शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

आठवलेंना मुख्यमंत्री म्हणाले, ‘प्रतीक्षा करा’

By admin | Updated: January 23, 2017 19:23 IST

मुंबई महापालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी प्रमुख दावेदार असलेल्या शिवसेना व भाजपामध्ये अद्याप युतीबाबत अनिश्चितता आहे.

आठवलेंना मुख्यमंत्री म्हणाले, ‘प्रतीक्षा करा’जमीर काझी : मुंबईमुंबई महापालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी प्रमुख दावेदार असलेल्या शिवसेना व भाजपामध्ये अद्याप युतीबाबत अनिश्चितता आहे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (आठवले गट) मात्र आपली प्राथमिक भूमिका भाजपा श्रेष्ठींकडे मांडली आहे. भाजपा स्वतंत्रपणे लढणार असल्यास किमान २८ व सेनेसमवेत रिंगणात उतरण्याचे झाल्यास किमान १५ जागा देण्यात याव्यात, असा प्रस्ताव आरपीआयने बनविला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा केली आहे. मात्र तेव्हा मुख्यमंत्र्यांकडून ‘प्रतीक्षा करा’ असे सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आठवले गटाने भाजपाची शिवसेनेबरोबर युती न झाल्यास देखील भाजपासमवेत कायम राहणार असल्याची भूमिका यापूर्वीच घेतली आहे. सध्याच्या सभागृहात रिपाईचा एक नगरसेवक आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील वर्चस्वासाठी सत्तारुढ भाजपा व सेनेतच जोरदार चढाओढ आहे. मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांच्या सभागृहात ५० ते ५५ ठिकाणी दलित मते निर्णायक आहेत. त्यामुळे आरपीआयच्या विविध गटा-तटांच्या भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यात केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या आठवले गटाचे महत्त्व निश्चितच अधिक आहे. ....................................‘आरपीआय’ला नको भाजपाचे चिन्ह रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) हा भाजपासोबत युतीत असला तरी स्वतंत्र अस्तित्त्व असणारा पक्ष आहे. रिपाइंला सुद्धा पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी रिपाइं उमेदवारांना भाजपचे निवडणूक चिन्ह देण्याचे प्रकार घडले आहेत. त्यानंतर सावध झालेल्या रिपाइं (ए ) ने असे प्रकार पुन्हा घडू नयेत, अशी विनंती करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेश अध्यक्ष, खासदार रावसाहेब दानवे पाटील यांना दिल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर आणि राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी दिली. यावेळी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, तानसेन ननावरे, काकासाहेब खंबाळकर. डी. एम. चव्हाण आदींची उपस्थिती होती. यापुढील निवडणुकांमध्ये रिपाइं उमेदवारांसमोर भाजपाचे बंडखोर उमेदवार उभे राहू नयेत, बंडखोरांना भाजपने निवडणूक चिन्ह आणि एबी फॉर्म देऊ नये, असेही पत्रात नमूद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.....................................