शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

रिडिंग न घेताच दिले वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2016 02:51 IST

पनवेल विभागातील अनेक वीजग्राहकांना महावितरणकडून मीटर रिडिंग न घेताच अंदाजे वीज बिल पाठवले जात आहे.

कळंबोली : पनवेल विभागातील अनेक वीजग्राहकांना महावितरणकडून मीटर रिडिंग न घेताच अंदाजे वीज बिल पाठवले जात आहे. त्यानंतर एकदम अवाच्या सव्वा बिल धाडून ग्राहकांवर आर्थिक भार टाकला जात आहे. कळंबोलीत असा प्रकार सर्रास सुरू आहे. देयके भरण्याच्या तारखेनंतर काहींना बिल येत आहे आणि हे बिल न भरल्यास लगेच वीजपुरवठा खंडित केला जात आहे. पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली या ठिकाणी महावितरणची वीज यंत्रणा सातत्याने कोलमडते. कळंबोलीत तर वारंवार बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होत असून केबल जळण्याचे प्रकारही वारंवार घडत आहेत. पनवेल आणि नवीन पनवेलमध्येही हीच स्थितीआहे. याशिवाय बिल आकारणीतही कमालीच्या त्रुटी आहेत. मीटरचा फोटो घेऊन रिडिंग अपडेट करणे, त्यानंतर बिल प्रिंट करून ते ग्राहकांपर्यंत पोहोचविणे याकरिता महावितरण कंपनीने खासगी एजन्सी नियुक्त केल्या आहेत; परंतु कित्येक ग्राहकांना अंदाजे बिल पाठवले जात आहेत. काही बिलांमध्ये मागील युनिटचा समावेश करून भरमसाट बिल पाठवले जात आहे आणि ते भरण्यास विलंब झाल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. काही बिलांवर तर रिडिंग वेगळे, फोटो दुसरा तर बिल तिसऱ्याचेच पाठवले जात आहे. गेल्या महिन्यात पनवेलमधील अनेक ग्राहकांनी याबाबत विचारणा केली असता, आधी संपूर्ण वीज बिल भरा, त्यानंतर पुढे पाहू, असे उत्तर अधिकाऱ्यांकडून देण्यात येत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. वाढीव बिलाच्या तक्र ारी नेमक्या कुठे करायच्या, याबाबत काहीच माहिती दिली जात नाही. कळंबोलीतील ग्राहकांना खांदा वसाहतीत जाण्यास सांगितले जाते. कळंबोली सेक्टर १४ येथील आशीर्वाद सोसायटीतील युनिट क्र मांक ४ मधील ग्राहकाला सप्टेंबर महिन्याचे बिल अंदाजे देण्यात आले. त्यानंतर आॅक्टोबर महिन्यात दुप्पट बिल पाठविण्यात आले. बिलाबाबत ग्राहकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याकरिता कर्मचारी धाडला, असे प्रकार कळंबोलीत अनेक ग्राहकांबाबत घडले आहेत. त्यामुळे ग्राहक त्रस्त आहेत. यासंदर्भात महावितरण कार्यकारी अभियंता डी.बी. गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. (वार्ताहर)>वीज ग्राहकांना नोटिसा द्याअनेकदा वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे बिलामध्ये प्रचंड घोळ असतो. काही वेळेस ती बिले उशिरा वितरित केली जातात. या गोष्टीला महावितरण कंपनी जबाबदार आहे. तेव्हा वीजपुरवठा खंडित करीत असताना संबंधित ग्राहकांना नोटीस बजावणे गरजेचे असल्याचे मत पनवेलचे माजी उपनगराध्यक्ष जयवंत महामुनी यांनी व्यक्त केले आहे.