शहरं
Join us  
Trending Stories
1
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
2
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
3
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
4
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
5
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
6
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
7
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
8
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
9
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
10
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
11
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
12
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
13
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
14
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
15
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
16
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
17
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
18
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
19
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
20
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार

‘एकता विनायक गोखले’च्या निरोपाची हुरहुर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 02:31 IST

मराठी भाषेचा हरवलेला दुवा जोडून एकाकीपणा केला होता दूर

- अपर्णा वेलणकर एकता विनायक गोखले. जन्म १९७९ चा. चाळीस वर्षे ती उत्तर अमेरिकेसह जगातील मराठी माणसांची मैत्रीण होती. महासागर ओलांडून गेलेल्या एकाकी मराठी मनाला आधार द्यायला दुसरे कुणी नव्हते, पुलंचे शब्द नी भीमसेन व कुमारांचे स्वर कानी पडणे दुर्मिळ होते, लाडू, करंज्या आणि आकाशकंदिल नसल्याने परदेशातील दिवाळी उदास होती...अशा इंटरनेटपूर्व काळात कॅनडाच्या टोरोण्टो मध्ये जन्मलेली ही ‘एकता’. तिने दूरदेशी वास्तव्याला गेलेल्या कित्येक मराठी संसारांना सोबत केली, बोला-ऐकायला दुर्मीळ होऊन बसलेल्या मराठी भाषेचा हरवला दुवा जोडून एकाकीपणा दूर केलँ. एकमेकांना फोन करणे परवडत नव्हते, अशा काळात उत्तर अमेरिकेत नव्याने आलेल्या मराठी कुटुंबांची एकमेकांशी गाठ घालून दिली. बदलत्या काळाने दूरदेशी वास्तव्यातील सीमारेषा पार पुसून टाकल्याने आपल्या मैत्रीची जुनी गरज सरली आहे हे लक्षात घेऊन ‘एकता’ने या महिन्यात ‘निरोप’ घेतला.अंकाचे संपादन करणे, त्यासाठी नवनव्या कल्पना काढणे, लेख मागवणे, आवाहने करणे, अंकाची मांडणी करण्यापासून पत्ते चिकटवलेल्या अमेरिकेत पाठवायच्या अंकांच्या थैल्या टोरोण्टोपासून १६0 किमी वरच्या बफेलो पोस्टात नेऊन टाकण्यापर्यंतची सगळी उस्तवार होत गोखलेच करीत.जागतिकीकरणाची लाट येण्याच्या कितीतरी आधी दहा-पंधरा हजार मैलांचे अंतर ओलांडून उत्तर अमेरिकेत गेलेल्या मराठी कुटुंबांच्या प्रवासाचा ‘एकता’ हा एक संपन्न दस्तावेजच आहे. विनायक-प्रतिभा गोखले यांच्यासह अनेकांनी ‘ना नफा’ तत्वावर चालवलेले हे त्रैमासिक यावर्षी पूर्णविराम घेते झाले आहे.आता ‘एकता’चा प्रेमळ बाप निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभा राहून कृतार्थ निरोप देतो आहे. सध्या गोखल्यांना दृष्टीदोषाने ग्रासले आहे. पण ‘एकता’बद्दल बोलताना त्यांच्या नजरेतले प्रेमाचे लखलखते पाणी अख्ख्या चाळीस वर्षांची कृतार्थ कहाणी सांगते.(उत्तर अमेरिकेतली ‘मराठी’ कहाणी : अग्रलेखाच्या पानावर)कोण आहे एकता विनायक गोखले?हे उत्तर अमेरिकेतून प्रसिद्ध होणारे ‘एकता’ त्रैमासिक! १९६४ साली दूरदेशी गेलेल्या विनायक गोखले यांनी मित्रांसह ‘एकता’ला जन्माला घातले व पोटच्या मुलीसारखे परदेशातल्या पहिल्या मराठी त्रैमासिकाचे लालनपालन केले.एकताचा पहिला अंक निघाला फेब्रुवारी १९७९ मध्ये. पहिला अंक पूर्णत: विनायक गोखले यांच्या अक्षरात होता, कारण मराठी टाइपसेटिंगचे दिवस दूर होते.एकता १९८७ पर्यंत ‘हस्तलिखित’च असे. संगणकयुग सुरू झाल्यावर १९९३ पासून मग हे ‘हस्तलेखन’ संपले.