शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रिडिंग न घेताच दिले वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2016 02:51 IST

पनवेल विभागातील अनेक वीजग्राहकांना महावितरणकडून मीटर रिडिंग न घेताच अंदाजे वीज बिल पाठवले जात आहे.

कळंबोली : पनवेल विभागातील अनेक वीजग्राहकांना महावितरणकडून मीटर रिडिंग न घेताच अंदाजे वीज बिल पाठवले जात आहे. त्यानंतर एकदम अवाच्या सव्वा बिल धाडून ग्राहकांवर आर्थिक भार टाकला जात आहे. कळंबोलीत असा प्रकार सर्रास सुरू आहे. देयके भरण्याच्या तारखेनंतर काहींना बिल येत आहे आणि हे बिल न भरल्यास लगेच वीजपुरवठा खंडित केला जात आहे. पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली या ठिकाणी महावितरणची वीज यंत्रणा सातत्याने कोलमडते. कळंबोलीत तर वारंवार बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होत असून केबल जळण्याचे प्रकारही वारंवार घडत आहेत. पनवेल आणि नवीन पनवेलमध्येही हीच स्थितीआहे. याशिवाय बिल आकारणीतही कमालीच्या त्रुटी आहेत. मीटरचा फोटो घेऊन रिडिंग अपडेट करणे, त्यानंतर बिल प्रिंट करून ते ग्राहकांपर्यंत पोहोचविणे याकरिता महावितरण कंपनीने खासगी एजन्सी नियुक्त केल्या आहेत; परंतु कित्येक ग्राहकांना अंदाजे बिल पाठवले जात आहेत. काही बिलांमध्ये मागील युनिटचा समावेश करून भरमसाट बिल पाठवले जात आहे आणि ते भरण्यास विलंब झाल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. काही बिलांवर तर रिडिंग वेगळे, फोटो दुसरा तर बिल तिसऱ्याचेच पाठवले जात आहे. गेल्या महिन्यात पनवेलमधील अनेक ग्राहकांनी याबाबत विचारणा केली असता, आधी संपूर्ण वीज बिल भरा, त्यानंतर पुढे पाहू, असे उत्तर अधिकाऱ्यांकडून देण्यात येत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. वाढीव बिलाच्या तक्र ारी नेमक्या कुठे करायच्या, याबाबत काहीच माहिती दिली जात नाही. कळंबोलीतील ग्राहकांना खांदा वसाहतीत जाण्यास सांगितले जाते. कळंबोली सेक्टर १४ येथील आशीर्वाद सोसायटीतील युनिट क्र मांक ४ मधील ग्राहकाला सप्टेंबर महिन्याचे बिल अंदाजे देण्यात आले. त्यानंतर आॅक्टोबर महिन्यात दुप्पट बिल पाठविण्यात आले. बिलाबाबत ग्राहकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याकरिता कर्मचारी धाडला, असे प्रकार कळंबोलीत अनेक ग्राहकांबाबत घडले आहेत. त्यामुळे ग्राहक त्रस्त आहेत. यासंदर्भात महावितरण कार्यकारी अभियंता डी.बी. गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. (वार्ताहर)>वीज ग्राहकांना नोटिसा द्याअनेकदा वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे बिलामध्ये प्रचंड घोळ असतो. काही वेळेस ती बिले उशिरा वितरित केली जातात. या गोष्टीला महावितरण कंपनी जबाबदार आहे. तेव्हा वीजपुरवठा खंडित करीत असताना संबंधित ग्राहकांना नोटीस बजावणे गरजेचे असल्याचे मत पनवेलचे माजी उपनगराध्यक्ष जयवंत महामुनी यांनी व्यक्त केले आहे.