शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अहंकार नडला : निवडणूक न लढवता सरकार स्थापन्याचा दावा करणारं भाजप हतबल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 12:53 IST

भाजप निवडणुकांत निष्णांत असून आम्ही देशात निवडणूक न लढविता देखील सरकार स्थापन करू शकतो, असा दावा राम माधव यांनी केला होता. मात्र महाराष्ट्रातील राजकीय स्थिती भाजपला जमिनीवर आणणारी ठरली आहे. 

मुंबई - गर्वाचं घर खाली, अशी म्हण मराठीत आहे. हीच म्हण महाराष्ट्रातील राजकारणात अगदी चपखल बसल्याचं सध्या दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांना या म्हणीचा बोध होईल, अशी राजकीय स्थिती महाराष्ट्रात झाली आहे. 

घसा कोरडा पडेपर्यंत मी पुन्हा येईल...मी पुन्हा येईल... मी पुन्हा येईल ओरडून सांगणारे मुख्यमंत्री जेव्हा शरद पवारांचा काळ संपला म्हणत होते, त्याचवेळी त्यांना देखील अहंकाराने घेरलं असा विचारप्रवाह निर्माण झाला होता. महाराष्ट्रातील जनतेने ही बाब लक्षात घेत भाजपला बहुमताच्या आकड्यापासून गेल्यावेळपेक्षा आणखी दूर  नेले. 

दरम्यान निकाल लागल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि संघ प्रचारक राम माधव यांच्या वक्तव्याने भाजपने अतिआत्मविश्वासाची कोणती पातळी गाठली हे दाखवून दिले. भाजप निवडणुकांत निष्णांत असून आम्ही देशात निवडणूक न लढविता देखील सरकार स्थापन करू शकतो, असा दावा राम माधव यांनी केला होता. मात्र महाराष्ट्रातील राजकीय स्थिती भाजपला जमिनीवर आणणारी ठरली आहे. 

राज्यात शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाचा हट्ट धरल्यामुळे भाजपकडून युती जवळजवळ संपुष्टात आली आहे. त्यामुळे शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला टाळी दिली आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकार स्थापन करणार अशी स्थिती होती. मात्र ही शक्यताही आता मावळल्याचे चित्र आहे. तर भाजप राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरूनही सत्तेपासून दूर राहण्याची शक्यता आहे. भाजपला केवळ अहंकार नडल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू आहे.