शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत!

By admin | Updated: December 29, 2014 05:59 IST

दीडशे उंबरे... लोकसंख्या ८५०... गावात एकच सार्वजनिक विहीर... तिनेही तळ गाठलेला... ६० फूट विहिरीत उतरण्याची सोय नाही

अविनाश मुडेगावकर, अंबाजोगाई (बीड) - दीडशे उंबरे... लोकसंख्या ८५०... गावात एकच सार्वजनिक विहीर... तिनेही तळ गाठलेला... ६० फूट विहिरीत उतरण्याची सोय नाही... त्यामुळे कमरेला दोरी बांधून चिमुरड्यांना आत सोडायचे... हंडा भरल्यावर एका हातात दोरी अन् दुसऱ्या हातात भांडे धरलेल्या मुलांना बाहेर काढायचे... हंडाभर पाण्यासाठी दररोज अख्ख्या गावाचा जीव टांगणीला असतो. अंबाजोगाई तालुक्यातील मुरकुटवाडी येथील या जीवघेण्या कसरतीवरून मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता समजू शकते. मुरकुटवाडी गावात अजूनही पाणी योजना राबविलेली नाही. एकाच विहिरीवर संपूर्ण गावाला तहान भागवावी लागते. तीन वर्षांपासून मराठवाड्याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. यंदा पावसाअभावी पीक तर आले नाहीच, मात्र गावाचा पाण्याचा स्रोत असलेल्या विहिरीनेही नोव्हेंबरमध्ये तळ गाठला. गावातील दोन हातपंप व बोअरवेलही कोरडेठाक पडल्याने विहिरीत झिरपणाऱ्या पाण्यावरच सर्वांची मदार आहे. विहिरीत उतरता येत नसल्याने पोटच्या लेकरांच्या कमरेला दोरी बांधून आत सोडायचे. त्यांनी ग्लासच्या साहाय्याने हंडा भरला की हातातील भांड्यासह त्यांना ओढायचे, असा पालकांचा दिनक्रम असतो.