शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

१ डिसेंबरपासून देशभरात ई-टोल - नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 03:42 IST

देशभरातील ३७८ टोल प्लाझांवर येत्या १ डिसेंबरपासून ई-टोल वसुली सुरू करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे पत्रपरिषदेत केली.

मुंबई : देशभरातील ३७८ टोल प्लाझांवर येत्या १ डिसेंबरपासून ई-टोल वसुली सुरू करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे पत्रपरिषदेत केली. गडकरी म्हणाले की, एखादे वाहन टोल नाक्यावर आल्यानंतर त्यावर असलेले स्टिकर जे ई-पेमेंटशी जोडलेले असेल त्यावरून टोलची वसुली केली जाईल आणि वाहन न थांबता पुढे जाऊ शकेल. यापुढे नवीन वाहनांवर असे नवे स्टिकर लावूनच ती बाजारात येतील. साडेसात लाख वाहनांना आतापर्यंत अशी स्टिकर्स पुरविण्यात आली आहेत. त्यांच्या खरेदीदाराच्या बँक खात्याशी ई-टोल संलग्न असेल. १ डिसेंबरपासून टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा दिसणार नाहीत त्यामुळे वाहनधारकांना ताटकळावे लागणार नाही. जुन्या वाहनांसाठीदेखील ही सुविधा पुरविण्यात येणार आहे.मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे काम सहा महिन्यांत सुरूमनमाड-इंदूर या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाचे काम येत्या सहा महिन्यांत सुरू करण्यात येईल, असे गडकरी यांनी जाहीर केले. या रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी ६ हजार कोटी रुपये खर्चाची जबाबदारी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट उचलेल. या रेल्वेमार्गाची उभारणी इंडियन पोर्ट रेल कॉर्पोरेशन करेल. आधी या मार्गासाठीच्या खर्चाचा भार महाराष्ट्र, मध्य प्रदेश सरकार व आपले मंत्रालय उचलणार होते. मात्र आता आपले मंत्रालय तो भार उचलेल, असे ते म्हणाले.सांगली, नाशकात ड्रायपोर्टसिंदी (जि. वर्धा) आणि जालना येथे ड्रायपोर्ट उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर सांगली आणि नाशिक येथे ड्रायपोर्टची उभारणी करून तेथून कृषी, औद्योगिक मालाची निर्यात केली जाईल, असे गडकरी यांनी सांगितले. सांगलीसाठी २ हजार एकर तर नाशिकसाठी ३०० एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे, असे गडकरी यांनी सांगितले.वसईच्या खाडीतून माल थेट पोर्ट ट्रस्टमध्ये नेणार!मुंबईला वसई-विरारहून ट्रक-कंटेनरने येणारा माल भिवंडीला नेला जातो. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होते आणि प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते. हे टाळण्यासाठी हा माल वसईच्या खाडीत धक्का निर्माण करून तेथे उतरवावा आणि तो समुद्रमार्गे थेट मुंबई पोर्ट ट्रस्टपर्यंत न्यावा, असा नवा उपाय नितीन गडकरी यांनी आज सुचविला. ते म्हणाले की, याबाबतचा प्रस्ताव मी कालच गोव्यात झालेल्या बैठकीत दिलेला आहे. वसई खाडीतील जागा त्यासाठी मिळाल्यास वाहतूक खर्च, प्रदूषण कमी होईल आणि वाहतूककोंडीही फुटेल.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरी