शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

सीमावादातून आठ गावे अंधारात!

By admin | Updated: February 4, 2015 02:05 IST

दफ्तरदिरगांईमुळे महाराष्ट्राकडून वीजपुरवठा झाला नाही.तर तेलगंणने सहानुभूती मिळावी म्हणून सीमा भागातील १४ गावांना वीजपुरवठा केला़

संघरक्षित तावाडेल्ल जिवती (जि़ चंद्रपूर)दफ्तरदिरगांईमुळे महाराष्ट्राकडून वीजपुरवठा झाला नाही.तर तेलगंणने सहानुभूती मिळावी म्हणून सीमा भागातील १४ गावांना वीजपुरवठा केला़ मात्र, बील भरले नसल्याचे सांगत दोन महिन्यांपूर्वी ८ गावांचा पुरवठा तोडण्यात आल्याने ही गावे अंधारात बुडाली आहेत़ दुसरीकडे वीजबीलच मिळाले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. एकूणच महाराष्ट्र व तेलंगण राज्याच्या सीमावादात ही गावे भरडली जात आहेत़ जिवती तालुक्याच्या सिमेवरील १४ गावे वादग्रस्त असून, या गावांत दोन्ही राज्यांच्या काही प्रमाणात सुविधा आहेत. पैकी लेंडीगुडा, भोलापठार, अंतापूर, येसापूर, इंदिरानगर, पद्मावती, कामतगुडा या गावांना तेलंगणने वीज पुरवठा केला़ मात्र, दोन महिन्यांपूर्वी तो खंडित केला आहे़ परिणामी या गावांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे़ विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींनीही याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते़ या आठही गावांजवळ राजीव गांधी ग्रामीण योजनेतंर्गत महाराष्ट्र शासनाने खांब उभे करून केवळ ट्रान्सफार्मर बसविले आहेत. जोपर्यंत येथील रहिवाशी डिमांड भरत नाहीत, तोपर्यंत वीजजोडणी देता येणार नसल्याचे जिवतीचे उपकार्यकारी अभियंता एन.एम. वैरागडे यांनी स्पष्ट केले. तर या ठिकाणी आताच आलो असून, यासंदर्भात आपल्याला काहीच माहित नसल्याचे बल्लारपूरचे कार्यकारी अभियंता चोपडे यांनी सांगितले.महाराष्ट्राची वीज नसली तरी पूर्वी तेलंगण राज्यातून वीजपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांना अडचण नव्हती. मात्र तेलंगणनेही वीज कापल्याने पिठगिरणी, शेतातील वीजपंप बंद पडले आहेत. अतिसंवेदनशिल व दुर्गम असलेली ही गावे अंधारात बुडाली आहेत़ राजीव गांधी ग्रामीण विकास योजनेतंर्गत या गावांसाठी डीपीपर्यंत खांब उभे केले आहेत. पूर्वी या गावात तेलंगणची वीज उपलब्ध असल्याने गावात खांब व तार टाकले नाहीत. येथील लोकांकडून डिमांड मागितले; पण डिमांड अर्ज प्राप्त न झाल्याने खांब उभे केले नाहीत. - के.एन. पिदूरकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, बल्लारपूर विभागसीमावर्ती भागातील ग्राहक वीजबिल भरत नसल्याने वीजजोडणी कापण्यात आली. वीजबील भरणा केल्यानंतर पुरवठा पूर्ववत केला जाईल. - पी. रवींद्र, लाईनमन,चेरामेरी (तेलंगण)सीमावर्ती भागातील आठ गावांचे वीज कनेक्शन कापल्याची आपल्याला माहिती नाही. असा प्रकार असल्यास खरोखर ते गंभीर आहे. याबाबत चौकशी केल्यानंतर योग्य ती कारवाई करू. - पी. श्रीनिवासन जय, सहायक अभियंता, बेलमपूर विभाग (तेलंगण)