शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

वीजबिल थकले, पाणी रोखले, महावितरणला टाळे ठोकण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:34 IST

अगोदरच कामगारांचा पगार आणी सुविधा पुरविताना दमछाक झालेल्या भिगवण ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा करणा-या योजनेचा वीजबिल थकल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे.

भिगवण : अगोदरच कामगारांचा पगार आणी सुविधा पुरविताना दमछाक झालेल्या भिगवण ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा करणा-या योजनेचा वीजबिल थकल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांवर पाण्याचे संकट ओढवले आहे, तर पूर्वीच्या ग्रामपंचायतीने हे बिल थकविल्याने भिगवण गावावर ही नामुष्की ओढवल्याचे पदाधिकारी यांच्याकडून सांगितले जात आहे. नागरिकांना होणाºया त्रासामुळे वीजपुरवठा पूर्ववत करावा, अन्यथा वीजवितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे.भिगवण गावची लोकसंख्या प्रत्यक्षात २५ हजारच्या पुढे असल्याने त्यातच सणासुदीच्या तोंडावर पाणीपुरवठा होत नसल्याने इथल्या नागरिकांना टँकरने पाणी मागवावे लागत आहे. पाण्यासाठीचा कर देऊनही ही वेळ आल्याने हे नागरिक प्रचंड संतापले आहेत. ग्रामपंचायतीमध्ये दीड वर्षापूर्वी सत्ता परिवर्तन झाले. तेव्हापासून आजपर्यंत पाणीपुरवठा योजनेसाठीच्या वीजपुरवठ्याचे बिल कधीही थकले नसल्याचे सध्याचे सत्ताधारी सांगत आहेत. मात्र, आधीच्या ग्रामपंचायतीने बिल भरल्याने ३० लाख रुपयांची थकबाकी ग्रामपंचायतीवर आहे. ही थकबाकी शासनाने माफ करावी किंवा आमचे विजेचे बिल भरावे, अशी मागणी उपसरपंच प्रदीप वाकसे यांनी केली.याबाबत महावितरण कंपनीचे भिगवण कार्यालयाचे अभियंता अमोल चांगन यांनी जिल्हाभर वसुली कारवाई सुरू असल्याने वरिष्ठ कार्यालय यांच्या सूचनेनुसार या परिसरातील सात ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा बंद केला असल्याचे सांगितले. तसेच, काही ग्रामपंचायतने बिलाची काही प्रमाणात थकबाकी भरल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार असल्याचे सांगितले.>कारवाई अन्यायकारकतीस लाख रुपयांची थकबाकी होत असताना त्याकाळात कारवाई करताना महावितरणचे अधिकारी काय झोपा काढत होते का, आम्ही सत्तेवर येऊन दोन वर्षे झाली आहेत. आम्ही ५ लाख ५० हजार बिल भरले असताना पाठीमागे राहिलेल्या थकबाकीसाठी सणासुदीच्या कालावधीत केलेली कारवाई अन्यायकारक आहे. महावितरणने यावर विचार करुन तातडीने वीजपुरवठा पूर्ववत केला नाही, तर आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असे उपसरपंच प्रदीप वाकसे यांनी सांगितले.