शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

‘रत्नागिरी गॅस’मधून वीजनिर्मिती सुरु

By admin | Updated: November 26, 2015 23:30 IST

पहिल्याच दिवशी ३०० मेगावॅट वीज : दोन वर्षांची प्रतीक्षा संपली

गुहागर : तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातून गुरुवारी सकाळी ८.३० वाजल्यापासून वीजनिर्मिती सुरू करण्यास सुरुवात झाली. सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा वीजनिर्मिती सुरू करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून प्राप्त झाल्यानंतर दुपारी ३ वाजल्यापासून ३०० मेगावॅट वीज निर्मितीचा टप्पा गाठला.महाराष्ट्रावर असलेल्या भारनियमनाचे संकट दूर करण्यासाठी कोर्ट रिसीव्हरच्या ताब्यात असलेला २१५० मेगावॅट क्षमतेचा ‘एन्रॉन’चा दाभोळ वीज प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ५ आॅक्टोबर २००५ रोजी रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्प नावाने प्रकल्प सुरू झाला. अनेक वर्षे प्रकल्प बंद असल्याने वीजनिर्मिती सुरू करण्यात अनेक अडचणी आल्या. कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर प्रकल्पातून सरासरी १००० मेगावॅट वीजनिर्मिती होत होती. अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळे अखेर डिसेंबर २०१३ पासून वीजनिर्मिती बंद करण्यात आली. केंद्र व राज्यातील सत्ता बदलानंतर प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी हा प्रकल्प सुरू होणार असल्याची घोषणा केली. ५०० मेगावॅट वीज खरेदी करण्याला रेल्वेकडून हिरवा कंदील दाखवण्यात आल्याने वीजनिर्मिती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी रेल्वेच्या वरिष्ठ समितीने प्रकल्पाला विशेष भेट देऊन यावर शिक्कामोर्तब केले. यातील ३०० मेगावॅट महाराष्ट्रातील रेल्वेसाठी, तर २०० मेगावॅट झारखंडमधील रेल्वेसाठी वापरली जाणार आहे.दरम्यानच्या काळात फक्त १०० मेगावॅटच वीज घेण्याबाबत रेल्वेकडून मागणी होत होती. एवढी कमी वीजनिर्मिती करणे तांत्रिक व आर्थिकदृष्ट्याही कंपनी प्रशासनाला परवडणारे नव्हते. वरिष्ठ पातळीवर बैठका होत होत्या. अखेर यावर निर्णय झाला. (प्रतिनिधी)टप्प्याटप्प्याने निर्मिती वाढलीगुरुवारी सकाळी ८.३० वाजता प्रथम ४० मेगावॅट सुरू करण्यात आली. प्रकल्पातून दोन वर्षे पूर्ण क्षमतेने टर्बाईनमधून वीजनिर्मिती झाली नसल्याने टप्प्याटप्प्याने वीजनिर्मिती वाढविण्यात आली. दुपारी ३ वाजेपर्यंत टप्पा ३ मधून ३०० मेगावॅट वीजनिर्मिती वाढविण्यात आली.महाराष्ट्राच्या परवान्यासाठी विलंबही वीज रेल्वेला देण्यासाठी केंद्रीय वीज नियामक आयोगाचा परवाना प्रथम मिळाला. मात्र, महाराष्ट्र वीज नियामक आयोगाची मंजुरी मिळण्यास विलंब झाला. त्यामुळे १ नोव्हेंबरचा वीजनिर्मितीचा मुहूर्त हुकला. आता हा परवानाही मिळाला आहे. झारखंडमधील परवाना बाकी असल्याने सद्य:स्थितीत ३०० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे आणि ती महाराष्ट्रातील रेल्वेसाठी वापरली जाणार आहे.