शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

अकरावीचा कट आॅफ @ ९५!

By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST

अकरावी प्रवेशासाठी यंदाचा पहिलाच कट आॅफ ९५ टक्क्यांपर्यंत स्थिरावण्याची शक्यता असून एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसमोर सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे आव्हान असणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल सोमवारी लागल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी यंदाचा पहिलाच कट आॅफ ९५ टक्क्यांपर्यंत स्थिरावण्याची शक्यता असून एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसमोर सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे आव्हान असणार आहे. तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलने जागा कमी पडण्याची भीती आहे.कट आॅफमध्ये राज्य शिक्षण मंडळाचे विद्यार्थी मागे पडण्याची शक्यता आहे. कारण एकीकडे ९० टक्के मिळवणाऱ्या सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे राज्य शिक्षण मंडळातून ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मात्र ७०० विद्यार्थ्यांनी घट झाली आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयातील जागा सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई विभागीय मंडळातून यंदा एकूण २ लाख ९७ हजार ७१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता हा आकडा ३ लाखांवर जातो. याउलट गेल्यावर्षी अकरावीच्या प्रवेशासाठी उपलब्ध जागांची संख्या २ लाख ६९ हजार १७२ इतकी असल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सांगितले. म्हणजेच प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही उपलब्ध जागांहून अधिक असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया केवळ आॅनलाईन पद्धतीने होणार असून सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश कसा मिळणार? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यंदा प्रवेशांच्या जागांत काही प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे एकही विद्यार्थी प्रवेशाविना राहणार नाही. पालघरसह वसई आणि विरार जिल्ह्यात अकरावीसाठी काही हजार जागा उपलब्ध आहेत. (प्रतिनिधी)