शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सीमावादातून आठ गावे अंधारात!

By admin | Updated: February 4, 2015 02:05 IST

दफ्तरदिरगांईमुळे महाराष्ट्राकडून वीजपुरवठा झाला नाही.तर तेलगंणने सहानुभूती मिळावी म्हणून सीमा भागातील १४ गावांना वीजपुरवठा केला़

संघरक्षित तावाडेल्ल जिवती (जि़ चंद्रपूर)दफ्तरदिरगांईमुळे महाराष्ट्राकडून वीजपुरवठा झाला नाही.तर तेलगंणने सहानुभूती मिळावी म्हणून सीमा भागातील १४ गावांना वीजपुरवठा केला़ मात्र, बील भरले नसल्याचे सांगत दोन महिन्यांपूर्वी ८ गावांचा पुरवठा तोडण्यात आल्याने ही गावे अंधारात बुडाली आहेत़ दुसरीकडे वीजबीलच मिळाले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. एकूणच महाराष्ट्र व तेलंगण राज्याच्या सीमावादात ही गावे भरडली जात आहेत़ जिवती तालुक्याच्या सिमेवरील १४ गावे वादग्रस्त असून, या गावांत दोन्ही राज्यांच्या काही प्रमाणात सुविधा आहेत. पैकी लेंडीगुडा, भोलापठार, अंतापूर, येसापूर, इंदिरानगर, पद्मावती, कामतगुडा या गावांना तेलंगणने वीज पुरवठा केला़ मात्र, दोन महिन्यांपूर्वी तो खंडित केला आहे़ परिणामी या गावांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे़ विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींनीही याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते़ या आठही गावांजवळ राजीव गांधी ग्रामीण योजनेतंर्गत महाराष्ट्र शासनाने खांब उभे करून केवळ ट्रान्सफार्मर बसविले आहेत. जोपर्यंत येथील रहिवाशी डिमांड भरत नाहीत, तोपर्यंत वीजजोडणी देता येणार नसल्याचे जिवतीचे उपकार्यकारी अभियंता एन.एम. वैरागडे यांनी स्पष्ट केले. तर या ठिकाणी आताच आलो असून, यासंदर्भात आपल्याला काहीच माहित नसल्याचे बल्लारपूरचे कार्यकारी अभियंता चोपडे यांनी सांगितले.महाराष्ट्राची वीज नसली तरी पूर्वी तेलंगण राज्यातून वीजपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांना अडचण नव्हती. मात्र तेलंगणनेही वीज कापल्याने पिठगिरणी, शेतातील वीजपंप बंद पडले आहेत. अतिसंवेदनशिल व दुर्गम असलेली ही गावे अंधारात बुडाली आहेत़ राजीव गांधी ग्रामीण विकास योजनेतंर्गत या गावांसाठी डीपीपर्यंत खांब उभे केले आहेत. पूर्वी या गावात तेलंगणची वीज उपलब्ध असल्याने गावात खांब व तार टाकले नाहीत. येथील लोकांकडून डिमांड मागितले; पण डिमांड अर्ज प्राप्त न झाल्याने खांब उभे केले नाहीत. - के.एन. पिदूरकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, बल्लारपूर विभागसीमावर्ती भागातील ग्राहक वीजबिल भरत नसल्याने वीजजोडणी कापण्यात आली. वीजबील भरणा केल्यानंतर पुरवठा पूर्ववत केला जाईल. - पी. रवींद्र, लाईनमन,चेरामेरी (तेलंगण)सीमावर्ती भागातील आठ गावांचे वीज कनेक्शन कापल्याची आपल्याला माहिती नाही. असा प्रकार असल्यास खरोखर ते गंभीर आहे. याबाबत चौकशी केल्यानंतर योग्य ती कारवाई करू. - पी. श्रीनिवासन जय, सहायक अभियंता, बेलमपूर विभाग (तेलंगण)