शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

अहंकार नडला : निवडणूक न लढवता सरकार स्थापन्याचा दावा करणारं भाजप हतबल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 12:53 IST

भाजप निवडणुकांत निष्णांत असून आम्ही देशात निवडणूक न लढविता देखील सरकार स्थापन करू शकतो, असा दावा राम माधव यांनी केला होता. मात्र महाराष्ट्रातील राजकीय स्थिती भाजपला जमिनीवर आणणारी ठरली आहे. 

मुंबई - गर्वाचं घर खाली, अशी म्हण मराठीत आहे. हीच म्हण महाराष्ट्रातील राजकारणात अगदी चपखल बसल्याचं सध्या दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांना या म्हणीचा बोध होईल, अशी राजकीय स्थिती महाराष्ट्रात झाली आहे. 

घसा कोरडा पडेपर्यंत मी पुन्हा येईल...मी पुन्हा येईल... मी पुन्हा येईल ओरडून सांगणारे मुख्यमंत्री जेव्हा शरद पवारांचा काळ संपला म्हणत होते, त्याचवेळी त्यांना देखील अहंकाराने घेरलं असा विचारप्रवाह निर्माण झाला होता. महाराष्ट्रातील जनतेने ही बाब लक्षात घेत भाजपला बहुमताच्या आकड्यापासून गेल्यावेळपेक्षा आणखी दूर  नेले. 

दरम्यान निकाल लागल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि संघ प्रचारक राम माधव यांच्या वक्तव्याने भाजपने अतिआत्मविश्वासाची कोणती पातळी गाठली हे दाखवून दिले. भाजप निवडणुकांत निष्णांत असून आम्ही देशात निवडणूक न लढविता देखील सरकार स्थापन करू शकतो, असा दावा राम माधव यांनी केला होता. मात्र महाराष्ट्रातील राजकीय स्थिती भाजपला जमिनीवर आणणारी ठरली आहे. 

राज्यात शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाचा हट्ट धरल्यामुळे भाजपकडून युती जवळजवळ संपुष्टात आली आहे. त्यामुळे शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला टाळी दिली आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकार स्थापन करणार अशी स्थिती होती. मात्र ही शक्यताही आता मावळल्याचे चित्र आहे. तर भाजप राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरूनही सत्तेपासून दूर राहण्याची शक्यता आहे. भाजपला केवळ अहंकार नडल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू आहे.