शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

‘रत्नागिरी गॅस’मधून वीजनिर्मिती सुरु

By admin | Updated: November 26, 2015 23:30 IST

पहिल्याच दिवशी ३०० मेगावॅट वीज : दोन वर्षांची प्रतीक्षा संपली

गुहागर : तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातून गुरुवारी सकाळी ८.३० वाजल्यापासून वीजनिर्मिती सुरू करण्यास सुरुवात झाली. सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा वीजनिर्मिती सुरू करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून प्राप्त झाल्यानंतर दुपारी ३ वाजल्यापासून ३०० मेगावॅट वीज निर्मितीचा टप्पा गाठला.महाराष्ट्रावर असलेल्या भारनियमनाचे संकट दूर करण्यासाठी कोर्ट रिसीव्हरच्या ताब्यात असलेला २१५० मेगावॅट क्षमतेचा ‘एन्रॉन’चा दाभोळ वीज प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ५ आॅक्टोबर २००५ रोजी रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्प नावाने प्रकल्प सुरू झाला. अनेक वर्षे प्रकल्प बंद असल्याने वीजनिर्मिती सुरू करण्यात अनेक अडचणी आल्या. कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर प्रकल्पातून सरासरी १००० मेगावॅट वीजनिर्मिती होत होती. अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळे अखेर डिसेंबर २०१३ पासून वीजनिर्मिती बंद करण्यात आली. केंद्र व राज्यातील सत्ता बदलानंतर प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी हा प्रकल्प सुरू होणार असल्याची घोषणा केली. ५०० मेगावॅट वीज खरेदी करण्याला रेल्वेकडून हिरवा कंदील दाखवण्यात आल्याने वीजनिर्मिती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी रेल्वेच्या वरिष्ठ समितीने प्रकल्पाला विशेष भेट देऊन यावर शिक्कामोर्तब केले. यातील ३०० मेगावॅट महाराष्ट्रातील रेल्वेसाठी, तर २०० मेगावॅट झारखंडमधील रेल्वेसाठी वापरली जाणार आहे.दरम्यानच्या काळात फक्त १०० मेगावॅटच वीज घेण्याबाबत रेल्वेकडून मागणी होत होती. एवढी कमी वीजनिर्मिती करणे तांत्रिक व आर्थिकदृष्ट्याही कंपनी प्रशासनाला परवडणारे नव्हते. वरिष्ठ पातळीवर बैठका होत होत्या. अखेर यावर निर्णय झाला. (प्रतिनिधी)टप्प्याटप्प्याने निर्मिती वाढलीगुरुवारी सकाळी ८.३० वाजता प्रथम ४० मेगावॅट सुरू करण्यात आली. प्रकल्पातून दोन वर्षे पूर्ण क्षमतेने टर्बाईनमधून वीजनिर्मिती झाली नसल्याने टप्प्याटप्प्याने वीजनिर्मिती वाढविण्यात आली. दुपारी ३ वाजेपर्यंत टप्पा ३ मधून ३०० मेगावॅट वीजनिर्मिती वाढविण्यात आली.महाराष्ट्राच्या परवान्यासाठी विलंबही वीज रेल्वेला देण्यासाठी केंद्रीय वीज नियामक आयोगाचा परवाना प्रथम मिळाला. मात्र, महाराष्ट्र वीज नियामक आयोगाची मंजुरी मिळण्यास विलंब झाला. त्यामुळे १ नोव्हेंबरचा वीजनिर्मितीचा मुहूर्त हुकला. आता हा परवानाही मिळाला आहे. झारखंडमधील परवाना बाकी असल्याने सद्य:स्थितीत ३०० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे आणि ती महाराष्ट्रातील रेल्वेसाठी वापरली जाणार आहे.