शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

१ डिसेंबरपासून देशभरात ई-टोल - नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 03:42 IST

देशभरातील ३७८ टोल प्लाझांवर येत्या १ डिसेंबरपासून ई-टोल वसुली सुरू करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे पत्रपरिषदेत केली.

मुंबई : देशभरातील ३७८ टोल प्लाझांवर येत्या १ डिसेंबरपासून ई-टोल वसुली सुरू करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे पत्रपरिषदेत केली. गडकरी म्हणाले की, एखादे वाहन टोल नाक्यावर आल्यानंतर त्यावर असलेले स्टिकर जे ई-पेमेंटशी जोडलेले असेल त्यावरून टोलची वसुली केली जाईल आणि वाहन न थांबता पुढे जाऊ शकेल. यापुढे नवीन वाहनांवर असे नवे स्टिकर लावूनच ती बाजारात येतील. साडेसात लाख वाहनांना आतापर्यंत अशी स्टिकर्स पुरविण्यात आली आहेत. त्यांच्या खरेदीदाराच्या बँक खात्याशी ई-टोल संलग्न असेल. १ डिसेंबरपासून टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा दिसणार नाहीत त्यामुळे वाहनधारकांना ताटकळावे लागणार नाही. जुन्या वाहनांसाठीदेखील ही सुविधा पुरविण्यात येणार आहे.मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे काम सहा महिन्यांत सुरूमनमाड-इंदूर या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाचे काम येत्या सहा महिन्यांत सुरू करण्यात येईल, असे गडकरी यांनी जाहीर केले. या रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी ६ हजार कोटी रुपये खर्चाची जबाबदारी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट उचलेल. या रेल्वेमार्गाची उभारणी इंडियन पोर्ट रेल कॉर्पोरेशन करेल. आधी या मार्गासाठीच्या खर्चाचा भार महाराष्ट्र, मध्य प्रदेश सरकार व आपले मंत्रालय उचलणार होते. मात्र आता आपले मंत्रालय तो भार उचलेल, असे ते म्हणाले.सांगली, नाशकात ड्रायपोर्टसिंदी (जि. वर्धा) आणि जालना येथे ड्रायपोर्ट उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर सांगली आणि नाशिक येथे ड्रायपोर्टची उभारणी करून तेथून कृषी, औद्योगिक मालाची निर्यात केली जाईल, असे गडकरी यांनी सांगितले. सांगलीसाठी २ हजार एकर तर नाशिकसाठी ३०० एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे, असे गडकरी यांनी सांगितले.वसईच्या खाडीतून माल थेट पोर्ट ट्रस्टमध्ये नेणार!मुंबईला वसई-विरारहून ट्रक-कंटेनरने येणारा माल भिवंडीला नेला जातो. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होते आणि प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते. हे टाळण्यासाठी हा माल वसईच्या खाडीत धक्का निर्माण करून तेथे उतरवावा आणि तो समुद्रमार्गे थेट मुंबई पोर्ट ट्रस्टपर्यंत न्यावा, असा नवा उपाय नितीन गडकरी यांनी आज सुचविला. ते म्हणाले की, याबाबतचा प्रस्ताव मी कालच गोव्यात झालेल्या बैठकीत दिलेला आहे. वसई खाडीतील जागा त्यासाठी मिळाल्यास वाहतूक खर्च, प्रदूषण कमी होईल आणि वाहतूककोंडीही फुटेल.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरी