शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक अर्थसंकल्पी अधिवेशनातच घ्या; राज्यपालांचे पत्राद्वारे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 00:44 IST

Instructions by letter to the Governor : राज्यपालांनी विधान मंडळ सचिवालयाला पाठविलेल्या या पत्रावर राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत चर्चा झाली. राज्यपाल असे निर्देश देऊ शकतात का? यावरही खल झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई : नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक विधिमंडळाच्या १ मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनातच घेण्यात यावी, असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत.राज्यपालांनी विधान मंडळ सचिवालयाला पाठविलेल्या या पत्रावर राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत चर्चा झाली. राज्यपाल असे निर्देश देऊ शकतात का? यावरही खल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्याचे संवैधानिक प्रमुख या नात्याने राज्यपालांनी हे पत्र पाठविले आहे. त्यांचे निर्देश राज्य सरकारसाठी बंधनकारक आहेत का? यावरही चर्चा झाल्याचे समजते.नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. विधानसभेचे अध्यक्षपद हे पुन्हा काँग्रेसलाच मिळणार, असे काँग्रेसचे नेते ठामपणे सांगत आहेत. अधिवेशन सुरू होण्यास आता केवळ ११ दिवसांचा अवधी आहे. एवढ्या अल्प काळात काँग्रेसचा उमेदवार ठरणे, त्याला अन्य दोन पक्षांनी सहमती दर्शवणे ही कसरत महाविकास आघाडी सरकारला करावी लागणार आहे. राज्यपालांनी दिलेल्या पत्रामुळे या अधिवेशनातच अध्यक्षांची निवड सरकारला करावी लागली तर त्यासाठीची बरीच राजकीय कसरत करावी लागू शकते.महाविकास आघाडी सरकारला विधानसभेत निर्विवाद बहुमत आहे. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदानाने होते. उद्धव ठाकरे सरकारने १६९ मते घेऊन विश्‍वासमत सिद्ध केले होते. सरकारी विमान वापरण्यावरून नुकताच राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात वाद झाला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी दिलेल्या या निर्देशांकडे पाहिले जात आहे. राज्यपालांनी हे पत्र पाठविले आहे. त्यांचे निर्देश राज्य सरकारसाठी बंधनकारक आहेत का? यावरही चर्चा झाल्याचे समजते.

सरकारची वाढविली चिंताकोरोनाच्या संकटामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकर गुंडाळले गेले तर अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची गरज भासणार नाही. उपाध्यक्ष व तालिका अध्यक्षांच्या भरवशावर अधिवेशनाचे कामकाज रेटता येईल, असा एक तर्क दिला जात होता. मात्र राज्यपालांच्या पत्राने सरकारची चिंता वाढविली आहे.   

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी