शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘एकता विनायक गोखले’च्या निरोपाची हुरहुर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 02:31 IST

मराठी भाषेचा हरवलेला दुवा जोडून एकाकीपणा केला होता दूर

- अपर्णा वेलणकर एकता विनायक गोखले. जन्म १९७९ चा. चाळीस वर्षे ती उत्तर अमेरिकेसह जगातील मराठी माणसांची मैत्रीण होती. महासागर ओलांडून गेलेल्या एकाकी मराठी मनाला आधार द्यायला दुसरे कुणी नव्हते, पुलंचे शब्द नी भीमसेन व कुमारांचे स्वर कानी पडणे दुर्मिळ होते, लाडू, करंज्या आणि आकाशकंदिल नसल्याने परदेशातील दिवाळी उदास होती...अशा इंटरनेटपूर्व काळात कॅनडाच्या टोरोण्टो मध्ये जन्मलेली ही ‘एकता’. तिने दूरदेशी वास्तव्याला गेलेल्या कित्येक मराठी संसारांना सोबत केली, बोला-ऐकायला दुर्मीळ होऊन बसलेल्या मराठी भाषेचा हरवला दुवा जोडून एकाकीपणा दूर केलँ. एकमेकांना फोन करणे परवडत नव्हते, अशा काळात उत्तर अमेरिकेत नव्याने आलेल्या मराठी कुटुंबांची एकमेकांशी गाठ घालून दिली. बदलत्या काळाने दूरदेशी वास्तव्यातील सीमारेषा पार पुसून टाकल्याने आपल्या मैत्रीची जुनी गरज सरली आहे हे लक्षात घेऊन ‘एकता’ने या महिन्यात ‘निरोप’ घेतला.अंकाचे संपादन करणे, त्यासाठी नवनव्या कल्पना काढणे, लेख मागवणे, आवाहने करणे, अंकाची मांडणी करण्यापासून पत्ते चिकटवलेल्या अमेरिकेत पाठवायच्या अंकांच्या थैल्या टोरोण्टोपासून १६0 किमी वरच्या बफेलो पोस्टात नेऊन टाकण्यापर्यंतची सगळी उस्तवार होत गोखलेच करीत.जागतिकीकरणाची लाट येण्याच्या कितीतरी आधी दहा-पंधरा हजार मैलांचे अंतर ओलांडून उत्तर अमेरिकेत गेलेल्या मराठी कुटुंबांच्या प्रवासाचा ‘एकता’ हा एक संपन्न दस्तावेजच आहे. विनायक-प्रतिभा गोखले यांच्यासह अनेकांनी ‘ना नफा’ तत्वावर चालवलेले हे त्रैमासिक यावर्षी पूर्णविराम घेते झाले आहे.आता ‘एकता’चा प्रेमळ बाप निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभा राहून कृतार्थ निरोप देतो आहे. सध्या गोखल्यांना दृष्टीदोषाने ग्रासले आहे. पण ‘एकता’बद्दल बोलताना त्यांच्या नजरेतले प्रेमाचे लखलखते पाणी अख्ख्या चाळीस वर्षांची कृतार्थ कहाणी सांगते.(उत्तर अमेरिकेतली ‘मराठी’ कहाणी : अग्रलेखाच्या पानावर)कोण आहे एकता विनायक गोखले?हे उत्तर अमेरिकेतून प्रसिद्ध होणारे ‘एकता’ त्रैमासिक! १९६४ साली दूरदेशी गेलेल्या विनायक गोखले यांनी मित्रांसह ‘एकता’ला जन्माला घातले व पोटच्या मुलीसारखे परदेशातल्या पहिल्या मराठी त्रैमासिकाचे लालनपालन केले.एकताचा पहिला अंक निघाला फेब्रुवारी १९७९ मध्ये. पहिला अंक पूर्णत: विनायक गोखले यांच्या अक्षरात होता, कारण मराठी टाइपसेटिंगचे दिवस दूर होते.एकता १९८७ पर्यंत ‘हस्तलिखित’च असे. संगणकयुग सुरू झाल्यावर १९९३ पासून मग हे ‘हस्तलेखन’ संपले.