शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीचा कट आॅफ @ ९५!

By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST

अकरावी प्रवेशासाठी यंदाचा पहिलाच कट आॅफ ९५ टक्क्यांपर्यंत स्थिरावण्याची शक्यता असून एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसमोर सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे आव्हान असणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल सोमवारी लागल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी यंदाचा पहिलाच कट आॅफ ९५ टक्क्यांपर्यंत स्थिरावण्याची शक्यता असून एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसमोर सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे आव्हान असणार आहे. तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलने जागा कमी पडण्याची भीती आहे.कट आॅफमध्ये राज्य शिक्षण मंडळाचे विद्यार्थी मागे पडण्याची शक्यता आहे. कारण एकीकडे ९० टक्के मिळवणाऱ्या सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे राज्य शिक्षण मंडळातून ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मात्र ७०० विद्यार्थ्यांनी घट झाली आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयातील जागा सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई विभागीय मंडळातून यंदा एकूण २ लाख ९७ हजार ७१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता हा आकडा ३ लाखांवर जातो. याउलट गेल्यावर्षी अकरावीच्या प्रवेशासाठी उपलब्ध जागांची संख्या २ लाख ६९ हजार १७२ इतकी असल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सांगितले. म्हणजेच प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही उपलब्ध जागांहून अधिक असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया केवळ आॅनलाईन पद्धतीने होणार असून सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश कसा मिळणार? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यंदा प्रवेशांच्या जागांत काही प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे एकही विद्यार्थी प्रवेशाविना राहणार नाही. पालघरसह वसई आणि विरार जिल्ह्यात अकरावीसाठी काही हजार जागा उपलब्ध आहेत. (प्रतिनिधी)