शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

शिंदे-फडणवीस सरकारचा धडाका; १०० दिवसांत ७००हून अधिक निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 06:04 IST

या शंभर दिवसांच्या काळात सातशेहून अधिक लाेकाेपयाेगी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले गेले आहेत.

दीपक भातुसे । लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई:एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकार ३० जून रोजी राज्यात अस्तित्वात आले. शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याला शनिवारी १०० दिवस पूर्ण होत आहेत. या शंभर दिवसांच्या काळात सातशेहून अधिक लाेकाेपयाेगी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले गेले आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या निर्णयाचा गाेषवारा…

मुख्यमंत्र्यांकडील विभागाचे महत्त्वाचे निर्णय

- समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढवण्याचा निर्णय- कुलाबा-वांद्रे- सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-३ च्या १० हजार कोटींच्या वाढीव खर्चास मान्यता- मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी ५ हजार ५०० कोटींचा निधी- धारावी पुनर्विकासासाठी नव्याने निविदा मागवण्याचा निर्णय- नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या सुधारित ९२७९ कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता देण्याचा निर्णय- एमएमआरडीएला विविध प्रकल्प राबविण्यासाठी ६० हजार कोटींपर्यंतचे कर्ज उभारण्यास शासन हमी देण्याचा निर्णय

इतर विभागांमधील महत्त्वाचे निर्णय  

- दिवाळीच्या तोंडावर राज्यातील रेशन कार्डधारकांना १०० रुपयांत एक किलो रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल  - १४ लाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहन मदत - अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना २ ऐवजी ३ हेक्टर मर्यादेत वाढीव मदत  - निकषात बसत नसलेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत- शंखी गोगलगाईंमुळे बाधित शेतकऱ्यांना ९८ कोटी रुपयांची मदत - पेट्रोलच्या करात पाच रुपये आणि डिझेलच्या करात तीन रुपयांची कपात- पोलिसांच्या ७२३१ पदांच्या भरतीचा निर्णय- विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांच्या पुनर्गठनाचा निर्णय - एमपीएससीच्या कक्षेतील १०० टक्के व कक्षेबाहेरील ५० टक्के पद भरतीचा निर्णय - वर्ग ३ मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे एमपीएससीमार्फत भरण्याचा निर्णय- पोलिसांच्या नैमित्तिक रजा १२ वरून २० करण्याचा निर्णय

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस