शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

पानमळ्यातून साधली आर्थिक उन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 11:39 IST

यशकथा : नांदेड जिल्ह्यातील चाभरा (ता. हदगाव) येथील शेतकरी शंकर उमाजी मरकुंदे यांनी नवीन प्रयोग करून पानमळा शेतीचा नवा पॅटर्न निर्माण केला.

- युनूस नदाफ (पार्डी, जि. नांदेड)

दुष्काळ अन् वारंवारच्या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी पारंपरिक पिकांना फाटा देत नांदेड जिल्ह्यातील चाभरा (ता. हदगाव) येथील शेतकरी शंकर उमाजी मरकुंदे यांनी नवीन प्रयोग करून पानमळा शेतीचा नवा पॅटर्न निर्माण केला. विशेष म्हणजे गारपिटीने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना या पिकाने मोठा आर्थिक आधार दिला. सिंचन व्यवस्थेत चाभरा गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम असून, या भागातील शेतकरी केळी, हळद, सोयाबीन, कापसाला पसंती देतात़ मात्र, दरवर्षी नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत असून, तसेच बाजारात केळी, कापूस, सोयाबीन, हळद पिकाला कवडीमोल भाव मिळतो़ याउलट नागवेलीच्या पानांना बाराही महिने चांगला भाव मिळत असल्याने अनेक तरुण शेतकरी पानमळा शेतीकडे वळत आहेत.

शंकरराव उमाजी मरकुंदे यांच्याकडे २५ एकर जमीन वडिलोपार्जित आहे़ त्यांचे शिक्षण बीए झालेले असून, शेतीमध्ये काही नवीन करण्याची इच्छा असल्याने त्यांनी एक एकरमध्ये नागवेली पानाच्या कपुरी जातीची लागवड केली़ प्रथम त्यांनी शेवरी व शेवगा यांची जून महिन्यात सरी पद्धतीने लागवड केली़ सप्टेंबरमध्ये शेवग्याच्या बुडाशी दोन फुटाच्या अंतराने नागवेलीची लागवड केली. लागवडीपूर्वी शेणखताचा वापर केला. विशेष म्हणजे पाऊस, गारपिटीमुळे नुकसान होऊ नये, यासाठी पानमळ्याच्या चारही बाजूने कुपटाने संरक्षण केले. 

पानमळ्यातून वर्षात एकरी दहा लाखाचे उत्पादन निघते खर्च वजा जाता सात ते आठ लाखांचे त्यातून उत्पन्न मिळत असल्याने शेतक-यांना मोठा आधार झाला.पानाला श्रीरामपूर, परभणी, जळगाव, नाशिक येथील बाजारपेठेत मागणी आहे.एक हजार पानावर २५० ते ५०० रुपयांपर्यंत भाव मिळतो़ नागवेली मळ्याला पाणी कमी लागते़ नागवेलीची लागवडीपासून दहा महिन्याच्या अखेरीस पान तोडण्यास येतात़ तेव्हापासून १२ महिने नागवेलीला पान राहतात.नागवेलीच्या मळ्यात १२ महिने महिला मजुरांना काम असते़ नागवेली मळ्यामुळे मजुरांनाही काम उपलब्ध असतो़ 

पानमळ्यात लावण्यात आलेल्या शेवगा, शेवरी या झाडापासून शेळ्यांसाठी चारा उपलब्ध होत असते़ त्यामुळे शेळीपालन व्यवसायसुद्धा त्यांनी सुरू केला.मरकुंदे यांच्याकडे १० खानदानी शेळ्या असून, त्याच्यापासून जन्मलेली १६ पिल्ले झाली आहेत. त्यांनी शेळीपालनाचाही जोड व्यवसाय सुरू केला. पानमळ्याला पाणी कमी लागते. नागवेलीची लागवड केल्यानंतर काही दिवस पाटाने पाणी दिले जाते. नागवेली दोन ते तीन फुटांची झाल्यानंतर ठिबकद्वारे मळ्याला पाणीपुरवठा केला जातो़ त्यामुळे या पिकाला पाणी कमी लागते कारण की शेवगा व शेवरीचे झाडे १५ ते २० फुटांची उंची असल्याने व मळ्याला चारही बाजूने कुंपण असल्याने मळ्यात उन्हाची तीव्रता कमी होऊन शेतीला पाणी कमी द्यावे लागते़

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र