शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पानमळ्यातून साधली आर्थिक उन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 11:39 IST

यशकथा : नांदेड जिल्ह्यातील चाभरा (ता. हदगाव) येथील शेतकरी शंकर उमाजी मरकुंदे यांनी नवीन प्रयोग करून पानमळा शेतीचा नवा पॅटर्न निर्माण केला.

- युनूस नदाफ (पार्डी, जि. नांदेड)

दुष्काळ अन् वारंवारच्या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी पारंपरिक पिकांना फाटा देत नांदेड जिल्ह्यातील चाभरा (ता. हदगाव) येथील शेतकरी शंकर उमाजी मरकुंदे यांनी नवीन प्रयोग करून पानमळा शेतीचा नवा पॅटर्न निर्माण केला. विशेष म्हणजे गारपिटीने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना या पिकाने मोठा आर्थिक आधार दिला. सिंचन व्यवस्थेत चाभरा गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम असून, या भागातील शेतकरी केळी, हळद, सोयाबीन, कापसाला पसंती देतात़ मात्र, दरवर्षी नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत असून, तसेच बाजारात केळी, कापूस, सोयाबीन, हळद पिकाला कवडीमोल भाव मिळतो़ याउलट नागवेलीच्या पानांना बाराही महिने चांगला भाव मिळत असल्याने अनेक तरुण शेतकरी पानमळा शेतीकडे वळत आहेत.

शंकरराव उमाजी मरकुंदे यांच्याकडे २५ एकर जमीन वडिलोपार्जित आहे़ त्यांचे शिक्षण बीए झालेले असून, शेतीमध्ये काही नवीन करण्याची इच्छा असल्याने त्यांनी एक एकरमध्ये नागवेली पानाच्या कपुरी जातीची लागवड केली़ प्रथम त्यांनी शेवरी व शेवगा यांची जून महिन्यात सरी पद्धतीने लागवड केली़ सप्टेंबरमध्ये शेवग्याच्या बुडाशी दोन फुटाच्या अंतराने नागवेलीची लागवड केली. लागवडीपूर्वी शेणखताचा वापर केला. विशेष म्हणजे पाऊस, गारपिटीमुळे नुकसान होऊ नये, यासाठी पानमळ्याच्या चारही बाजूने कुपटाने संरक्षण केले. 

पानमळ्यातून वर्षात एकरी दहा लाखाचे उत्पादन निघते खर्च वजा जाता सात ते आठ लाखांचे त्यातून उत्पन्न मिळत असल्याने शेतक-यांना मोठा आधार झाला.पानाला श्रीरामपूर, परभणी, जळगाव, नाशिक येथील बाजारपेठेत मागणी आहे.एक हजार पानावर २५० ते ५०० रुपयांपर्यंत भाव मिळतो़ नागवेली मळ्याला पाणी कमी लागते़ नागवेलीची लागवडीपासून दहा महिन्याच्या अखेरीस पान तोडण्यास येतात़ तेव्हापासून १२ महिने नागवेलीला पान राहतात.नागवेलीच्या मळ्यात १२ महिने महिला मजुरांना काम असते़ नागवेली मळ्यामुळे मजुरांनाही काम उपलब्ध असतो़ 

पानमळ्यात लावण्यात आलेल्या शेवगा, शेवरी या झाडापासून शेळ्यांसाठी चारा उपलब्ध होत असते़ त्यामुळे शेळीपालन व्यवसायसुद्धा त्यांनी सुरू केला.मरकुंदे यांच्याकडे १० खानदानी शेळ्या असून, त्याच्यापासून जन्मलेली १६ पिल्ले झाली आहेत. त्यांनी शेळीपालनाचाही जोड व्यवसाय सुरू केला. पानमळ्याला पाणी कमी लागते. नागवेलीची लागवड केल्यानंतर काही दिवस पाटाने पाणी दिले जाते. नागवेली दोन ते तीन फुटांची झाल्यानंतर ठिबकद्वारे मळ्याला पाणीपुरवठा केला जातो़ त्यामुळे या पिकाला पाणी कमी लागते कारण की शेवगा व शेवरीचे झाडे १५ ते २० फुटांची उंची असल्याने व मळ्याला चारही बाजूने कुंपण असल्याने मळ्यात उन्हाची तीव्रता कमी होऊन शेतीला पाणी कमी द्यावे लागते़

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र