शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

वीजग्राहक ३ कोटी, तक्रारी चारच हजार

By admin | Updated: March 3, 2017 03:07 IST

ग्राहकांच्या संख्येच्या तुलने तक्रारीचें प्रमाण खूपच कमी असून वीज ग्राहकांमध्ये जास्तीत जास्त जागृती निर्माण करण्याची गरज त्यांनी स्पष्ट केले.

पंकज राऊत,बोईसर- महाराष्ट्र राज्यात सुमारे तीन कोटी वीज ग्राहक असून प्रतिवर्षी सरासरी फक्त चार हजार ग्राहकांच्या तक्रारी विद्युत लोकपालापर्यंत येत असल्याची खंत मुंबईचे विद्युत लोकपाल आर. डी. संख्ये यांनी व्यक्त करून ग्राहकांच्या संख्येच्या तुलने तक्रारीचें प्रमाण खूपच कमी असून वीज ग्राहकांमध्ये जास्तीत जास्त जागृती निर्माण करण्याची गरज त्यांनी स्पष्ट केले.विद्युत लोकपाल कार्यालय व महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने वीज ग्राहकांसाठी तारापूर, एमआयडीसी मधील टीमा सभागृहात आयोजित केलेल्या न्याय आपल्या दारी या उपक्रमाच्या निमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महावितरणच्या पालघर सर्कलचे अधीक्षक अभियंता डी .आर.पाटील, कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे, लोकपालांचे सचिव दिलीप टुंबरे, भालचंद्र पाटील व महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले की, वीजग्राहक सर्वप्रथम आपली तक्रार महावितरणच्या मंडल कार्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण कक्षाकडे करू शकतात. येथे निराकरण न झाल्यास अथवा समाधान न झाल्यास परिमंडल कार्यालयातील मंचाकडे (सीजीआरएफ) तक्रार करावी. या ठिकाणी दोन महिन्यांत निर्णय लागणे अनिवार्य आहे. येथेही समाधान न झाल्यास ग्राहक विद्युत लोकपालांकडे तक्र ार नोंदवू शकतात. महाराष्ट्रासाठी दोन विद्युत लोकपालाची स्थापना करण्यात आलेली आहे. नागपूर येथील विद्युत लोकपालांकडे विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यांचे, तर मुंबई येथील विद्युत लोकपालांकडे उर्वरित महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र आहे. >कोणतेही शुल्क, खर्च लागत नाहीआयजीआरसी, सीजीआरएफ तसेच विद्युत लोकपालांकडे तक्रार करण्यासाठी ग्राहकाला खर्च लागत नाही. वकील, शुल्क, स्टॅम्प व कागदपत्रांची गरज नाही. सध्या कागदावरही ग्राहक या तिन्ही ठिकाणी आपली तक्र ार नोंदवू शकतात. अशी माहितीही त्यांनी दिली.