शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

निवडणूक आयोगाने काँग्रेसला दिले समोरासमोर चर्चेचे निमंत्रण; महाराष्ट्रातील प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 06:46 IST

यावर आयोगाने पक्षाच्या प्रतिनिधींना ३ डिसेंबर रोजी सर्व तक्रारींवर चर्चा बोलवले आहे. 

नवी दिल्ली : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीसंबंधी सर्व प्रक्रिया पारदर्शक होत्या, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. याबाबत काँग्रेसने नोंदवलेल्या सर्व वैध तक्रारींचा योग्य आढावा घेतला जाईल, असे आश्वासनही आयोगाने काँग्रेसला दिले. विधानसभा निवडणुकीदरम्यान अनेक गैरप्रकार झाले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यावर आयोगाने पक्षाच्या प्रतिनिधींना ३ डिसेंबर रोजी सर्व तक्रारींवर चर्चा बोलवले आहे. 

या निवडणुकीतील प्रक्रियांसह आकडेवारीवर आक्षेप नोंदवून काँग्रेसने ही आकडेवारी विसंगत असल्याचे म्हटले होते. याबाबत निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवण्यात आले होते. याबाबत पुरावे सादर करण्यासाठी समोरासमोर सुनावणी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती. यावर निवडणूक आयोगाने या प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता होती, असे ठासून सांगितले. या प्रत्येक टप्प्यात उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांचा सहभाग होता, असे आयोगाने नमुद केले.

आयोगाचे म्हणणे असे... 

■ सर्व राजकीय पक्षांच्या सहभागाने मतदार याद्या अद्ययावत करण्याची एक पारदर्शक प्रक्रिया झाली होती. 

■ मतदानाच्या आकडेवारीत कोणत्याही प्रकारचे घोळ नाहीत. सर्व उमेदवारांची प्रत्येक मतदान केंद्रांवरील आकडेवारी उपलब्ध असून त्याची पडताळणीही झाली आहे. अंतिम आकडेवारीत फरक दिसतो; कारण संबंधित पीठासीन अधिकारी ही आकडेवारी अंतिम करण्यापूर्वी अनेक कायदेशीर कर्तव्याचे पालन करुन प्रक्रिया पूर्ण करीत असतात.