शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

आठ तासांचा प्रवास तीन तासांत

By admin | Updated: December 14, 2015 01:53 IST

मुंबईहून अहमदाबादला जात आहात का? मग बुलेट ट्रेनने अवघ्या ३ तासांत प्रवास पूर्ण करा, अशा गप्पा ८ वर्षांनंतर प्रवाशांमध्ये रंगतील.

मुंबई : मुंबईहून अहमदाबादला जात आहात का? मग बुलेट ट्रेनने अवघ्या ३ तासांत प्रवास पूर्ण करा, अशा गप्पा ८ वर्षांनंतर प्रवाशांमध्ये रंगतील. मुंबई - अहमदाबाददरम्यानचा प्रवास वेगवान करण्यासाठी भारत व जपानमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाचा करार शनिवारी झाला. या करारामुळे दोन्ही शहरांमधील अंतर कमी होईल. बुलेट ट्रेन प्रकल्पाचा जपान इंटरनॅशनल को-आॅपरेशनने (जायका) मागील दोन वर्षांत अभ्यास पूर्ण केला असून, जुलै महिन्यात अहवालही सादर केला आहे. मुंबईहून अहमदाबाद आणि त्यापुढे जाण्यासाठी दररोज २५ पेक्षा जास्त ट्रेन उपलब्ध आहेत. यात एक्सप्रेस, पॅसेंजर ट्रेन आणि एसी डबल डेकर ट्रेनचाही समावेश आहे. मुंबई ते अहमबाद प्रवासाला आठ तास लागतात. या दोन्ही शहरांदरम्यान दररोज व्यापारी तसेच व्यावसायिकांसह अनेक प्रवाशांची ये - जा असते. एकूणच व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून बुलेट ट्रेन चालविण्याचा हा पर्याय समोर आला. साधारण २00९-२0१0 साली रेल्वे अर्थसंकल्पात या प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल सादर झाला होता. मात्र प्रत्यक्षात प्रकल्पाला गती मिळण्यास फारच उशीर झाला. या प्रकल्पाचा जपान इंटरनॅशनल एजन्सीकडून मागील दोन वर्षांत अभ्यास करण्यात आला असून, त्याचा अहवाल जुलै महिन्यात रेल्वेला सादर करण्यात आला. मुंबई-अहमदाबाद-पुणे असा ६५0 किलोमीटरचा प्रकल्प सुरुवातीला रेल्वेसमोर ठेवण्यात आला. मात्र पुण्यातून बुलेट ट्रेन नेताना घाटमाथ्याचा अडथळा पाहता पुणे शहराला सध्या सायडिंगला ठेवण्याचा विचार करण्यात आल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. ही बुलेट ट्रेन पुणेमार्गे घाट आणि चढउतार असून, त्यामुळे सुरक्षेचा आणि अन्य प्रश्न उद्भवू शकतात. त्यामुळेच बुलेट ट्रेनच्या प्रकल्पातून पुण्याला बाजूला ठेवण्याचा विचार केला जात असल्याचे सांगण्यात आले. मुंबईतून बुलेट ट्रेनची सुरुवात करायची असल्यास त्यासाठी जागेचा शोधही सुरू आहे. अधिक मोकळी जागा हवी असल्याने प्रथम पसंती वांद्र्यातील बीकेसीला देण्यात आली आहे. मात्र यातही काही तांत्रिक अडथळे समोर आल्याने ते सोडविण्याचा प्रयत्न रेल्वेकडून केला जात आहे. (प्रतिनिधी)>> या प्रकल्पाची किंमत सुरुवातीला ६५ हजार कोटी एवढी ठरविण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात प्रकल्पाला होत असलेला उशीर आणि वाढणारा खर्च पाहता आता त्याची किंमत ९८ हजार कोटी एवढी झाली आहे. यात जवळपास ३३ हजार कोटींची भर पडली आहे.>> ११ स्थानकांवरही थांबे अशक्यमुंबई ते अहमदाबादपर्यंत बुलेट ट्रेनला तीन तासांत अंतर कापायचे असल्याने ११ स्थानकांवर थांबे देणेही अशक्य असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. त्याचीही पडताळणी केली जात आहे. या प्रकल्पासाठी मुंबईतून बुलेट ट्रेन सोडण्यासाठी सुरुवातीची जागा आणि आगार शोधण्यात येत आहे. त्यासाठी बीकेसीचे नाव पुढे होते. मात्र आता मुंबई सेन्ट्रलही किंवा एलटीटीचा पर्याय ठेवण्यात येत आहे. पुण्यातून ही ट्रेन जाताना डोंगरमाथ्याचा अडथळा असल्याने सुरक्षेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे पुण्याचा विचार सध्या करण्यात आलेला नाही. काही जागांचा शोध सुरू असून, तांत्रिक समस्याही सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. - शरत चंद्रायन, पश्चिम रेल्वे, मुख्य जनसंपर्क अधिकारी