शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
8
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
9
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
10
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
11
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
12
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
13
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
14
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
15
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
16
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
17
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
18
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
19
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
20
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय

आठवलेंना मुख्यमंत्री म्हणाले, ‘प्रतीक्षा करा’

By admin | Updated: January 23, 2017 19:23 IST

मुंबई महापालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी प्रमुख दावेदार असलेल्या शिवसेना व भाजपामध्ये अद्याप युतीबाबत अनिश्चितता आहे.

आठवलेंना मुख्यमंत्री म्हणाले, ‘प्रतीक्षा करा’जमीर काझी : मुंबईमुंबई महापालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी प्रमुख दावेदार असलेल्या शिवसेना व भाजपामध्ये अद्याप युतीबाबत अनिश्चितता आहे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (आठवले गट) मात्र आपली प्राथमिक भूमिका भाजपा श्रेष्ठींकडे मांडली आहे. भाजपा स्वतंत्रपणे लढणार असल्यास किमान २८ व सेनेसमवेत रिंगणात उतरण्याचे झाल्यास किमान १५ जागा देण्यात याव्यात, असा प्रस्ताव आरपीआयने बनविला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा केली आहे. मात्र तेव्हा मुख्यमंत्र्यांकडून ‘प्रतीक्षा करा’ असे सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आठवले गटाने भाजपाची शिवसेनेबरोबर युती न झाल्यास देखील भाजपासमवेत कायम राहणार असल्याची भूमिका यापूर्वीच घेतली आहे. सध्याच्या सभागृहात रिपाईचा एक नगरसेवक आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील वर्चस्वासाठी सत्तारुढ भाजपा व सेनेतच जोरदार चढाओढ आहे. मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांच्या सभागृहात ५० ते ५५ ठिकाणी दलित मते निर्णायक आहेत. त्यामुळे आरपीआयच्या विविध गटा-तटांच्या भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यात केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या आठवले गटाचे महत्त्व निश्चितच अधिक आहे. ....................................‘आरपीआय’ला नको भाजपाचे चिन्ह रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) हा भाजपासोबत युतीत असला तरी स्वतंत्र अस्तित्त्व असणारा पक्ष आहे. रिपाइंला सुद्धा पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी रिपाइं उमेदवारांना भाजपचे निवडणूक चिन्ह देण्याचे प्रकार घडले आहेत. त्यानंतर सावध झालेल्या रिपाइं (ए ) ने असे प्रकार पुन्हा घडू नयेत, अशी विनंती करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेश अध्यक्ष, खासदार रावसाहेब दानवे पाटील यांना दिल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर आणि राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी दिली. यावेळी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, तानसेन ननावरे, काकासाहेब खंबाळकर. डी. एम. चव्हाण आदींची उपस्थिती होती. यापुढील निवडणुकांमध्ये रिपाइं उमेदवारांसमोर भाजपाचे बंडखोर उमेदवार उभे राहू नयेत, बंडखोरांना भाजपने निवडणूक चिन्ह आणि एबी फॉर्म देऊ नये, असेही पत्रात नमूद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.....................................