शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे पात्र

By admin | Updated: July 16, 2015 00:04 IST

जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणी जिल्हास्तरीय समितीची बैठक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांच्या ...

सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावरील पुणे ते शेंद्रे-सातारा हा रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे आजपर्यंत ३५० पेक्षा जास्त बळी या रस्त्याने घेतले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जणू काही मृत्यूला निमंत्रण दिल्यासारेखच आहे. महामार्गावरील हा प्रवास सातारकरांच्या जिवाला घोर लावणारा ठरत असून जावे त्यांच्या वंशा... या उक्तीप्रमाणे मंत्र्यांनाही याची अनुभूती घ्यावी, यासाठी येथील संकल्प इंजिनिअरिंग सांस्कृतिक सेवाभावी संस्थेने चक्क चार मंत्र्यांच्या नावाने ‘स्वारगेट-सातारा’ या एसटी बसचे आॅनलाईन बुकिंग करून त्यांना तिकीट पाठविले आहे.संस्थेच्या वतीने निष्कृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाबाबत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीक मांगो आंदोलन करण्यात आले. जीव मुठीत घेऊन प्रवाशांना, वाहनचालकांना पुणे-सातारा हा महामार्गावरील प्रवास करावा लागत आहे. मंत्र्यांनी या मार्गावर एसटी बसने प्रवास केल्याशिवाय त्यांना प्रवाशांच्या व्यथा समजणार नाहीत. यासाठी संस्थेच्या वतीने दि. २ आॅगस्ट या दिवशीचे ‘स्वारगेट ते सातारा’ या प्रवासाचे एसटी बसचे तिकीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री विजय शिवतारे आणि बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाने काढून त्यांना पाठविण्यात आले आहे. चौघांच्या तिकिटाचे ४२० रूपये आणि आरक्षण शुल्क २० असे एकूण ४४० रुपये संस्थेने अदा केले आहेत.संस्थेच्या वतीने अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे-बेंगलोर महामार्गावरील पुणे-सातारा या रस्त्याच्या कामाचा ठेका २०१० मध्ये रिलायन्स इन्फ्राला दिला. रिलायन्सने हे काम ३१ मार्च २०१३ पूर्वी पूर्ण करण्याचा करार झाला होता. मात्र, अद्याप २० टक्केही काम झालेले नाही. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्तेसुद्धा खूप छान आहेत, इतके निष्कृष्ट काम महामार्गाचे झाले आहे. त्यामुळे आजपर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.याबाबत बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या; पण कार्यवाही झालेली नाही. मोठा अपघात झाला की मंत्री बैठक घेतात; परंतु रिलायन्स इन्फ्रा त्यांना फसवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याकडे लक्ष देऊन उपाययोजना करावी, निकृष्ट रस्त्यामुळे पाचशे-सहाशे लोकांचा जीव गेला, याला जबाबदार म्हणून रिलायन्स व ‘न्हाय’वर गुन्हा दाखल करण्याची सूचना राज्य सरकारला करावी, अशा आशयाचे पत्र संस्थेने पंतप्रधानांना पाठविले आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्याला रिलायन्समुक्त करासंकल्प इंजिनिअरिंग सांस्कृतिक सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिलायन्सच्या निकृष्ट कामाला कंटाळून भीक मांगो आंदोलन केले व जमा झालेल्या पैशातून रिलायन्स इन्फ्राच्या नावानं केक कापून निषेध व्यक्त केला. तसेच महामार्गाच्या निकृ्ष्ट कामाची कॅसेट पाठवून आम्हाला रिलायन्समधून मुक्त करा, असे पत्र पंतप्रधानांना पाठविण्यात आले आहे.सातारा तुमची वाट पाहतोय...लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी कोल्हापूर, सांगलीला आले होते. त्यावेळी त्यांनी ‘सांगली करू चांगली’ असे मराठीतून सांगितले होते. परंतु सातारला नाही आलात. सातारा जिल्हा तसा लहानच. शुद्ध हवा, निसर्गसौंदर्य, शिवछत्रपतींची गादी, थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर, डौलात उभा असेलेला प्रतापगड तसेच यशवंतराव चव्हाण यांचे गाव याच जिल्ह्यातले. माजी पंतप्रधान, माजी मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातले... असा हा छोटा पण भारी आमचा सातारा पाहायला तुम्ही यावे, अशा आशयाचे पत्र संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले आहे.