शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लक्ष होत पंकजां मुंडेकडे मात्र माहोल केला एकनाथ खडसेंनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 16:30 IST

पंकजा मुंडे ह्या भाजपवर टीका करतील किंवा पक्ष सोडण्याचे निर्णय घेतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

- मोसीन शेख 

मुंबई: दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ मुंडे समर्थकांच्या मेळाव्यात माजी मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे काय बोलणार व त्यांची भूमिका  काय असणार, याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले होते. पंकजा मुंडे ह्या भाजपवर टीका करतील किंवा पक्ष सोडण्याचे निर्णय घेतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र या मेळाव्यात एकनाथ खडसेंनी ज्याप्रमाणे भाजप वर टीका केली, त्यांनतर पंकजांपेक्षा खडसेंचीच अधिक चर्चा पाहायला मिळाली.

गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे ह्या भाजपमध्ये नाराज असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टनंतर त्या भाजप सोडणार इथपर्यंत चर्चा पाहायला मिळाल्या. मात्र, मी पक्ष सोडणार नाही, पक्षाला मला सोडायचं असेल तर त्यांनी तसा निर्णय घ्यावा. तसेच मला कोणत्याही पदाची अपेक्षा नसल्याची भूमिका पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावरील केलेल्या भाषणातून  स्पष्ट केली. मात्र याचवेळी त्यांच्याधी झालेल्या भाषणातून भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर घणाघात केला.

आपल्या भाषणात बोलताना खडसे म्हणाले की, मला सांगतात पक्षाच्या विरोधात बोलू नका, पण मी पक्षाच्या विरोधात कधी बोललोच नाही, मला पक्ष आणि नेते प्रिय, पण एकीकडे तोंडावर प्रेम करायचं आणि मागून पाडायचं हे आम्हाला दिसतं, हे घडलं नाही, घडवलं, असा घणाघात एकनाथ खडसे यांनी केला. तर देवेंद्र फडणवीसांना पक्षाचा अध्यक्ष करायचं हे गोपीनाथ मुंडेंनी मला सांगितलं, मुंडे साहेबांनी सांगितलं म्हणून मी संमती दिली, पण ज्यांनी मोठं केलं त्यांनाच अशी वागणूक दिली, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर हल्ला केला.

गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर संघर्ष केला. तोच संघर्ष आज माझ्या वाट्याला आला आहे. मी तसाच संघर्ष आज अनुभवतो आहे असं एकनाथ खडसे म्हणाले. आधी छळायचं, मारायचं, दुर्लक्ष करायचं आणि मग म्हणायचं की गोपीनाथजी असते तर एकनाथ खडसेच मुख्यमंत्री झाले असते, असा टोला सुद्धा खडसेंनी यावेळी भाजपला लगावला. त्यामुळे गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतनाच खरा माहोल खडसेंनी तयार केल्याची चर्चा उपस्थिती कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाली.