शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

‘एनआरसी’ला भरावेच लागणार वीजबिल

By admin | Updated: April 26, 2016 03:38 IST

मोहने येथील एनआरसी कंपनीने वीजबिलाची थकबाकी थकवली होती. याप्रकरणी कंपनीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती.

कल्याण : मोहने येथील एनआरसी कंपनीने वीजबिलाची थकबाकी थकवली होती. याप्रकरणी कंपनीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर, न्यायालयाने कंपनीला वीजबिलाची थकबाकी भरण्याचे आदेश दिले आहेत. कंपनी जोपर्यंत थकबाकी भरत नाही, तोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत केला जाणार नाही, असे महावितरण कंपनीने स्पष्ट केले.९ नोव्हेंबर २००९ ला एनआरसी कंपनी व्यवस्थापनाने आर्थिक डबघाईचे कारण देत कंपनीला टाळे ठोकले होते. कंपनी बंद झाली असली तरी कंपनीच्या कामगार वसाहतीत तीन हजार कामगार कुटुंबे राहत आहेत. कंपनीने पाच कोटी ८१ लाख रुपयांचे वीजबिल थकवल्याने ‘महावितरण’ने वसाहतीचा वीजपुरवठा खंडित केला. परंतु, कंपनी व्यवस्थापनाला थकबाकीची रक्कम मान्य नसल्याने ते बिल भरत नव्हते. ‘महावितरण’ने जादा थकबाकी दाखवल्याचे कंपनीचे म्हणणे होते. त्यामुळे कंपनी ‘महावितरण’विरोधात उच्च न्यायालयात गेली होती. न्यायालयाने वीज थकबाकीप्रकरणी २२ एप्रिलला निकाल दिला. त्यानुसार, एनआरसी कंपनीने ‘महावितरण’ची थकबाकी प्रथम भरावी, असे आदेश दिले आहेत. दरम्यान, कंपनीने न्यायालयाच्या आदेशानुसार, त्वरित थकबाकी भरल्यास वीजपुरवठा सुरळीत केला जाईल, अन्यथा हा पुरवठा खंडितच राहील, असे महावितरण कंपनीचे जनसंपर्क अधिकारी भरत पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)