शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातलं राजकारण पेटलं अन् आता देवेंद्र फडणवीस, शरद पवार दिल्ली गाठणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 11:52 IST

विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे अचानक नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेत राजकीय भूकंप झाला

मुंबई - मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ५० आमदारांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका घेत शिवसेनेचे तब्बल ३८ आमदार वेगळे झाले आहेत. या आमदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारत थेट गुवाहाटी गाठलं आहे. त्यात आता राज्यातील सरकारवर अस्थिरतेचे सावट आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 

एकीकडे राज्यात शिवसेनेत मोठी बंडाळी निर्माण झालेली असताना देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे. फडणवीस दिल्लीत पक्ष नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी मैदानात उतरलेले शरद पवारही आज दिल्लीला गेल्याची माहिती आहे. दिल्ली येथे विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदासाठी यशवंत सिन्हा यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे. त्यासाठी पवार दिल्लीला गेल्याची माहिती आहे.

विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे अचानक नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेत राजकीय भूकंप झाला. शिंदेपाठोपाठ शिवसेनेचे १-१ करत तब्बल ३८ आमदार सूरतमार्गे गुवाहाटीला पोहचले. या नाराज आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आव्हान निर्माण केले. आम्ही शिवसेनेचे, बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत असं सांगत आमदारांनी आम्हीच शिवसेना ही भूमिका घेतली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. 

त्यांचे बाप अनेक, आमचा बाप एकच बाळासाहेब - राऊतशिवसेनेच्या नावाचा वापर करुन बंडखोरांनी मतं मागू नयेत. त्यांनी त्यांच्या बापाचं नाव लावावं, ते स्वत: बाळासाहेबांचे भक्त म्हणतात, पण बाळासाहेबांचे भक्त पाठीत खंजीर खुपसत नाहीत असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. तसेच, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं नाव देण्याची वेळ त्यांच्यावर आली. पण, तुम्ही तुमच्या बापाचं नाव द्या, तुमच्या बापाच्या नावानं पक्ष बनवा आणि बापाच्या नावानं मतं मागा. आमच्या पक्षाचा जो बाप आहे, त्याच्या नावाने का मते मागता. तुम्हाला तर १०० बाप आहेत तिकडं, कोणी दिल्लीत आहे, कोणी नागपुरात आहे, कोणी मुंबईत आहे, असे म्हणत राऊत यांनी बंडखोर आमदारांवर घणाघाती टिका केली. 

शिवसेनेच्या नावावरच निवडून येतो असं नाही - केसरकर'आम्ही कोणाच्याच नावाने मते मागितलेली नाही. आम्ही अन्य पक्षातूनही निवडून आलो आहोत. फक्त शिवसेनेच्या नावावर निवडून येत असते तर सगळे निवडून आले असते. उमेदवाराचंही गुडविलं असतं आणि पक्षाचंही ठराविक मतदान असतं. आजच्या विधान सभेतील किमान ७० ते ८० किंवा १०० उमेदवार कुठल्याही चिन्हावर निवडून येऊ शकतात. आमदारांचं मतदारसंघात आणि जिल्ह्यात काम असतं,' असे म्हणत शिंदे गटाचे आमदार दिपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना उत्तर दिलं.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस