शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

वीजग्राहक ३ कोटी, तक्रारी चारच हजार

By admin | Updated: March 3, 2017 03:07 IST

ग्राहकांच्या संख्येच्या तुलने तक्रारीचें प्रमाण खूपच कमी असून वीज ग्राहकांमध्ये जास्तीत जास्त जागृती निर्माण करण्याची गरज त्यांनी स्पष्ट केले.

पंकज राऊत,बोईसर- महाराष्ट्र राज्यात सुमारे तीन कोटी वीज ग्राहक असून प्रतिवर्षी सरासरी फक्त चार हजार ग्राहकांच्या तक्रारी विद्युत लोकपालापर्यंत येत असल्याची खंत मुंबईचे विद्युत लोकपाल आर. डी. संख्ये यांनी व्यक्त करून ग्राहकांच्या संख्येच्या तुलने तक्रारीचें प्रमाण खूपच कमी असून वीज ग्राहकांमध्ये जास्तीत जास्त जागृती निर्माण करण्याची गरज त्यांनी स्पष्ट केले.विद्युत लोकपाल कार्यालय व महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने वीज ग्राहकांसाठी तारापूर, एमआयडीसी मधील टीमा सभागृहात आयोजित केलेल्या न्याय आपल्या दारी या उपक्रमाच्या निमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महावितरणच्या पालघर सर्कलचे अधीक्षक अभियंता डी .आर.पाटील, कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे, लोकपालांचे सचिव दिलीप टुंबरे, भालचंद्र पाटील व महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले की, वीजग्राहक सर्वप्रथम आपली तक्रार महावितरणच्या मंडल कार्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण कक्षाकडे करू शकतात. येथे निराकरण न झाल्यास अथवा समाधान न झाल्यास परिमंडल कार्यालयातील मंचाकडे (सीजीआरएफ) तक्रार करावी. या ठिकाणी दोन महिन्यांत निर्णय लागणे अनिवार्य आहे. येथेही समाधान न झाल्यास ग्राहक विद्युत लोकपालांकडे तक्र ार नोंदवू शकतात. महाराष्ट्रासाठी दोन विद्युत लोकपालाची स्थापना करण्यात आलेली आहे. नागपूर येथील विद्युत लोकपालांकडे विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यांचे, तर मुंबई येथील विद्युत लोकपालांकडे उर्वरित महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र आहे. >कोणतेही शुल्क, खर्च लागत नाहीआयजीआरसी, सीजीआरएफ तसेच विद्युत लोकपालांकडे तक्रार करण्यासाठी ग्राहकाला खर्च लागत नाही. वकील, शुल्क, स्टॅम्प व कागदपत्रांची गरज नाही. सध्या कागदावरही ग्राहक या तिन्ही ठिकाणी आपली तक्र ार नोंदवू शकतात. अशी माहितीही त्यांनी दिली.