शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

आठ तासांचा प्रवास तीन तासांत

By admin | Updated: December 14, 2015 01:53 IST

मुंबईहून अहमदाबादला जात आहात का? मग बुलेट ट्रेनने अवघ्या ३ तासांत प्रवास पूर्ण करा, अशा गप्पा ८ वर्षांनंतर प्रवाशांमध्ये रंगतील.

मुंबई : मुंबईहून अहमदाबादला जात आहात का? मग बुलेट ट्रेनने अवघ्या ३ तासांत प्रवास पूर्ण करा, अशा गप्पा ८ वर्षांनंतर प्रवाशांमध्ये रंगतील. मुंबई - अहमदाबाददरम्यानचा प्रवास वेगवान करण्यासाठी भारत व जपानमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाचा करार शनिवारी झाला. या करारामुळे दोन्ही शहरांमधील अंतर कमी होईल. बुलेट ट्रेन प्रकल्पाचा जपान इंटरनॅशनल को-आॅपरेशनने (जायका) मागील दोन वर्षांत अभ्यास पूर्ण केला असून, जुलै महिन्यात अहवालही सादर केला आहे. मुंबईहून अहमदाबाद आणि त्यापुढे जाण्यासाठी दररोज २५ पेक्षा जास्त ट्रेन उपलब्ध आहेत. यात एक्सप्रेस, पॅसेंजर ट्रेन आणि एसी डबल डेकर ट्रेनचाही समावेश आहे. मुंबई ते अहमबाद प्रवासाला आठ तास लागतात. या दोन्ही शहरांदरम्यान दररोज व्यापारी तसेच व्यावसायिकांसह अनेक प्रवाशांची ये - जा असते. एकूणच व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून बुलेट ट्रेन चालविण्याचा हा पर्याय समोर आला. साधारण २00९-२0१0 साली रेल्वे अर्थसंकल्पात या प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल सादर झाला होता. मात्र प्रत्यक्षात प्रकल्पाला गती मिळण्यास फारच उशीर झाला. या प्रकल्पाचा जपान इंटरनॅशनल एजन्सीकडून मागील दोन वर्षांत अभ्यास करण्यात आला असून, त्याचा अहवाल जुलै महिन्यात रेल्वेला सादर करण्यात आला. मुंबई-अहमदाबाद-पुणे असा ६५0 किलोमीटरचा प्रकल्प सुरुवातीला रेल्वेसमोर ठेवण्यात आला. मात्र पुण्यातून बुलेट ट्रेन नेताना घाटमाथ्याचा अडथळा पाहता पुणे शहराला सध्या सायडिंगला ठेवण्याचा विचार करण्यात आल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. ही बुलेट ट्रेन पुणेमार्गे घाट आणि चढउतार असून, त्यामुळे सुरक्षेचा आणि अन्य प्रश्न उद्भवू शकतात. त्यामुळेच बुलेट ट्रेनच्या प्रकल्पातून पुण्याला बाजूला ठेवण्याचा विचार केला जात असल्याचे सांगण्यात आले. मुंबईतून बुलेट ट्रेनची सुरुवात करायची असल्यास त्यासाठी जागेचा शोधही सुरू आहे. अधिक मोकळी जागा हवी असल्याने प्रथम पसंती वांद्र्यातील बीकेसीला देण्यात आली आहे. मात्र यातही काही तांत्रिक अडथळे समोर आल्याने ते सोडविण्याचा प्रयत्न रेल्वेकडून केला जात आहे. (प्रतिनिधी)>> या प्रकल्पाची किंमत सुरुवातीला ६५ हजार कोटी एवढी ठरविण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात प्रकल्पाला होत असलेला उशीर आणि वाढणारा खर्च पाहता आता त्याची किंमत ९८ हजार कोटी एवढी झाली आहे. यात जवळपास ३३ हजार कोटींची भर पडली आहे.>> ११ स्थानकांवरही थांबे अशक्यमुंबई ते अहमदाबादपर्यंत बुलेट ट्रेनला तीन तासांत अंतर कापायचे असल्याने ११ स्थानकांवर थांबे देणेही अशक्य असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. त्याचीही पडताळणी केली जात आहे. या प्रकल्पासाठी मुंबईतून बुलेट ट्रेन सोडण्यासाठी सुरुवातीची जागा आणि आगार शोधण्यात येत आहे. त्यासाठी बीकेसीचे नाव पुढे होते. मात्र आता मुंबई सेन्ट्रलही किंवा एलटीटीचा पर्याय ठेवण्यात येत आहे. पुण्यातून ही ट्रेन जाताना डोंगरमाथ्याचा अडथळा असल्याने सुरक्षेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे पुण्याचा विचार सध्या करण्यात आलेला नाही. काही जागांचा शोध सुरू असून, तांत्रिक समस्याही सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. - शरत चंद्रायन, पश्चिम रेल्वे, मुख्य जनसंपर्क अधिकारी