शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
2
Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
3
"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
4
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
5
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
6
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
7
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
8
Health Tips: हृदय विकाराच्या 'या' सात सूक्ष्म संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच करा उपाय!
9
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
10
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
11
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
12
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
13
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
14
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
15
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
16
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
17
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
18
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
19
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
20
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
Daily Top 2Weekly Top 5

आठ तासांचा प्रवास तीन तासांत

By admin | Updated: December 14, 2015 01:53 IST

मुंबईहून अहमदाबादला जात आहात का? मग बुलेट ट्रेनने अवघ्या ३ तासांत प्रवास पूर्ण करा, अशा गप्पा ८ वर्षांनंतर प्रवाशांमध्ये रंगतील.

मुंबई : मुंबईहून अहमदाबादला जात आहात का? मग बुलेट ट्रेनने अवघ्या ३ तासांत प्रवास पूर्ण करा, अशा गप्पा ८ वर्षांनंतर प्रवाशांमध्ये रंगतील. मुंबई - अहमदाबाददरम्यानचा प्रवास वेगवान करण्यासाठी भारत व जपानमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाचा करार शनिवारी झाला. या करारामुळे दोन्ही शहरांमधील अंतर कमी होईल. बुलेट ट्रेन प्रकल्पाचा जपान इंटरनॅशनल को-आॅपरेशनने (जायका) मागील दोन वर्षांत अभ्यास पूर्ण केला असून, जुलै महिन्यात अहवालही सादर केला आहे. मुंबईहून अहमदाबाद आणि त्यापुढे जाण्यासाठी दररोज २५ पेक्षा जास्त ट्रेन उपलब्ध आहेत. यात एक्सप्रेस, पॅसेंजर ट्रेन आणि एसी डबल डेकर ट्रेनचाही समावेश आहे. मुंबई ते अहमबाद प्रवासाला आठ तास लागतात. या दोन्ही शहरांदरम्यान दररोज व्यापारी तसेच व्यावसायिकांसह अनेक प्रवाशांची ये - जा असते. एकूणच व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून बुलेट ट्रेन चालविण्याचा हा पर्याय समोर आला. साधारण २00९-२0१0 साली रेल्वे अर्थसंकल्पात या प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल सादर झाला होता. मात्र प्रत्यक्षात प्रकल्पाला गती मिळण्यास फारच उशीर झाला. या प्रकल्पाचा जपान इंटरनॅशनल एजन्सीकडून मागील दोन वर्षांत अभ्यास करण्यात आला असून, त्याचा अहवाल जुलै महिन्यात रेल्वेला सादर करण्यात आला. मुंबई-अहमदाबाद-पुणे असा ६५0 किलोमीटरचा प्रकल्प सुरुवातीला रेल्वेसमोर ठेवण्यात आला. मात्र पुण्यातून बुलेट ट्रेन नेताना घाटमाथ्याचा अडथळा पाहता पुणे शहराला सध्या सायडिंगला ठेवण्याचा विचार करण्यात आल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. ही बुलेट ट्रेन पुणेमार्गे घाट आणि चढउतार असून, त्यामुळे सुरक्षेचा आणि अन्य प्रश्न उद्भवू शकतात. त्यामुळेच बुलेट ट्रेनच्या प्रकल्पातून पुण्याला बाजूला ठेवण्याचा विचार केला जात असल्याचे सांगण्यात आले. मुंबईतून बुलेट ट्रेनची सुरुवात करायची असल्यास त्यासाठी जागेचा शोधही सुरू आहे. अधिक मोकळी जागा हवी असल्याने प्रथम पसंती वांद्र्यातील बीकेसीला देण्यात आली आहे. मात्र यातही काही तांत्रिक अडथळे समोर आल्याने ते सोडविण्याचा प्रयत्न रेल्वेकडून केला जात आहे. (प्रतिनिधी)>> या प्रकल्पाची किंमत सुरुवातीला ६५ हजार कोटी एवढी ठरविण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात प्रकल्पाला होत असलेला उशीर आणि वाढणारा खर्च पाहता आता त्याची किंमत ९८ हजार कोटी एवढी झाली आहे. यात जवळपास ३३ हजार कोटींची भर पडली आहे.>> ११ स्थानकांवरही थांबे अशक्यमुंबई ते अहमदाबादपर्यंत बुलेट ट्रेनला तीन तासांत अंतर कापायचे असल्याने ११ स्थानकांवर थांबे देणेही अशक्य असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. त्याचीही पडताळणी केली जात आहे. या प्रकल्पासाठी मुंबईतून बुलेट ट्रेन सोडण्यासाठी सुरुवातीची जागा आणि आगार शोधण्यात येत आहे. त्यासाठी बीकेसीचे नाव पुढे होते. मात्र आता मुंबई सेन्ट्रलही किंवा एलटीटीचा पर्याय ठेवण्यात येत आहे. पुण्यातून ही ट्रेन जाताना डोंगरमाथ्याचा अडथळा असल्याने सुरक्षेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे पुण्याचा विचार सध्या करण्यात आलेला नाही. काही जागांचा शोध सुरू असून, तांत्रिक समस्याही सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. - शरत चंद्रायन, पश्चिम रेल्वे, मुख्य जनसंपर्क अधिकारी