शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वीज दरवाढीचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 03:52 IST

वीज ग्राहकांना आणखी ‘जोर का झटका धीरेसे’ देण्याची तयारी महावितरणने चालविली आहे.

वीज ग्राहकांना आणखी ‘जोर का झटका धीरेसे’ देण्याची तयारी महावितरणने चालविली आहे. वीज दरवाढीसाठी महावितरणने विद्युत नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. आयोगाने नागपुरात घेतलेल्या सुनावणीला राजकीय कार्यकर्त्यांसह विविध संस्था, संघटनांनी विरोध दर्शविला. आयोगासमक्ष आपली व्यथा मांडायला कदाचित सामान्य माणूस येऊ शकला नसेल, पण याचा अर्थ असा नाही की त्याच्या भावना तीव्र नाहीत. महागाईचे चटके सहन करणाऱ्या सामान्य माणसाला वीज दरवाढीचा शॉक असह्य करणारा आहे. महावितरणने केलेल्या दाव्यानुसार, त्यांनी १०० युनिटपर्यंत वीज वापर करणाºया घरगुती ग्राहकांसाठी केवळ आठ पैसे प्रति युनिट दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. ही दरवाढ ८३ पैसे प्रति युनिट इतकी राहील. कारण महावितरणने फिक्स चार्जेस (स्थायी शुल्क) वाढवून ६५ रुपयांवरून १४० रुपये प्रति महिना करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की, १०० युनिटपर्यंत वीज वापर करणाºया ग्राहकांना ७५ रुपये अधिक द्यावे लागेल. महावितरणने तोटा सहन करून वीज द्यावी, अशीही अपेक्षा नाही. मात्र, लोकहितासाठी योग्य पावले उचलणेही तेवढेच आवश्यक आहे. वास्तविकत: माफक दरात वीज मिळणे हा सामान्य माणसाचा अधिकारच आहे. तर परवडणारी वीज उपलब्ध करून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. नागरिकांवर आर्थिक भार टाकणे योग्य नाही. विजेचे दर वाढविण्याऐवजी तिचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिला तर यातून मार्ग निघू शकतो. सोबतच कंपनीने वीजचोरी कशी थांबेल यावर भर द्यायला हवा. थकीत वसुलीवरही लक्ष केंद्रित करायला हवे. बड्यांना सूट देताना लहानांना फटका बसणार नाही, असे धोरण आखावे लागेल. हे सर्व प्रामाणिकपणे झाले तर सामान्य नागरिकांवर बोझा टाकण्याची वेळच येणार नाही. यात आव्हाने नक्कीच आहेत. पण प्रयत्न केल्यास मार्गही आहेत. अंधारमय जीवनाशी संघर्ष करणाºया सामान्य माणसाला घरात प्रकाश हवा आहे, मात्र खिशाला परडेल असा. आता महागाईचे चटके सहन करण्याची सहनशक्ती त्यात उरलेली नाही. एकेकाळी वीज दरवाढीविरोधात रस्त्यावर आंदोलन करणारे, आयोगाची सुनावणी उधळून लावणारे आता सत्तेत आहेत. त्यांना या विषयाची जाणही आहे. त्यामुळे त्यांच्याकडून साहजिकच अपेक्षा आहे. ती पूर्ण व्हावी. विजेच्या वाढत्या बिलाविरोधात दिल्लीत आम आदमी जागा झाला व सरकारचे सिंहासन हलविल्याचे उदाहरण फार जुने नाही. त्यामुळे सरकारने वेळीच या विषयावर प्रकाश टाकलेला बरा. अन्यथा कॉमन मॅनचा शॉक सरकारला परवडणारा नसेल.