शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

वीजचोरीचा गोरखधंदा

By admin | Updated: February 2, 2015 01:06 IST

उपराजधानीत वीजचोरी उघडकीस आणण्याच्या नावाखाली गोरखधंदा होत आहे. लोकमतला मिळालेले दस्तावेजच याचे संकेत देत आहेत. वीजचोरी विरोधात उभारण्यात आलेली मोहीम चुकीची नाही.

वीजचोरीच्या प्रकरणांची नोंदणीच नाही : तथ्याशिवायच पंचनामाकमल शर्मा - नागपूर उपराजधानीत वीजचोरी उघडकीस आणण्याच्या नावाखाली गोरखधंदा होत आहे. लोकमतला मिळालेले दस्तावेजच याचे संकेत देत आहेत. वीजचोरी विरोधात उभारण्यात आलेली मोहीम चुकीची नाही. पण या निमित्ताने मोहिमेच्या नावावर होणारी सेटिंग थांबविण्याचा लोकमतचा प्रयत्न आहे. लोकमतला शुक्रवारी वीज वितरण फ्रॅन्चाईसी - एसएनडीएल द्वारा पकडलेल्या वीजचोरीच्या दस्तावेजाच्या मूळ प्रती मिळाल्या. नियमाप्रमाणे या प्रती एसएनडीएलच्या कार्यालयात असायला हव्यात. पण या प्रती सध्या लोकमतकडे आहेत. येथूनच हा गोरखधंदा असल्याचे स्पष्ट होते. या दस्तावेजांप्रमाणे १२ सप्टेंबर २०१४ ला एसएनडीएलच्या सतर्कता विभाग पथकाने सोमवारी क्वॉर्टर येथे वीजचोरीची दोन प्रकरणे पकडली. याचा दोन पंचासमोर पंचनामाही झाला. यातील एक पंचनामा निवासी एल-१ कनेक्शनचा आहे. यात निळ्या रंगाच्या तारेने मीटर बंद केल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. दुसरा पंचनामा विमा रुग्णालयाजवळील परिसराचा आहे. जे व्यापारी कनेक्शन आहे यातही तार टाकून वीज चोरी होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. येथपर्यंत सारे ठीक असले तरी येथूनच गडबडीला प्रारंभ झाला आहे. पंचनाम्यात लोडचा कॉलम रिक्त ठेवण्यात आला आहे. नियमानुसार या कॉलममध्ये नोंद करणे आवश्यक आहे. वीजचोरी झाली तेथे तेथे किती वीज उपकरणे उपयोगात आणली याचा उल्लेख या कॉलममध्ये करणे आवश्यक आहे. याच आधारावर वीजचोरीचे मूल्यांकन आणि कम्पाउडिंग चार्ज निश्चित केला जातो. पण पंचनाम्यात याचा उल्लेखच नसल्याने या प्रकरणात काहीही केल्या गेले नाही, हे स्पष्ट आहे. हे सारे कंपनीच्या मर्जीने सुरू आहे वा पथकाचे लोक यात गडबड करीत आहे, हा संशोधनाचा विषय आहे. मोठी कारवाई करणार : एसएनडीएलवीज वितरण फ्रॅन्चाईसी - एसएनडीएलचे व्यवसाय प्रमुक सोनल खुराणा यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणाची तपासणी करून दोषींविरोधात कडक पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. वीजचोरीच्या विरोधात राबविण्यात येणारे अभियान सर्वांच्याच हितासाठी आहे. याचा दुरुपयोग होऊ देणार नाही, असे खुराणा म्हणाले. लक्ष्य दोन कोटींचे आणि वीजचोरी पकडली ३९ लाखांचीचएसएनडीएलतर्फे वीजचोरीच्या विरोधात राबविण्यात येणारे अभियानच शंकेच्या घेऱ्यात सापडले आहे. कंपनीच्या सतर्कता पथकाला एका महिन्यात दोन कोटींची वीजचोरी पकडण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. त्यात दुसरीकडे सरकारी कंपनी महावितरणने संपूर्ण जिल्ह्यात ३९ लाख रुपयांची वीजचोरी पकडली आहे. यामुळे एकतर महावितरण वीजचोरीसाठी गंभीर नाही वा एसएनडीएल अकारण वीजचोरीची प्रकरणे समोर आणण्याचा प्रयत्न करीत असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.