शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

Eknath Shinde: संतोष बांगर उद्धव ठाकरेंसोबत राहून काय करत होते? एकनाथ शिंदेंचा हिंगोलीतून मोठा गौप्यस्फोट

By विजय पाटील | Updated: August 8, 2022 23:02 IST

Eknath Shinde: संतोष बांगर हे माझे चेले आहेत. त्यांच्यावर माझे प्रेम आहे. ते आमच्यासोबत कसे नाहीत? असा प्रश्न अनेकांना पडत होता. उलट ते आम्हाला बाहेर काहीही बोलत असल्याने लोकांना वेगळे वाटायचे. मात्र ते एकेक आमदार आमच्याकडे पाठवत होते.

 हिंगोली : राज्यात विविध विभागातील रिक्त जागांचा आढावा घेतला आहे. बेराेजगारांना काम मिळण्यासह प्रशासन गतिमान करण्यासाठी ८० हजार रिक्त जागा भरणार आहोत. यात पोलीस भरतीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री नऊच्या सुमारास हिंगोली येथील शिवसेनेच्या सभेत केले.

संतोष बांगर हे माझे चेले आहेत. त्यांच्यावर माझे प्रेम आहे. ते आमच्यासोबत कसे नाहीत? असा प्रश्न अनेकांना पडत होता. उलट ते आम्हाला बाहेर काहीही बोलत असल्याने लोकांना वेगळे वाटायचे. मात्र ते एकेक आमदार आमच्याकडे पाठवत होते. त्यांनी योग्य वेळी आपले पत्ते उघडले. गरजेच्या वेळी ते आमच्या बाजूने उभे राहिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

यावेळी मंचावर माजी मंत्री संजय राठोड, आ. बालाजी कल्याणकर, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. विप्लव बाजोरिया, माजी खा. शिवाजी माने, माजी आ. रामराव वडकुते, राजेंद्र शिखरे, राजेश्वर पतंगे, सुभाष बांगर, फकिरा मुंडे, राम कदम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रास्ताविकात आ. संतोष बांगर यांनी मराठा आरक्षण, शेळी-मेंढी विकास महामंडळाचे कळमनुरी येथेही कार्यालय, लमाणदेव मंदिर, आदिवासी भवनासाठी प्रत्येकी ५ कोटी, औंढा नागनाथसाठी ६० कोटींचा निधी देण्याची मागणी केली. मागील काही दिवसांपासून शिवसेनेची मंडळी टीका करीत असल्याने आमचा नाद करू नका. अंगावर आल्यास शिंगावर घेऊ, असा इशारा दिला. दगड मारा, गाडी फोडा जिल्हाप्रमुख करू, असे म्हणणाऱ्यांना महिनाभरापासून जिल्हाप्रमुख भेटत नाही. तुम्ही काय टक्कर देणार, असा सवाल केला.

यावेळी खा. हेमंत पाटील यांनीही माजी खासदार सुभाष वानखेडेंवर टीका करून महाराजांच्या वंशजाला राज्यसभा देत नसाल तर शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा तुम्हाला काय अधिकार, असा सवाल नाव न घेता उद्धव ठाकरे यांना केला. शिवसेनेने शिवसैनिकांना कायम लाचार बनवून ठेवल्याचा आरोपही केला . 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मागील महिनाभरापासून लोक नावे ठेवत आहेत. मात्र त्यांना कामातून चोख उत्तर देऊ. जनतेला महायुतीचे उमेदवार म्हणून मते मागितली. बाळासाहेबाच्या हिंदुत्वाच्या विचाराने मते मागितली. तो विचार पुढे नेण्यासाठी महाविकास आघाडी सोडून भाजपसोबत बसणेच योग्य आहे. यात चूक कोणाची? हे जनतेने पाहिले आहे. त्यामुळे जेथे जातोय, तेथे प्रसन्न मुद्रेने लोक स्वागत करीत असल्याचेही ते म्हणाले. आता डबल इंजीनचे सरकार आहे. केेंद्र भरभरून मदत करायला तयार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी तसे आश्वासन दिल्याचे ते म्हणाले. तर अतिवृष्टीत झालेले नुकसान मी डोळ्यांनी पाहिले, यापूर्वी कधी झाली नसेल तेवढी मदत देऊ, असे जाहीरपणे सांगितले.

१० कोटींचा निधी जाहीरमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळमनुरी येथील लमाण देव व आदिवासी भवनाला दहा कोटींचा निधीही जाहीर करून टाकला. तर औंढा नागनाथच्या विकासासाठी मंजूर झालेले ६० कोटी लवकरच मिळतील. विपश्यना केेंद्र, अन्नप्रक्रिया उद्योग याला चालना देऊ. बाळापूरला तालुकानिर्मितीबाबत सकारात्मक असून नासाची प्रयोगशाळा केंद्र शासनाकडे मुद्दा मांडून मार्गी लावू, असेही ते म्हणाले. तर ग्रामीण रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावून खेड्यापाड्यापर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्याचा उद्देश असल्याचेही ते म्हणाले. मराठा आरक्षण महायुतीच्या काळात दिले होते. नंतर हे प्रकरण आता न्यायालयात आहे. ते मिळण्यासाठी तज्ज्ञांची फौज उभी करू. मात्र तोपर्यंत मराठा समाजाला विविध फायदे देण्यात येत असल्याचेही शिंदे म्हणाले.

संतोष बांगर एकेक आमदार माझ्याकडे पाठवत होतेआ.संतोष बांगर हे माझे चेले आहेत. त्यांच्यावर माझे प्रेम आहे. ते आमच्यासोबत कसे नाहीत? असा प्रश्न अनेकांना पडत होता. उलट ते आम्हाला बाहेर काहीही बोलत असल्याने लोकांना वेगळे वाटायचे. मात्र ते एकेक आमदार आमच्याकडे पाठवत होते. त्यांनी योग्य वेळी आपले पत्ते उघडले. गरजेच्या वेळी ते आमच्या बाजूने उभे राहिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाHingoliहिंगोली