शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

अहंकार नडला : निवडणूक न लढवता सरकार स्थापन्याचा दावा करणारं भाजप हतबल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 12:53 IST

भाजप निवडणुकांत निष्णांत असून आम्ही देशात निवडणूक न लढविता देखील सरकार स्थापन करू शकतो, असा दावा राम माधव यांनी केला होता. मात्र महाराष्ट्रातील राजकीय स्थिती भाजपला जमिनीवर आणणारी ठरली आहे. 

मुंबई - गर्वाचं घर खाली, अशी म्हण मराठीत आहे. हीच म्हण महाराष्ट्रातील राजकारणात अगदी चपखल बसल्याचं सध्या दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांना या म्हणीचा बोध होईल, अशी राजकीय स्थिती महाराष्ट्रात झाली आहे. 

घसा कोरडा पडेपर्यंत मी पुन्हा येईल...मी पुन्हा येईल... मी पुन्हा येईल ओरडून सांगणारे मुख्यमंत्री जेव्हा शरद पवारांचा काळ संपला म्हणत होते, त्याचवेळी त्यांना देखील अहंकाराने घेरलं असा विचारप्रवाह निर्माण झाला होता. महाराष्ट्रातील जनतेने ही बाब लक्षात घेत भाजपला बहुमताच्या आकड्यापासून गेल्यावेळपेक्षा आणखी दूर  नेले. 

दरम्यान निकाल लागल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि संघ प्रचारक राम माधव यांच्या वक्तव्याने भाजपने अतिआत्मविश्वासाची कोणती पातळी गाठली हे दाखवून दिले. भाजप निवडणुकांत निष्णांत असून आम्ही देशात निवडणूक न लढविता देखील सरकार स्थापन करू शकतो, असा दावा राम माधव यांनी केला होता. मात्र महाराष्ट्रातील राजकीय स्थिती भाजपला जमिनीवर आणणारी ठरली आहे. 

राज्यात शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाचा हट्ट धरल्यामुळे भाजपकडून युती जवळजवळ संपुष्टात आली आहे. त्यामुळे शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला टाळी दिली आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकार स्थापन करणार अशी स्थिती होती. मात्र ही शक्यताही आता मावळल्याचे चित्र आहे. तर भाजप राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरूनही सत्तेपासून दूर राहण्याची शक्यता आहे. भाजपला केवळ अहंकार नडल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू आहे.