शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

अकरावीत ४८ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

By admin | Updated: July 11, 2017 00:23 IST

उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी/पुणे : केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीमार्फत राबविण्यात येत असलेल्या पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. मात्र, उद्योगनगरीत रात्री उशिरापर्यंत यादी न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरू होता. पहिल्या फेरीत गुणवत्ता यादीनुसार ४८ हजार ३२४ विद्यार्थ्यांचा पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला आहे. विद्यार्थ्यांना हवे असलेले महाविद्यालय व त्यांना मिळालेले गुण यांचे गणित न जुळल्याने १९ हजार ८०६ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत राहिले आहेत. यंदा अकरावी प्रवेशासाठी ७८ हजार ४३८ विद्यार्थ्यांनी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीकडे अर्ज केले होते. त्यापैकी १० हजार ३०८ विद्यार्थ्यांनी विविध कोट्याअंतर्गत प्रवेश घेतले आहेत. पहिल्या गुणवत्ता यादीत ४८ हजार ३२४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील २६७ महाविद्यालयात अकरावी प्रवेशाच्या ९१ हजार ६७० जागा उपलब्ध आहेत. एकूण प्रवेश क्षमतेपेक्षा कमी विद्यार्थ्यांचे अर्ज समितीकडे आले आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरून दिलेल्या महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू न शकल्याने १९ हजार ८०६ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रवेश समितचीचे अध्यक्ष व शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर, सचिव मिनाक्षी राऊत यांनी याबाबतची माहिती दिली.कला शाखेत ५ हजार ८४२, वाणिज्य शाखेत २१ हजार ०२५, विज्ञान शाखेत २० हजार ५५४, एमसीव्हिसीमध्ये ९०३ अशा ४८ हजार ३२४ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ७०.९३ टक्के विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळालेला आहे.पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ११ ते १३ जुलै दरम्यान संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागेल. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक असेल, त्याने प्रवेश न घेतल्यास तो या प्रक्रियेतून बाहेर पडणार आहे. दुसऱ्या, तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी मात्र त्यांना हवे असलेल्या पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळण्यासाठी प्रतीक्षा करू शकतील. प्रवेश समितीकडून १४ जुलै रोजी रिक्त जागांचा तपशील व पहिल्या फेरीतील महाविद्यालयांचा कटआॅफ जाहीर होणार आहे. त्यानंतर १५ जुलै पासून दुसरी फेरी राबविली जाणार आहे. अशा पद्धतीने प्रवेशाच्या ४ फेऱ्या पार पडणार आहेत. ।यांनी त्याच महाविद्यालयात : प्रवेश घेणे बंधनकारकअकरावी प्रवेशासाठी विद्यार्थींनी दिलेल्या पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय त्यांना गुणवत्ता यादीनुसार मिळाले असल्यास त्यांनी त्याच महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणे बंधनकारक आहे. यंदा १९ हजार ९९१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. या विद्यार्थ्यांनी जर संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेतला नाही तर ते प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडणार आहेत. दुसऱ्या व त्यापुढील पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी मात्र पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळण्यासाठी पुढील फेऱ्यांमध्ये प्रतिक्षा करू शकणार आहेत.२० हजार विद्यार्थ्यांना मिळाले हवे ते महाविद्यालयअकरावी प्रवेशासाठी यंदा १९ हजार ९९१ विद्यार्थ्यांना त्यांना हवे असलेले महाविद्यालय (पहिल्या पसंतीक्रमाचे) मिळालेले आहे. त्यानंतर ८ हजार १३१ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. ५ हजार २१६ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले. यंदा विद्यार्थ्यांना १० महाविद्यालयांचे पसंतीक्रम देता येऊ शकत होते. १११३ विद्यार्थ्यांना दहाव्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे.गुरुवारी ५ वाजेपर्यंत घ्यावा लागणार प्रवेशअकरावी प्रवेशासाठी पहिल्या फेरीत ४८ हजार ३२४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे. त्यांनी संबंधित महाविद्यालयात जाऊन ११ ते १३ जुलै या कालावधीत प्रवेश घ्यावा लागणार आहे. गुरूवारी (१३ जुलै) संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेश घेण्यासाठी वेळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश समितीकडून १४ जुलै रोजी रिक्त पदांचा तपशील जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर १५ जुलैपासून दुसऱ्या फेरीला सुरूवात होणार आहे.