शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

जेवणाचा बेत जिवावर बेतला

By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST

रात्रीचे जेवण बाहेर करण्यासाठी आखलेला प्लॅन पाच मित्रांना भलताच महागात पडला.

मुंबई : रात्रीचे जेवण बाहेर करण्यासाठी आखलेला प्लॅन पाच मित्रांना भलताच महागात पडला. जेवणाची पार्टी उरकून कारने घरी परतत असताना, त्यांच्या कारचा अपघात झाला. या भीषण अपघातात चालकासह दोन जण ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घाटकोपरमध्ये घडली. जीवन बेर्डे (२३), चालक अतुल बनसोडे (२२) अशी मृतांची नावे आहेत, तर तिघा जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.भांडुप आणि कांदिवली परिसरात राहणारे जीवन बेर्डे, सुरेश बेर्डे (३०), अतुल बनसोडे (२२), राजू वाकळे (२२) आणि रणजित बेर्डे (२३) अशी पाच मित्रांची नावे आहेत. पाचही जण चालक म्हणून काम करतात. रविवारी कांदिवली येथील रहिवासी असलेला रवी टुरिस्टच्या स्विफ्ट डिझायरने फिरत असल्याची माहिती अतुलला मिळाली. त्यानुसार, रात्री कारने जेवणासाठी बाहेर जाण्याचे त्यांनी ठरविले. ठरल्याप्रमाणे रवी कार घेऊन भांडुप परिसरात आला. अतुलकडे गाडी चालवायला देत, चारही जण ठाण्याच्या ढाब्यावर जेवणासाठी गेले. तेथे जेवणाचा बेत उरकून पाचही जण भांडुपच्या दिशेने निघाले. मध्यरात्री अडीचच्या सुमारास फेरफटका मारत असताना अतुलने गाडी घाटकोपरच्या दिशेने नेली. अशात ठाणे-मुंबई मार्गावरील त्याचा गाडीवरचा ताबा सुटला. गाडी समोरील खांबाला धडकून हायवेवर पलटी झाली. या अपघातात गाडीचा पूर्णपणे चुराडा झाला आहे, तर जीवन आणि अतुल जागीच ठार झाले. स्थानिक आणि घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांच्या मदतीने जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. >पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलयामध्ये रवीची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेने भांडुप परिसरातही शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, मित्रांमध्ये अतुलला कसलेच व्यसन नसल्याने, त्याच्याकडे गाडी चालविण्यासाठी दिली होती. त्यात हा अपघात कसा झाला, हे कळलेच नसल्याचे जखमी मित्रांनी त्यांच्या जबाबात म्हटले आहे. या प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात अतुल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच अधिक तपास सुरूअसल्याची माहिती पंतनगर पोलिसांनी दिली.