र, पालक आणि विद्यार्थ्यांची अधिक गर्दी दादर येथील छबिलदास शाळेत शनिवारी झाली होती. विरार, वसई, टिटवाळा, बदलापूर येथील विद्यार्थ्यांनीही दादर येथील केंद्रावर चौकशीसाठी गर्दी केली होती. शनिवारी या केंद्रात दीड हजारहून अधिक विद्यार्थ्यांना आॅनलाइन नोंदणीसाठी टोकन देण्यात आले.मार्गदर्शन पुस्तिकांची मागणीआॅनलाइन नोंदणी मार्गदर्शनासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे अर्ज व माहिती पुस्तिका देण्यात आली आहे. मात्र, अनेकांनी ही पुस्तके घेतलेली नाहीत. त्यामुळे मार्गदर्शक पुस्तिकांची मागणी वाढली आहे. या पुस्तिकेचा अभ्यास करूनच आॅनलाइन नोंदणी करा, असे आवाहन मार्गदर्शन केंद्राने विद्यार्थ्यांना केले आहे.विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना केलेल्या चुका दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे. याकरिता विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केंद्रात दाखल होत चौकशी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, कोणत्याही केंद्रात दाखल होण्याऐवजी स्थानिक परिसरातील केंद्रातच विद्यार्थ्यांनी यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे उघडण्यात आली आहेत. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.विचारपूर्वक महाविद्यालय निवडाविद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये, म्हणून प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी करण्याची संधी पुन्हा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता पालकांनी काळजीपूर्वक नोंदणी करावी. महाविद्यालयांचे पर्याय निवडताना विचार करावा, जेणेकरून प्रवेशासंबंधी आणखी मनस्ताप होणार नाही.- बी. बी. चव्हाण, शिक्षण उपसंचालक